शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनाचे दरवर्षी वाजतात बारा

By admin | Updated: June 14, 2015 00:20 IST

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी प्रशासन नियोजन करते. मात्र, प्रत्येकवेळी या नियोजनाचे तीनतेरा वाजलेले दिसतात़

साडेतीन हजार घरे प्रभावीत : दहा वर्षांत २७ जणांचा मृत्यू धामणगाव रेल्वे : पावसाळ्यापूर्वी दरवर्षी प्रशासन नियोजन करते. मात्र, प्रत्येकवेळी या नियोजनाचे तीनतेरा वाजलेले दिसतात़ काही वेळा तर अपुऱ्या सामग्रीमुळे या नियोजनाचा पूरता फज्जा उडतो. यावर्षीसुध्दा आपत्ती व्यवस्थापनाचे बारा वाजले असल्याचे स्पष्ट चित्र पुढे आले आहे. मागील दहा वर्षांत झालेल्या पावसाळ्यात साडेतीन हजार घरे प्रभावीत झालीत. २७ जणांचा बळी व १४० जनावरे दगावली़ धामणगाव तालुक्याची भौगोलिक स्थितीत चंद्रभागा, विदर्भ, मोतीकोळसा, खोलाड, लोंडी, घोराड, या नद्यांचा समावेश आहे़ तब्बल २५ गावे दरवर्षी लहान मोठ्या आलेल्या पावसाने प्रभावीत होतात़ वर्धा- देवगाव हा सुपर एक्सप्रेस हायवे प्रत्येक पावसाळ्यात बंद होतो़ तालुक्यात दरवर्षी पुराची समस्या उदभवते़ निंभोरा राज, कळाशी, सोनेगाव खर्डा, आजनगाव, भिल्ली, नारगावंडी, दत्तापूर या गावाला पुराचा फटका बसतो़ थोडा जरी पाऊस झाला तरी अनेक गावांत पुराचे पाणी शिरते. दरवर्षी नालासफाईचे काम युध्दस्तरावर पावसाळा सुरू होण्यापूर्वी होत असले तरी कागदोपत्री झालेल्या या कामाचा फटका अनेक गावांना बसतो़ पुराचा सामना करण्यासाठी दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते़ मात्र आयत्यावेळी याचा काही उपयोग होत नाही़ पावसाळ्यात आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडून जाते़ दरवर्षी केलेले नियोजन प्रत्येकवेळी कागदावरच राहत असल्याने नियोजनाचा फज्जा उडाला़ यंदाही पावसाळ्याला सुरुवात झाली असून दमदार पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.महावितरणचा लपंडावदरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक गावांना महावितरणाचा फटका बसतो. थोडा पाऊस झाला तरी मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी, तळेगाव दशासर, जुना धामणगाव या मोठ्या गावांसह परिसरातील वीज चार ते चाप तास पूर्णपणे बंद राहते़ मागील अनेक वर्षीपासून तुटलेले ताऱ गंजलेले खांब, व वाढणारा विद्युत दाब यामुळे हे प्रकार घडत आहे. वीज कंपनीने या पावसाळ्यात तरी ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळणे बंद करावे, असे नागरिकांनी म्हटले आहे.प्रत्यक्ष कामाची गरजआपत्ती व्यवस्थापनमध्ये तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, पोलीस पाटील, यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. परंतु प्रशासकीय कर्मचारी पावसाळ्यातही आपल्या मुख्यालयी उपस्थित नसल्याने अनेकांना मूलभूत सोयी त्यावेळी मिळत नाही़ मुख्यालयी उपस्थित राहण्यासाठी दरवर्षी प्रशासकीय यंत्रनेच्यावतीने संबंधित कर्मचाऱ्यांना पत्रव्यवहार केला जात असला तरी या पत्रांना अनेक कर्मचारी केराची टोपली दाखवीत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत़ग्रामीण भागात वाढते आजाराचे प्रमाणउन्हाळ्यात घराशेजारी असलेले शेणखते गावाबाहेर आपल्या शेतात टाकणे गरजेचे असताना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे शेणखताचे ढिगारे पावसाळ्यातही अनेकांच्या घरासमोर पहावयास मिळते़ पावसाचे पाणी या ढिगाऱ्यात शिरल्यानंतर दुर्गंधी व डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. पावसाळ्यात चिकनगुनीया या रोगाने तालुक्यात थैमान घालून चार लोकांचा बळी घेतला होता़ ग्रामीण भागात या बाबीमुळे आजाराचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे दिसत आहे़