शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

राज्यातील विद्यापीठांना यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:18 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या उन्हाळी २०२० परीक्षा रखडल्या आहेत. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले आहे. परीक्षांसंदर्भात नेमके काय करावे, हे अद्याप विद्यापीठांनी ठरविलेले नाहीत. आता सर्वच विद्यापीठांना परीक्षांबाबत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देराज्यभरात विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा रखडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या उन्हाळी २०२० परीक्षा रखडल्या आहेत. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले आहे. परीक्षांसंदर्भात नेमके काय करावे, हे अद्याप विद्यापीठांनी ठरविलेले नाहीत. आता सर्वच विद्यापीठांना परीक्षांबाबत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये दरवर्षी उन्हाळी परीक्षांचे नियोजन एप्रिलमध्ये करण्यात येते. तथापि, लॉकडाऊन, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांचे कामकाज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्येही शुकशुकाट आहे. परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना चिंता वाटू लागली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी २०२० परीक्षा १५ एप्रिलपासून घेण्याचे नियोजन चालविले होते. त्यानुसार, ३९४ महाविद्यालयांना परीक्षांचे वेळापत्रक कळविलेले होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने विद्यापीठांना उन्हाळी परीक्षांबाबत काय करावे, हे अद्याप कळू शकले नाही. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी विद्यापीठांकडून परीक्षांची तयारी, तारखेबाबत माहिती मागविली होती. मात्र, देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांसंदर्भात धाकधूक वाढली आहे. सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरुंना यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.राज्यात या अकृषी विद्यापीठांना परीक्षांची चिंतामुंबई विद्यापीठ, मुंबई, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबाासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्र्वविद्यालय, रामटेक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना परीक्षांची चिंता सतावत आहे.लॉकडाऊनमुळे परीक्षांचा कालावधी वाढेल, यात दुमत नाही. मात्र, राज्यभरात विद्यापीठांमध्ये समान स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. परंतु, उन्हाळी परीक्षाविषयी कोणता निर्णय घ्यावा, त्याकरिता यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र