शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील विद्यापीठांना यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:18 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या उन्हाळी २०२० परीक्षा रखडल्या आहेत. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले आहे. परीक्षांसंदर्भात नेमके काय करावे, हे अद्याप विद्यापीठांनी ठरविलेले नाहीत. आता सर्वच विद्यापीठांना परीक्षांबाबत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देराज्यभरात विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा रखडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या उन्हाळी २०२० परीक्षा रखडल्या आहेत. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले आहे. परीक्षांसंदर्भात नेमके काय करावे, हे अद्याप विद्यापीठांनी ठरविलेले नाहीत. आता सर्वच विद्यापीठांना परीक्षांबाबत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये दरवर्षी उन्हाळी परीक्षांचे नियोजन एप्रिलमध्ये करण्यात येते. तथापि, लॉकडाऊन, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांचे कामकाज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्येही शुकशुकाट आहे. परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना चिंता वाटू लागली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी २०२० परीक्षा १५ एप्रिलपासून घेण्याचे नियोजन चालविले होते. त्यानुसार, ३९४ महाविद्यालयांना परीक्षांचे वेळापत्रक कळविलेले होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने विद्यापीठांना उन्हाळी परीक्षांबाबत काय करावे, हे अद्याप कळू शकले नाही. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी विद्यापीठांकडून परीक्षांची तयारी, तारखेबाबत माहिती मागविली होती. मात्र, देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांसंदर्भात धाकधूक वाढली आहे. सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरुंना यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.राज्यात या अकृषी विद्यापीठांना परीक्षांची चिंतामुंबई विद्यापीठ, मुंबई, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबाासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्र्वविद्यालय, रामटेक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना परीक्षांची चिंता सतावत आहे.लॉकडाऊनमुळे परीक्षांचा कालावधी वाढेल, यात दुमत नाही. मात्र, राज्यभरात विद्यापीठांमध्ये समान स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. परंतु, उन्हाळी परीक्षाविषयी कोणता निर्णय घ्यावा, त्याकरिता यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र