शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

आदिवासी, अशिक्षितांच्या जुन्या नोटा कचऱ्यासमान

By admin | Updated: February 15, 2017 00:10 IST

केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा आदेश जारी केला व जुन्या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्याचे आदेश दिले होते.

रिझर्व्ह बँकेचाही नकार : गरिबांची जबाबदारी शासन घेणार का?संजय खासबागे वरूडकेंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा आदेश जारी केला व जुन्या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्याचे आदेश दिले होते. यानंतरही राहिलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा कराव्यात, असे सांगण्यात आले होते. परंतु आदिवासी ग्रामीण भागातील शेतमजूर, शेतकऱ्यांना खेड्यातून शहरात येऊन या नोटा बँकामध्ये जमा करणे शक्य झाले नसल्याने ३१ तारखेनंतरसुद्धा त्यांच्याकडेच राहिल्या. आता रिझर्व्ह बँकही या नोटा स्वीकारत नसल्याने हजारोंचा फटका बसत आहे. आता या गरिबांची जबाबदारी घेणार तरी कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नोटाबंदीचे विपरीत परिणाम जाणवत असल्याचा सूर उमटत आहे. ३१ डिसेबरपर्यंत कोणत्याही राष्ट्रियीकृत बँकेत नोटा जमा करून बदलवून घेण्याचे आदेश मोदी सरकारने दिले होते. ग्रामीण भागासह, डोंगरदऱ्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मात्र हा निर्णय पचनी पडला नसून आजही त्यांच्याकडे हजार आणि पाचशेच्या नोटा कायम आहेत. शासनाने ३१ डिसेंबरनंतर रिझर्व्ह बँकेत बदलवून मिळणार, अशी घोषणा केली होती. परंतु जानेवारीपासून केवळ विदेशातून आलेल्या व्यक्तीच्या नोटा बदविल्या जात आहे. अनेकजण नागपूरच्या रिझर्व्ह बँकेत नोटा बदलविण्याकरिता गेले असता त्यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली गेली. त्यामुळे हे निरक्षर लोक आल्यापावली परतले. ग्रामीण भागातील म्हाताऱ्या, अशिक्षित, शेतमजूर, शेतकऱ्यांना या निर्णयाचा जबर फटका बसला आहे. विविध कारणांनी ग्रामीण भागातील लोकांनी नोटा जमविल्या होत्या.लोकप्रतिनिधींनीही फिरवली पाठग्रामीण भागातील निरक्षर, अज्ञानी लोकांना नोटाबंदीचा फटका बसला. परंतु त्यांच्या बाजूने भांडण्याकरिता कोणताही लोकप्रतिनिधी समोर आला नाही. प्रत्येकजण आपापली पोळी शेकण्यात व्यस्त आहे. आता तर निवडणुकीचे वातावरण असल्याने गरिबांना कुणीच वाली राहिलेला नाही.