शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

धामणगावात ३५ मध्ये त्रिकोणी, १८ ग्रामपंचायतींमध्ये दुहेरी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:11 IST

४२८ जागांवर निवडणूक, प्रचार आटोपला, ८७ हजार ५४६ मतदारांच्या बोटाला लागणार शाई मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५३ ...

४२८ जागांवर निवडणूक, प्रचार आटोपला, ८७ हजार ५४६ मतदारांच्या बोटाला लागणार शाई

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी त्रिकोणी संघर्ष आहे, तर १८ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवार आमने-सामने लढत देत आहेत. दरम्यान, ८७ हजार ५४६ मतदारांनी १ हजार ९९ उमेदवारापैकी ४२८ सक्षम उमेदवार निवडून देण्याची, तर ६७१ उमेदवाराला पराभूत करण्याची यादी तयार केली आहे. मतदान १५ जानेवारीला आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यात गत पाच दिवसांत अनेक गावांत संघर्षमय, तर काही गावांत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुकीचा प्रचार आटोपला. एकीकडे पाच वर्षांत सत्ताधारी गटाने केलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे विरोधी गटाने मतदारांसमोर मांडले, तर सत्तेत असलेल्या गटाने आतापर्यंत केलेल्या विकासाची उदाहरणे मतदारांना पुराव्यासहित दिली आहेत. पाच वर्षांत गावात कोणता विकास करणार आहोत, शासनाच्या कोणत्या योजना आणणार आहोत, असे प्रसिद्ध केलेेले जाहीरनामे दोन्ही गटांनी मतदारांसमोर ठेवले आहे विशेष म्हणजे, काही गावांत उमेदवारांनी एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यावर टीकेची झोड प्रचारादरम्यान उठवली असल्याचे प्रचारादरम्यान दिसले.

या गावांमध्ये रंगला तिहेरी संघर्ष

तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, जुना धामणगाव, तळेगाव दशासर, भातकुली देवगाव, अंजनसिंगी, जळगाव आर्वी, पिंपळखुटा, कावली, वरूड बगाजी, विरुळ रोंघे, जळका पटाचे, विटाळा, चिंचपूर, निंभोरा राज, वडगाव राजदी, हिंगणगाव, बोरगाव धांदे, सोनेगाव खर्डा यांसह ३५ गावांत त्रिकोणी संघर्ष निर्माण झाला आहे. या गावांत प्रत्येकी तीन गट निवडणूक लढत आहेत. अपक्ष उमेदवारांची त्यात भर पडली आहे.

---------------

माजी प्राचार्यांचे पॅनेल

कावली येथे माजी प्राचार्यांनी या निवडणुकीत पॅनेल टाकून निवडणुकीत रंगत आणली आहे. नऊ जागांसाठी पिंपळखुटा येथे तब्बल ४२ उमेदवार रिंगणात असल्याने विकास करणाऱ्या उमेदवाराला येथील मतदार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून देणार आहे.

-------------

१८ गावांमध्ये दुहेरी लढत, नायगावात एका जागेसाठी तीन उमेदवार

तालुक्यात आदर्श ठरलेल्या ग्रामपंचायत झाडा येथे पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. तब्बल पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नायगाव येथील सहा जागा अविरोध झाल्या, केवळ प्रभाग क्रमांक १ मध्ये एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे हे गाव शासनाच्या बक्षीस योजनेपासून वंचित झाले आहे. झाडगाव, तिवरा, दाभाडा दिघी महल्ले, निंबोली, निंभोरा राज, पेठ रघुनाथपुर, बोरवघड, बोरगाव निस्ताने, रायपूर कासारखेड, वकनाथ, वसाड, वाठोडा बुद्रुक, कळाशी, उसळगव्हाण, आजनगाव, कामनापूर घुसळी, जळगाव, तळणी वाघोली, वाढोणा, ढाकूलगाव, अशोकनगर, गव्हा निपाणी, गव्हा फरकाडे, शिंदोडी, शेंदूरजना खुर्द, सावळा, हिरपूर येथे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी दोन गटांत ही निवडणूक आहे.

---------------

६७१ उमेदवार झाले निश्चित

तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमधील १ हजार ९९ उमेदवारांपैकी ४२८ योग्य व गावाचा विकास करणाऱ्या उमेदवारालाच मतदार निवडून देणार आहेत, तर ६७१ उमेदवाराचा पराभूत होणार आहे. विजयी व पराभूत करणाऱ्या उमेदवारांची यादी मतदानाला २४ तास शिल्लक असताना मतदारांकडे निश्चित झाली आहे. १८० मतदार केंद्रांवर ४४ हजार ७८५ पुरुष व ४२ हजार ७६१ महिला अशा ८७ हजार ५४६ मतदारांच्या बोटाला या ग्रामपंचायत निवडणुकीत शाई लागणार आहे.