शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

अमरावती जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:14 IST

फोटो - २५एएमपीएच०२ - अशोक मालधुरे वनोजा बाग/लेहेगाव : अमरावती जिल्ह्यात सातेगाव (ता. अंजनगाव सुर्जी) व काटपूर ममदापूर (ता. ...

फोटो - २५एएमपीएच०२ - अशोक मालधुरे

वनोजा बाग/लेहेगाव : अमरावती जिल्ह्यात सातेगाव (ता. अंजनगाव सुर्जी) व काटपूर ममदापूर (ता. मोर्शी) येथे २४ तासांत दोन शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक जगन्नाथ मालधुरे (५६) यांनी २४ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांच्याकडे सवा एकर शेती असून ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. आजारपणामुळे तेदेखील नियमित मिळत नव्हते. गावातील मित्र व नातेवाईक यांच्याकडून ते पैसे उसनवार घेत असत. तेच पैसे फेडण्याची विवंचना असल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, अशी माहिती पुढे आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी आहे.

मोर्शी तालुक्यातील काटपूर ममदापूर येथील शेतकरीपुत्राने विषारी द्रव्य प्राशन करून शुक्रवारी रात्री राहत्या घरात आत्महत्या केली. अतुल उत्तमराव काळे (३५) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याची आई सरला काळे यांच्या नावे असलेली तीन एकर शेती तो कसत होता. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठी असलेली जमीन पिकासह खरडून गेली. कपाशीचे पीक हातचे गेल्याने निराश झालेल्या अतुलने शुक्रवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ आहेत. घटनास्थळी शिरखेड ठाण्याचे पोलीस नाईक बलवंत टाके व समीर मानकर यांनी पंचनामा केला. ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार किसन धुर्वे करीत आहेत.