शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

आणखी दोन दिवस राहणार थंडीचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 00:12 IST

यंदा उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीच उन्हाचे चटके सहन करणाऱ्या अमरावतीकरांना या आठवड्यात मात्र सुखद धक्का मिळाला आहे.

वातावरणात बदल : विदर्भात तुरळक पावसाची शक्यताअमरावती : यंदा उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीच उन्हाचे चटके सहन करणाऱ्या अमरावतीकरांना या आठवड्यात मात्र सुखद धक्का मिळाला आहे. दिवसाचे उन कमी झाल्यावर रात्री थंडीमुळे स्वेटर घालण्याची वेळ आली आहे. वातावरण बदलामुळे शहराचा पारा १६ अंशापर्यंत खाली आला आहे. या बदलाने आबालवृद्धांना सर्दी, तापासारखे आजार वाढले आहेत, मात्र पिकांवर या वातावरणाचा तुर्तास परिणाम नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर फेब्रुवारी मध्यापासून कमी होत असतो. मात्र यंदा जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेशात सुरू असलेली बर्फवृष्टी व उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचे प्रमाण मार्च महिन्यात देखिल कायम असल्याने वातावरणात थंडी वाढली आहे.मागील आठवड्यात पूर्व विदर्भासह मध्यप्रदेशातील काही भागात झालेली गारपीट व काही भागामध्ये झालेला पाऊस यामुळे देखिल तापमानात कमी आलेली आहे. राजस्थान आणि तेलंगणादरम्यान ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’ तयार झाले आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी तापमान कमी येत असल्याचे हवामान खात्याने सांगितले. वास्तविकता मार्च महिन्यात तापमान ३५ ते ४० अंशावर असते. या आठवड्यात तापमानात चढउतार होत असल्याने नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. मात्र विषम वातावरण व अचानक झालेला वातावरणाचा बदल आरोग्यावर परिणाम करीत आहे. (प्रतिनिधी)वातावरणात बदल, आरोग्य सांभाळाआला उन्हाळा, आरोग्य सांभाळा असे म्हटल्या जात असे. आता वाढली थंडी, आरोग्य सांभाळा म्हणण्याची वेळ आली आहे. दिवसा ऊन, रात्री थंडीमुळे सर्वांनाच सर्दी-खोकला आणि ताप आदी आजार होत आहे. या विषम हवामानात लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घेतली पाहीजे. सद्या परिक्षेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. काही दिवस थंड पदार्थ न खाण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.दोन दिवस राहणार थंडीचा जोरउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मात्र काश्मीरमध्ये अशीच बर्फवृष्टी होत राहिल्यास जिल्ह्याच्या तापमानात आणखी कमी येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. साधारणपणे १४ अंशापर्यंत रात्रीचे तापमान राहण्याची शक्यता आहे.दशकात प्रथमच मार्चमध्ये थंडीयापूर्वी २०१५ मध्ये झालेल्या गारपीटनंतर एक, दोन दिवस वातावरणात गारवा होता. या दशकात प्रथमच यंदा पारा १६ अंशावर आला. यापूर्वी २००७ मध्ये पारा १४ अंशावर आला होता. दरवर्षी मार्च महिन्यात ३६ ते ४० अंशाऐवढे तापमान राहते.विदर्भात तुरळक पावसाची शक्यताविदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती पीकेव्हीच्या केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली. जनावरांची योग्य काळजी घ्यावी, पक्वफळांची काढणी करून संरक्षित ठिकाणी साठवणूक करावी अशा सूचना आहेत.गहू-हरभऱ्यावर परिणाम नाहीतापमान कमी होत असल्याने गहु व हरभऱ्यावर या वातावरण बदलाचा परिणाम झाला असता. मात्र ही दोन्ही पिके आता काढणीवर आल्याने फारसा परिणाम होणार नाही. वातावरण बदलाचा कालावधी वाढल्यास विपरित परिणाम होऊ शकतो.