शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

दोन वर्षांपासून जनजाती सल्लागार परिषदेची बैठकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:15 IST

अमरावती - राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ‘जनजाती सल्लागार परिषदेची’ बैठकच झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

अमरावती - राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ‘जनजाती सल्लागार परिषदेची’ बैठकच झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून जनजाती सल्लागार परिषदेची बैठक घेण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचितील भाग - ख मधील परिच्छेद ४ (१) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातील विचारलेल्या विषयांच्या बाबतीत राज्यपालांना सल्ला देण्यासाठी जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे. या परिषदेचे पुनर्गठन २३ जुलै २०२० रोजी करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून यात राज्यातील २५ आदिवासी आमदार व ४ खासदार आणि आदिवासी संबंधी तज्ज्ञ म्हणून आणखी दोघांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून या परिषदेची एकही बैठक झालीच नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे अनुसूचित क्षेत्रातील रिक्त जागांची रखडलेली भरती, गैरआदिवासींनी बळकावलेल्या जागांची विशेष भरती मोहीम, आदिवासींचे विस्थापन, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, वर्षानुवर्षे जात पडताळणीची प्रलंबित प्रकरणे, आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू प्रकरणे, भूसंपादन, गैरआदिवासींनी आदिवासींच्या बळकावलेल्या जमिनी, पेट्रोल पंप, सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणात आदिवासींच्या बाजूने दिलेले महत्त्वपूर्ण निर्णय त्याची अंमलबजावणी न होणे, आदी समस्यांवर चर्चा होत नसल्याने आदिवासी समाजात प्रचंड असंतोष आहे.

-------------

बॉक्स

राष्ट्रीय जनजाती आयोगाने २०१२ च्या अहवालात सूचना केल्यानुसार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर १ महिन्याच्या आत जनजाती सल्लागार परिषदेचे पुनर्गठन होणे अपेक्षित आहे. वर्षातून किमान ४ बैठका झाल्या पाहिजे. पण राज्यात ७ महिने उशिराने परिषदेचे पुनर्गठन झाले. पुनर्गठन होऊनही १४ महिने झाले, तरी अजूनपर्यंत एकही बैठक नाही. विशेष म्हणजे २ वर्षांपासून जनजाती सल्लागार परिषदेची बैठक घेण्यातच आली नाही.

--------------------

सरकारकडून आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. हे सरकारचे अपयश असून आदिवासी समाजाचे दुर्भाग्य आहे. आदिवासी समाजाचे प्रश्न निकाली लागावे म्हणून जनजाती सल्लागार परिषदेची बैठक घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

- डॉ. संदीप धुर्वे, आमदार, आर्णी-केळापूर