शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून जनजाती सल्लागार परिषदेची बैठकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:15 IST

अमरावती - राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ‘जनजाती सल्लागार परिषदेची’ बैठकच झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

अमरावती - राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ‘जनजाती सल्लागार परिषदेची’ बैठकच झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून जनजाती सल्लागार परिषदेची बैठक घेण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचितील भाग - ख मधील परिच्छेद ४ (१) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातील विचारलेल्या विषयांच्या बाबतीत राज्यपालांना सल्ला देण्यासाठी जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे. या परिषदेचे पुनर्गठन २३ जुलै २०२० रोजी करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून यात राज्यातील २५ आदिवासी आमदार व ४ खासदार आणि आदिवासी संबंधी तज्ज्ञ म्हणून आणखी दोघांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून या परिषदेची एकही बैठक झालीच नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे अनुसूचित क्षेत्रातील रिक्त जागांची रखडलेली भरती, गैरआदिवासींनी बळकावलेल्या जागांची विशेष भरती मोहीम, आदिवासींचे विस्थापन, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, वर्षानुवर्षे जात पडताळणीची प्रलंबित प्रकरणे, आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू प्रकरणे, भूसंपादन, गैरआदिवासींनी आदिवासींच्या बळकावलेल्या जमिनी, पेट्रोल पंप, सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणात आदिवासींच्या बाजूने दिलेले महत्त्वपूर्ण निर्णय त्याची अंमलबजावणी न होणे, आदी समस्यांवर चर्चा होत नसल्याने आदिवासी समाजात प्रचंड असंतोष आहे.

-------------

बॉक्स

राष्ट्रीय जनजाती आयोगाने २०१२ च्या अहवालात सूचना केल्यानुसार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर १ महिन्याच्या आत जनजाती सल्लागार परिषदेचे पुनर्गठन होणे अपेक्षित आहे. वर्षातून किमान ४ बैठका झाल्या पाहिजे. पण राज्यात ७ महिने उशिराने परिषदेचे पुनर्गठन झाले. पुनर्गठन होऊनही १४ महिने झाले, तरी अजूनपर्यंत एकही बैठक नाही. विशेष म्हणजे २ वर्षांपासून जनजाती सल्लागार परिषदेची बैठक घेण्यातच आली नाही.

--------------------

सरकारकडून आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. हे सरकारचे अपयश असून आदिवासी समाजाचे दुर्भाग्य आहे. आदिवासी समाजाचे प्रश्न निकाली लागावे म्हणून जनजाती सल्लागार परिषदेची बैठक घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

- डॉ. संदीप धुर्वे, आमदार, आर्णी-केळापूर