शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

जुळ्या शहरात अनेक टोळ्या सक्रिय

By admin | Updated: August 29, 2015 00:37 IST

रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारुद गँगने अमित बटाऊवाले या युवकाची हत्या केल्यानंतर या टोळीचे तूर्त तरी पोलीस कारवाईने कंबरडे मोडले आहे.

टोळ्यांचे कंबरडे मोडा : पोलिसांनी खुफिया विभाग 'स्ट्राँग' करण्याची मागणीअमरावती/अचलपूर : रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारुद गँगने अमित बटाऊवाले या युवकाची हत्या केल्यानंतर या टोळीचे तूर्त तरी पोलीस कारवाईने कंबरडे मोडले आहे. अशा अनेक लहान-मोठ्या टोळ्या अजूनही अचलपूर-परतवाड्यात कार्यरत आहेत. त्यांची संघटित दबंगगिरीने सामान्य माणूस त्रस्त आहे. या टोळ्यांचा शोध पोलिसांनी घेऊन त्यांच्या मुसक्या बांधाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.जुळ्या शहरात संघटित गुन्हेगारी डोके वर काढत आहे. पोलिसांच्या खुफिया विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. याकडे लक्ष असते तर कदाचित अमित बटाउवालेचा जीव वाचू शकला असता. येथे अनेक लहान मोठ्या टोळ्या आहेत. त्या वेगवेगळ्या नावाने प्रसिध्द आहेत. काहींना नावे नसून एक-दोन युवकांच्या प्रभावाखाली त्या एकत्र येतात. कुठे कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल, कुस्ती, आखाडा आदी विविध खेळांच्या नावाने तर कुठे एखाद्या धर्म किंवा जातीचा संवेदनशील आधार देऊन तर कुठे एखादा अवैध व्यवसाय करुन पैसे कमावण्याच्या उद्देशाने या काही युवक एकत्र येऊन या टोळ्या तयार झाल्या असून त्यांची दबंगगिरी सुरु असते. ह्यांच्या कारस्थानाचा त्रास एखाद्या व्यक्तीला झाल्यास त्याला मारझोड करुन उलट त्याच्याचविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची, असे यांचे गुन्हेगारी जगतातील फंडे असतात. या टोळ्यांविरुध्द एखाद्याने थोडासाही आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज विविध मार्गाने पध्दतशीरपणे दाबण्याचा प्रयत्न होतो. आपआपल्या पक्षांचे बळ वाढावे आपले स्थान पक्षात मजबूत रहावे, आपल्या विरोधकांना गप्प करावे यासाठी विविध पक्षाचे नेते ह्या टोळ्यांना राजाश्रय देतात. त्यात काही लोकप्रतिनिधीसुध्दा आहेत.या टोळ्यांमधील काही जण जिममध्ये जाऊन पिळदार शरीर तयार करतात मुद्दाम आपल्या दंडाचे प्रदर्शन करुन समोरच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काही जण कानात बाली घालतात तर कुणी दाढी आणि केस वाढवतो. एखादा गळ्यात विशिष्ट रंगाचा दुपट्टा खांद्यावर टाकून मिरवत असतो. लोकांमध्ये दहशत निर्माण करुन आपले अवैध व्यवसाय सुरळीत सुरु रहावे हा या टोळ्यांचा उद्देश असतो यात शंका नाही.या टोळ्या सुरुवातीला लहान असतात आपल्या दबंगगिरीवर या मोठ्या होतात तसे यांचे कारनामे वाढत जातात. मग समाजाला घातक ठरतात. या टोळ्यांना पोलिसांचीही छुपी मदत असते, हे बारुद गँगच्या प्रकरणातून उघड झाले आहे. अशा अनेक टोळ्या अचलपूर, परतवाडा शहरासह देवमाळी, कांडली, असदपूर, पथ्रोट, आसेगाव यासह आदी गावांत कार्यरत असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)गुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांना जात धर्म नसतो. त्यांना त्यांचा हेतू साध्य करायचा असतो. शहरात दादागिरी करणाऱ्या टोळ्यांविरुध्द चांगल्या लोकांनी एकत्र येऊन त्यासाठी मोठे संघठन उभे करणे गरजेचे झाले आहे. अशा टोळ्यांमधील दोन-चार जणांना जरी शिक्षा झाली की सर्वजण वठणीवर येतात. त्यासाठी सज्जनांनीच आता समोर आले पाहीजे.-सचिन देशमुख,माजी नगराध्यक्षजुळ्या शहरात अशा लहान टोळी सुरुवातीला उदयाला येते. तीची त्याच वेळी पोलीसांनी माहिती घेऊन बंदोबस्त केला तर ती मोठी होत नाही. त्यासाठी पोलीसांना खुफिया विभाग स्ट्रॉंग करुन त्याची माहिती ठेवावी लागले. पण दुर्दैवाने अशाटोळ्यांना पोलीसांचीच छूपी मदत असते. काही लोकप्रतिनिधींच्या छत्रछायेतही काही गँग आहेत. -किशोर मोहोड , अध्यक्ष युवक आर.पी.आयटोळ्यांचे निर्माण होऊ द्यायच्या नसतील तर समाजधूरीणांनी समोर आले पाहीजे. रक्तदान, निर्माल्य, निर्मूलन, झाडे लावा झाडे जगवा आदी चांगली कामे काही युवक करत आहे.वाईट गोष्टींचाच उदोउदो जास्त होतो. प्रत्येक युवकात महात्मा गांधीचे विचार रुजविनेही गरजेचे आहे. सामान्यांना जुळ्या शहरात टोळ्यांचा त्रास नाही. रवीन्द्र तोंडगावकर,नागरिक