शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
4
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
5
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
6
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
7
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
8
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
9
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
10
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
11
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
12
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
13
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
14
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
15
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
16
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

वृक्ष लागवडीचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: May 25, 2017 00:10 IST

शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले.

नांदगावात झालेच नाही रोपट्यांचे संवर्धन : पाण्याअभावी झाडे सुकली, लाखोंचा खर्च वायालोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, ही वृक्ष लागवड केवळ ‘फोटोसेशन’पुरती मर्यादित राहिल्याने तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. पाण्याअभावी बहुतांश झाडे सुकली असून तालुक्यात वृक्ष लागवड योजना फसल्याचे दिसून येत आहे.प्रशासकीय पातळीवर तहसील कार्यालयाला १३३९३ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते तर नगरपंचायतीला ५०० झाडांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. सन २०१५-१६ च्या वृक्ष लागवड योजनेत तहसील कार्यालयामार्फत८३०० झाडे लावण्यात आली तर नगर पंचायतीच्यावतीने सुद्धा ५०० झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे पंचायत समितीमार्फत देखील काही प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. तालुक्यातील बहुतांश गावांत तसेच नांदगाव शहरात राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा वृक्षलागवड केली. परंतु वृक्षारोपणानंतर याझाडांच्या संगोपनाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजनेतील एकही झाड जिवंत नसल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने मोठा आटापिटा केला. परंतु प्रशासकीय पातळीवर योजनेला ठेंगा दाखविला जात असल्याने शासनाच्या आदेशाला प्रशासन कसा हरताळ फासत आहे, ही बाब यावरून निदर्शनास येते. पर्यावरणाशी संबंधित संभाव्य धोका टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वृक्षलागवड योजनेतच जर प्रशासन हलगर्जीपणा करीत असेल तर योजनेचा उद्देश कसा सफल होणार, हा प्रश्नच आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे पद मागिल काही दिवसांपासून रिक्त असल्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजनेची ऐशीतैशी झाली आहे. २०१७-१८ मध्ये मिळेल का योजनेला यश ?सन २०१७-१८ मध्ये सुद्धा वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर शासनाची दिशाभूल होऊ नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निव्वळ वृक्ष लागवड करून होेणार नाही तर त्यांची जोपासना होणे सुद्धा गरजेचे आहे. अन्यथा सन २०१५-१६ च्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा ज्याप्रमाणे बट्ट्याबोळ झाला तशीच गत सन २०१७-१८ मध्ये झाल्यास योजनेचे पूर्णत: बारा वाजतील, हे निश्चित आहे. त्यामुळे सन २०१७-१८ ची वृक्ष लागवड प्रशासकीय अधिकारी यशस्वीपणे पार पाडतील का, याबाबत शंकाच आहे.