शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

बारावीचा निकाल ५ ऑगस्टपर्यंत हाेणार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. आता बारावीचा निकाल जाहीर करण्याचे नियोजन चालविले असून, ५ ...

अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. आता बारावीचा निकाल जाहीर करण्याचे नियोजन चालविले असून, ५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बारावीच्या मूल्यमापनास प्रारंभ झाला आहे. अंतिम निकाल बोर्ड जाहीर करणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन गुण पाठविण्यासाठी शनिवारपासून लिंक खुली करून दिली आहे. दहावीचे ३० गुण, अकरावी ३० गुण, तर बारावीचे ४० गुण अशा १०० गुणांच्या आधारे कनिष्ठ महाविद्यालयांना निकालाचे मू्ल्यमापन करून गुण पाठवावे लागणार आहेत. बारावीत विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिकवणी, मौखिक चाचणी, अंतर्गत परीक्षा, ऑनलाईन परीक्षा आदींचा आधार घेत कनिष्ठ महाविद्यालयांना मूल्यमापन करून गुण पाठवावे लागतील. कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी शाखांसाठी ही समान नियमावली असणार आहे. बोर्डाने बारावीची परीक्षा घेतली नसली तरी मूल्यमापनात कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असे निकालाचे सत्र ठरविण्यात आले आहे.

विशेषत: गुणी विद्यार्थ्यांची दहावी, अकरावी व बारावीतील क्षमता लक्षात घेऊन कनिष्ठ महाविद्यालयांना निकाल जाहीर करावा लागणार आहे. अमरावती जिल्ह्यात बारावीच्या ३५ हजार १४६ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा लागणार आहे. यात मुले २८ हजार ४०४, तर मुली १६ हजार ७४२ एवढ्या आहेत.

-----------------

असे आहेत बारावीचे विद्यार्थी

शाखा नियमित रिपिटर

विज्ञान १२७७० २७७

कला १२२६२ १०७७

वाणिज्य ३७११ १०७

एमसीव्हीसी ४५०३ ४२२

------------------

कोट

शनिवारपासून बारावीच्या मूल्यमापनास प्रारंभ झाला आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना गुण पाठविण्यासाठी लिंकदेखील खुली झाली आहे. वस्तुनिष्ठ आधारावर कनिष्ठ महाविद्यालयांना गुण पाठवावे लागणार आहे.

- जयश्री राऊत, सहसचिव, राज्य शिक्षण मंडळ, अमरावती.