शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
2
भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
3
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
6
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
7
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
8
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
9
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
10
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
11
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
12
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
13
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
14
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
15
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
16
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
17
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
18
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
19
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
20
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

अन, चैतन्याचा प्रवाह थांबला

By admin | Updated: April 10, 2015 00:27 IST

१० एप्रिल १९६५ रोजी रात्री १२.३० चे सुमारास डॉ. पंजाबरावांची प्राणज्योत निमाली.

राजेंद्र गायगोले दर्यापूर१० एप्रिल १९६५ रोजी रात्री १२.३० चे सुमारास डॉ. पंजाबरावांची प्राणज्योत निमाली. अगोदरच्या दिवशी म्हणजे ९ एप्रिल १९६५ रोजी त्यांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तडाखेबंद भाषण केले. घरी येताच विमलाबाईंना बेसन भाकरी करण्याचे आदेश देऊन भाऊसाहेबांची मोटार बंगल्यातून बाहेर पडली. ती थेट लोकनायक बापूजी अणे यांच्या घरी जाऊन थांबली. तिथे त्यांच्या लोकसभेतील भाषणावर व त्यामधून मांडलेल्या प्रश्नासंदर्भात बापू अणेंसमवेत चर्चा करुन ते सायंकाळी ६ वाजता घरी परतले. त्यांच्या १२ जनपथ या बंगल्याच्या आवारातील हिरवळीवर ते खूर्चीवर बसले असताना त्यांना अस्वस्थता जाणवली. त्यांनी हिरवळीवर अंग टाकले.'भारतरत्ना'ने गौरविणे हाच खरा सन्मान दिवसभराची दगदग कामाची गर्दी त्यात आपण जेवलो नाही. यामुळे कदाचित अस्वस्थ वाटत असेल म्हणून त्यांनी विमलाबाईना जेवण वाढण्याची तयारी करण्यास सांगितले. कामकरी नामदेव याला शेजारच्या हॉटेलातून बेसन लाडू आणावयास धाडले. त्यानंतर त्यांनी जेवण घेतले. मात्र जेवण घेतल्यावरसुद्धा त्यांच्या जीवाची तगमग काही कमी झाली नाही. परिणामी डॉक्टरांना बोलवण्यात आले. डॉक्टर आले तेव्हा भाऊसाहेब हिरवळीवर लोळत होते. त्यांना इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर भाऊसाहेबांना थोडे बरे वाटले. डॉक्टरांनी त्यांना आहे त्या अवस्थेत पडून राहायला सांगितले. भाऊसाहेबांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. शरीराची हालचाल होताच त्यांच्या छातीत कळ आली. भाऊसाहेब बेशुध्द झाले. त्यांना दिल्लीच्या विलिंग्डन इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराची शर्त केली. मात्र नियतीने आपला डाव साधला. बहुजनांच्या उत्कर्षासाठी धावणारा भाऊसाहेबांचा चैतन्यमयी देह शांत झाला. दिल्लीच्या निगमबोध घाटावर त्यांच्यावर अगदी साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडले. लोकसभेचे सभापती हुकूमसिंह, पंतप्रधान लालहबहादूर शास्त्री, संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, लोकनायक बापुजी अणे, जर्मनीचे राजदूत हर्बर्ट बंकर, गुलजारीलाल नंदा, इंदिरा गांधी, विविध प्रांताचे मुख्यमंत्री आदी मान्यवर भाऊसाहेबांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.दीर्घकाळ कृषिमंत्री या नात्याने देशसेवा करणारा लोकसेवक, सार्वजनिक जीवनातील एक प्रेरक व्यक्तित्त्व, निष्ठावंत समाजसुधारक, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थाचे संघटनांचे जनक, तंजावर-बडोदा, इंदौर, ग्वाल्हेर, चंदीगढपर्यंत ज्यांचे नेतृत्व सर्वमान्य होते व मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा सुवर्णमयी ठसा उमटविला होता. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे खरे वारसदार घटना समितीतील बाबासाहेबांचे सच्चे सहकारी शिक्षण, कृषी व कृषक समाज सुधारणा, धार्मिक सुधारणा, विज्ञान, अस्पृश्यता निवारण, स्वातंत्र्यलढा असो की, आझाद हिंद सेनेच्या शिलेदारांचा ऐतिहासिक खटला चालविणे अशा विविधांगी पैलूंनी सजलेल्या या भारतमातेच्या सुपुत्राला भारतरत्नाने गौरविल्यास त्यांच्या ५० व्या स्मृतिदिनवर्षात आगळी वेगळी आदरांजली ठरू शकेल.