शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

अन, चैतन्याचा प्रवाह थांबला

By admin | Updated: April 10, 2015 00:27 IST

१० एप्रिल १९६५ रोजी रात्री १२.३० चे सुमारास डॉ. पंजाबरावांची प्राणज्योत निमाली.

राजेंद्र गायगोले दर्यापूर१० एप्रिल १९६५ रोजी रात्री १२.३० चे सुमारास डॉ. पंजाबरावांची प्राणज्योत निमाली. अगोदरच्या दिवशी म्हणजे ९ एप्रिल १९६५ रोजी त्यांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तडाखेबंद भाषण केले. घरी येताच विमलाबाईंना बेसन भाकरी करण्याचे आदेश देऊन भाऊसाहेबांची मोटार बंगल्यातून बाहेर पडली. ती थेट लोकनायक बापूजी अणे यांच्या घरी जाऊन थांबली. तिथे त्यांच्या लोकसभेतील भाषणावर व त्यामधून मांडलेल्या प्रश्नासंदर्भात बापू अणेंसमवेत चर्चा करुन ते सायंकाळी ६ वाजता घरी परतले. त्यांच्या १२ जनपथ या बंगल्याच्या आवारातील हिरवळीवर ते खूर्चीवर बसले असताना त्यांना अस्वस्थता जाणवली. त्यांनी हिरवळीवर अंग टाकले.'भारतरत्ना'ने गौरविणे हाच खरा सन्मान दिवसभराची दगदग कामाची गर्दी त्यात आपण जेवलो नाही. यामुळे कदाचित अस्वस्थ वाटत असेल म्हणून त्यांनी विमलाबाईना जेवण वाढण्याची तयारी करण्यास सांगितले. कामकरी नामदेव याला शेजारच्या हॉटेलातून बेसन लाडू आणावयास धाडले. त्यानंतर त्यांनी जेवण घेतले. मात्र जेवण घेतल्यावरसुद्धा त्यांच्या जीवाची तगमग काही कमी झाली नाही. परिणामी डॉक्टरांना बोलवण्यात आले. डॉक्टर आले तेव्हा भाऊसाहेब हिरवळीवर लोळत होते. त्यांना इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर भाऊसाहेबांना थोडे बरे वाटले. डॉक्टरांनी त्यांना आहे त्या अवस्थेत पडून राहायला सांगितले. भाऊसाहेबांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. शरीराची हालचाल होताच त्यांच्या छातीत कळ आली. भाऊसाहेब बेशुध्द झाले. त्यांना दिल्लीच्या विलिंग्डन इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराची शर्त केली. मात्र नियतीने आपला डाव साधला. बहुजनांच्या उत्कर्षासाठी धावणारा भाऊसाहेबांचा चैतन्यमयी देह शांत झाला. दिल्लीच्या निगमबोध घाटावर त्यांच्यावर अगदी साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडले. लोकसभेचे सभापती हुकूमसिंह, पंतप्रधान लालहबहादूर शास्त्री, संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, लोकनायक बापुजी अणे, जर्मनीचे राजदूत हर्बर्ट बंकर, गुलजारीलाल नंदा, इंदिरा गांधी, विविध प्रांताचे मुख्यमंत्री आदी मान्यवर भाऊसाहेबांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.दीर्घकाळ कृषिमंत्री या नात्याने देशसेवा करणारा लोकसेवक, सार्वजनिक जीवनातील एक प्रेरक व्यक्तित्त्व, निष्ठावंत समाजसुधारक, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थाचे संघटनांचे जनक, तंजावर-बडोदा, इंदौर, ग्वाल्हेर, चंदीगढपर्यंत ज्यांचे नेतृत्व सर्वमान्य होते व मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा सुवर्णमयी ठसा उमटविला होता. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे खरे वारसदार घटना समितीतील बाबासाहेबांचे सच्चे सहकारी शिक्षण, कृषी व कृषक समाज सुधारणा, धार्मिक सुधारणा, विज्ञान, अस्पृश्यता निवारण, स्वातंत्र्यलढा असो की, आझाद हिंद सेनेच्या शिलेदारांचा ऐतिहासिक खटला चालविणे अशा विविधांगी पैलूंनी सजलेल्या या भारतमातेच्या सुपुत्राला भारतरत्नाने गौरविल्यास त्यांच्या ५० व्या स्मृतिदिनवर्षात आगळी वेगळी आदरांजली ठरू शकेल.