शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जिल्हा परिषदेत बदल्यांचा बिगूल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:11 IST

अमरावती : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची ...

अमरावती : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत १० टक्के प्रशासकीय आणि ५ टक्के विनंती बदल्या ३१ जुलैपर्यंत व त्यानंतर १० टक्के विशेष बदल्या आयुक्तांच्या मान्यतेने १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शासन आदेशानुसार जिल्हा परिषद सीईओंनी झेडपीच्या गट ‘क‘ आणि गट ‘ड‘च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी १५ जुलै रोजी प्रशासकीय कामकाजाची कार्यसूची जाहीर केली आहे. त्यामुळे मिनीमंत्रालयात बदलीची धूम राहणार आहे.

दरवर्षी जून पूर्वी बदल्यांची प्रक्रिया पार पडते. मात्र, यावर्षी कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने काही अपवाद वगळता इतर सर्व प्रकारचे बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती दिली होती. त्यामुळे गत वर्षीप्रमाणे यंदाही बदल्या होणार नाहीत, असा अंदाज असताना सामान्य प्रशासन विभागाने बदलांबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्रामविकास विभागाने १५ टक्के सामान्य बदल्यांची परवानगी जिल्हा परिषदेला दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १६ ते २२ जुलै पर्यंत बदली प्रक्रियेसाठीची आवश्यक कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर २६ जुलैपासून प्रत्यक्ष बदली प्रक्रियेचे समुपदेश होणार असल्याची माहिती आहे.

बॉक्स

बदली प्रक्रियेची कार्यसूची जाहीर

जिल्हा परिषद कर्मचारी बदलीप्रक्रियेसाठी संवर्गनिहाय अंतरिम एकत्रित वास्तव्य सेवाज्येष्ठता यादी तयार करून प्रसिध्द करणे १६ जुलै, विनंती अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १९ जुलै, अंतिम वास्तव्य सेवाज्येष्ठता यादीवर आक्षेप व सूचना मागविणे २० जुलै, आक्षेप व सूचनांचे निराकरण करून अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे २२ जुलै याप्रमाणे बदली प्रक्रियेची कार्यसूची सीईओंनी जाहीर केली आहे.

बॉक्स

२६ ते २८ जुलै दरम्यान बदल्या?

जिल्हा परिषदेत वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्याची कारवाई सुरू केली आहे. १६ ते २२ जुलैपर्यंत बदल्यासंदर्भात प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे. यानंतर २६ ते २८ जुलैपर्यंत बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रत्यक्ष कार्यवाही समुपदेशनाव्दारे पार पडणार असल्याचे संकेत आहेत.