शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

वायगावनजीक धावता ट्रक पेटला

By admin | Updated: May 26, 2017 01:38 IST

धावत्या ट्रकने अकस्मात पेट घेतल्याने ट्रकमधील कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या. यामध्ये अंदाजे एक लाखाची

दोघे बचावले : रुईच्या गाठी भस्मसातलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धावत्या ट्रकने अकस्मात पेट घेतल्याने ट्रकमधील कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या. यामध्ये अंदाजे एक लाखाची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना वायगाव-आष्टी मार्गावर गुरूवारी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. ट्रक क्रमांक एच.आर. ६१ ए.१८३९ वलगाववरून आष्टीकडे निघाला होता. वायगाव फाट्यानजीक अचानक ट्रकमधून धूर निघत असल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आले. त्याने लगेच ट्रक थांबविला. परंतु रूईच्या गाठी पेटल्या होत्या. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती वलगाव पोलीस व अमरावती अग्निशमन दलाला देण्यात आली. बंब पोहोचेपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता. वलगावचे ठाणेदार गजानन मेहत्रे, रमेश पखाले, राजेश राठोड, काशिनाथ पंधरे, राम बागडे, अतुल संभे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ‘द बर्निंग ट्रक’ पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. ट्रकमध्ये चालकासह आणखी एक जण होता. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. हा ट्रक कोणत्या जिनिंग प्रेसिंगमधून आला होता, याची माहिती वृत्त लिहेस्तावर मिळू शकली नाही. पुढील तपास ठाणेदार गजानन मेहत्रे करीत आहेत.