शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

राज्यातील विद्यापीठांना यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:18 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या उन्हाळी २०२० परीक्षा रखडल्या आहेत. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले आहे. परीक्षांसंदर्भात नेमके काय करावे, हे अद्याप विद्यापीठांनी ठरविलेले नाहीत. आता सर्वच विद्यापीठांना परीक्षांबाबत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देराज्यभरात विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा रखडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या उन्हाळी २०२० परीक्षा रखडल्या आहेत. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले आहे. परीक्षांसंदर्भात नेमके काय करावे, हे अद्याप विद्यापीठांनी ठरविलेले नाहीत. आता सर्वच विद्यापीठांना परीक्षांबाबत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये दरवर्षी उन्हाळी परीक्षांचे नियोजन एप्रिलमध्ये करण्यात येते. तथापि, लॉकडाऊन, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांचे कामकाज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्येही शुकशुकाट आहे. परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना चिंता वाटू लागली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी २०२० परीक्षा १५ एप्रिलपासून घेण्याचे नियोजन चालविले होते. त्यानुसार, ३९४ महाविद्यालयांना परीक्षांचे वेळापत्रक कळविलेले होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने विद्यापीठांना उन्हाळी परीक्षांबाबत काय करावे, हे अद्याप कळू शकले नाही. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी विद्यापीठांकडून परीक्षांची तयारी, तारखेबाबत माहिती मागविली होती. मात्र, देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांसंदर्भात धाकधूक वाढली आहे. सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरुंना यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.राज्यात या अकृषी विद्यापीठांना परीक्षांची चिंतामुंबई विद्यापीठ, मुंबई, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबाासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्र्वविद्यालय, रामटेक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना परीक्षांची चिंता सतावत आहे.लॉकडाऊनमुळे परीक्षांचा कालावधी वाढेल, यात दुमत नाही. मात्र, राज्यभरात विद्यापीठांमध्ये समान स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. परंतु, उन्हाळी परीक्षाविषयी कोणता निर्णय घ्यावा, त्याकरिता यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र