शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

बारावीचा निकाल ५ ऑगस्टपर्यंत हाेणार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. आता बारावीचा निकाल जाहीर करण्याचे नियोजन चालविले असून, ५ ...

अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. आता बारावीचा निकाल जाहीर करण्याचे नियोजन चालविले असून, ५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बारावीच्या मूल्यमापनास प्रारंभ झाला आहे. अंतिम निकाल बोर्ड जाहीर करणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन गुण पाठविण्यासाठी शनिवारपासून लिंक खुली करून दिली आहे. दहावीचे ३० गुण, अकरावी ३० गुण, तर बारावीचे ४० गुण अशा १०० गुणांच्या आधारे कनिष्ठ महाविद्यालयांना निकालाचे मू्ल्यमापन करून गुण पाठवावे लागणार आहेत. बारावीत विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिकवणी, मौखिक चाचणी, अंतर्गत परीक्षा, ऑनलाईन परीक्षा आदींचा आधार घेत कनिष्ठ महाविद्यालयांना मूल्यमापन करून गुण पाठवावे लागतील. कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी शाखांसाठी ही समान नियमावली असणार आहे. बोर्डाने बारावीची परीक्षा घेतली नसली तरी मूल्यमापनात कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असे निकालाचे सत्र ठरविण्यात आले आहे.

विशेषत: गुणी विद्यार्थ्यांची दहावी, अकरावी व बारावीतील क्षमता लक्षात घेऊन कनिष्ठ महाविद्यालयांना निकाल जाहीर करावा लागणार आहे. अमरावती जिल्ह्यात बारावीच्या ३५ हजार १४६ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा लागणार आहे. यात मुले २८ हजार ४०४, तर मुली १६ हजार ७४२ एवढ्या आहेत.

-----------------

असे आहेत बारावीचे विद्यार्थी

शाखा नियमित रिपिटर

विज्ञान १२७७० २७७

कला १२२६२ १०७७

वाणिज्य ३७११ १०७

एमसीव्हीसी ४५०३ ४२२

------------------

कोट

शनिवारपासून बारावीच्या मूल्यमापनास प्रारंभ झाला आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना गुण पाठविण्यासाठी लिंकदेखील खुली झाली आहे. वस्तुनिष्ठ आधारावर कनिष्ठ महाविद्यालयांना गुण पाठवावे लागणार आहे.

- जयश्री राऊत, सहसचिव, राज्य शिक्षण मंडळ, अमरावती.