शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

उमेद कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा; विविध मागण्यांचे कृती समितीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:19 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यात २०११ पासून सुरू आहे.

अमरावती : उमेद अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांनी सोमवारी सकाळी ११ वाजता विविध मागण्यांसाठी इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला. यावेळी उमेद कंत्राटी कृती समितीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यात २०११ पासून सुरू आहे. या अभियानांतर्गत महिलांच्या संस्था उभ्या करणे (बचतगट, ग्रामसंघ, प्रभागसंघ) महिलांची क्षमता बांधणी करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करून आर्थिक समावेशन करणे व शाश्र्वत उपजीविका निर्माण करणे हे प्रमुख कार्य पार पाडले जाते. या कामांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी अभियानाने मनुष्यबळ संसाधन मार्गदर्शिकेनुसार राज्य, जिल्हा, तालुका, प्रभाग व ग्रामस्तरावर अभियान कक्षाची स्थापना व संरचना केली आहे. त्यात विविध विषयांच्या तज्ज्ञांची नियुक्ती सरळ सेवा भरती व शासनाने नेमलेल्या बिंदूनामावलीप्रमाणे व सामाजिक आरक्षणानुसार करण्यात आली. त्यांना सात वर्षे प्रशिक्षित करून पारंगत करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात ४ लाख ७८ हजार बचतगट तयार झाले असून, यामध्ये ४९ लाख ३४ हजार ६०१ कुटुंबांतील महिला सहभागी आहेत.

वरील सर्व कामे काही वर्षांपासून उमेदमधील कंत्राटी कर्मचारी करीत होते. मात्र, १० सप्टेंबर रोजी ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढून कार्यरत कर्मचाºयांना पुनर्नियुक्ती प्रक्रिया थांबविल्यामुळे यातील कार्यरत कर्मचाऱ्यांनी संबंधितांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी. कोणत्याही बाह्यसंख्येला कर्मचारी नियुक्तीचे अधिकार देऊ नये, उमेद अभियानाच्या मूळ मनुष्यबळ संसाधन धोरणानुसारच सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे कायम ठेवावी, ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पदावरून हटवावे.

उमेद अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघांना दिला जाणारा खेळता भांडवल निधी समुदाय गुंतवणूक निधी जोखीम प्रवणता निधी यात दुप्पट वाढ करावी व निधी वेळेत द्यावा आदी मागण्यांसाठी विशाल मोर्चा काढला. यावेळी कृती समितीचे किरण पातुरकर, विजय पाटील, अजय कुलथे, शीतल गर्जेवार, कृष्णा ठाकरे, अमोल देवलशी, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, दीपक खताडे, सुरेखा लुंगारे, राधा कुरील, कुसूम शाहू, संध्या टिकले आदी उमेद कर्मचारी, बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Amravatiअमरावती