शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

पावसासाठी झाडपत्तीचा धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:08 IST

पावसाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकºयांच्या आशा आता मावळू लागल्या आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांचा अभिनव प्रयोग : सोडियम कार्बाईडच्या संयुगाने पाऊस पाडण्याचा प्रयत्न

नंदकिशोर इंगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपापळ : पावसाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकºयांच्या आशा आता मावळू लागल्या आहेत. मात्र, तरीही बळीराजाने हार मानलेली नाही. नैसर्गिकरित्या पाऊस पडत नसेल तर कृत्रिम पाऊस पाडण्याकरिता अनोखा प्रयोग नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंप्री निपाणी आणि हिवरा (मुरादे) येथील शेतकºयांनी त्यांच्या गावात केला. मीठ, रूईची पाने, उंबराच्या झाडाची पाने, गोंधन, दुधी, राख आणि वाळलेल्या पºहाटीचा धूर त्यांनी आकाशात सोडला.यामुळे एकदा तुरळक पाऊस आला. पण, त्यानंतर पुन्हा हा प्रयोग यशस्वी झाला नाही.यंदा पावसाने सुरूवातीला थोडकी हजेरी लावली आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला तो कायमचाच. प्रतीक्षा करून-करून थकलेल्या शेतकºयांनी हवामान खात्यावर भिस्त ठेऊन पेरण्याही करून टाकल्या. पण, वरूणराजा काही बरसला नाही. परिणामी शेतकºयांना कर्जबाजारी होऊन दुबार-तिबार पेरणी करावी लागली.काहींची पेरणी साधली. ज्यांची पेरणी साधली त्यांची पिके आता अखेरच्या टप्प्यात आहेत. मात्र, मागील २५ दिवसांपासून वरूणराजा रूसल्याने ही पिके वाचविण्याचे आव्हान शेतकºयांसमोर आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीतील आर्द्रता पूर्णत: नाहीशी झाल्याने पिके वाचविण्याकरिता शेतकरी सैरभैर झाले असून मिळेल ते प्रयोग करीत आहेत. कृत्रिम पावसाच्या या प्रयोगाने पाऊस पडेल आणि पिकांना नवसंजीवनी मिळेल, या आशेने येथील शेतकºयांनी पाऊस पाडण्यासाठी हा प्रयोग केला. पाण्याचे बाष्पीभवन होऊन हवेपेक्षा हलकी झालेली पाण्याची वाफ आकाशात जाते. आकाशात गोळा झालेल्या ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाईड, पोेटॅशियम आयोडाईड, ड्राय आॅईलचे (सॉलीड कार्बन डाय आॅक्साईड) कंपाऊंड वाफेत मिसळल्यास वाफेची घनता हवेपेक्षा जड होते आणि गारवा निर्माण झाल्याने पाऊस पडतो, असे प्रबोधन ज्युनियर कॉलेजचे रसायनशास्त्र विभागप्रमुख अमोल ढोले म्हणाले.कृत्रिम पाऊस पाडणारे रडार यंत्रपिंप्री (निपाणी), हिवरा (मुरादे) येथील शेतकºयांनी वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाययोजना केल्यात. धोंडी काढल्यात, सामूहिक धार्मिक कार्यक्रम, जलाभिषेक करून साकडे घालण्यात आले. परंतु पाऊस पडला नाही. शेवटी धुराच्या माध्यमातून पावसाचा प्रयोग करण्यात आला. यातील मीठ व वनस्पतींच्या संयोगातून सोडियम कार्बाईडची निर्मिती होते आणि त्यामुळे पाऊस बरसतो, असा त्यामागील शास्त्रीय तर्क आहे. कृत्रिम पाऊस पाडणाºया रडार यंत्रातही या रासायनिक क्रियेचा वापर करण्यात आला होता, असे गावकºयांचे म्हणणे आहे. आकाशात ढगांची गर्दी नसल्याने याप्रयोगाने गावकºयांची अपेक्षापूर्ती झाली नाही. एकदाच काय तो तुरळक पाऊस पडला. त्यानंतर त्याअनुभवासाठी गावकरी पुन्हा-पुन्हा तो प्रयोग करून पाहात आहेत. याप्रयोगासाठी पुढाकार घेणाºयांमध्ये सरपंच विशाल रिठे, राजीव धार्मिक, शुभम अतकरी, गणेश रिठे, प्रफुल्ल बोथरा, राजीव बोथरा, प्रदीप कुकडे, प्रल्हाद ढगे, पुरुषोत्तम इंगळे यांचा सहभाग होता.मीठ अर्थात सोडियम क्लोराईड या रासायनिक पदार्थात काही विशिष्ट रासायनिक पदार्थ मिसळून कृत्रिम पाऊस पाडला जातो. पापळच्या प्रयोगात वनस्पतींच्या धुरापासून तसले घटक निर्माण होत असेल तर पाऊस पडण्याची शक्यता आहे, तथापि त्याबाबत प्रयोगशाळेतील निरीक्षणांतीच अचूक बोलता येईल.- प्रा. अमोल ढोलेरसायनशास्त्र विभागप्रमुख