शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

वृक्ष लागवडीचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: May 25, 2017 00:10 IST

शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले.

नांदगावात झालेच नाही रोपट्यांचे संवर्धन : पाण्याअभावी झाडे सुकली, लाखोंचा खर्च वायालोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, ही वृक्ष लागवड केवळ ‘फोटोसेशन’पुरती मर्यादित राहिल्याने तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. पाण्याअभावी बहुतांश झाडे सुकली असून तालुक्यात वृक्ष लागवड योजना फसल्याचे दिसून येत आहे.प्रशासकीय पातळीवर तहसील कार्यालयाला १३३९३ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते तर नगरपंचायतीला ५०० झाडांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. सन २०१५-१६ च्या वृक्ष लागवड योजनेत तहसील कार्यालयामार्फत८३०० झाडे लावण्यात आली तर नगर पंचायतीच्यावतीने सुद्धा ५०० झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे पंचायत समितीमार्फत देखील काही प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. तालुक्यातील बहुतांश गावांत तसेच नांदगाव शहरात राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा वृक्षलागवड केली. परंतु वृक्षारोपणानंतर याझाडांच्या संगोपनाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजनेतील एकही झाड जिवंत नसल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने मोठा आटापिटा केला. परंतु प्रशासकीय पातळीवर योजनेला ठेंगा दाखविला जात असल्याने शासनाच्या आदेशाला प्रशासन कसा हरताळ फासत आहे, ही बाब यावरून निदर्शनास येते. पर्यावरणाशी संबंधित संभाव्य धोका टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वृक्षलागवड योजनेतच जर प्रशासन हलगर्जीपणा करीत असेल तर योजनेचा उद्देश कसा सफल होणार, हा प्रश्नच आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे पद मागिल काही दिवसांपासून रिक्त असल्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजनेची ऐशीतैशी झाली आहे. २०१७-१८ मध्ये मिळेल का योजनेला यश ?सन २०१७-१८ मध्ये सुद्धा वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर शासनाची दिशाभूल होऊ नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निव्वळ वृक्ष लागवड करून होेणार नाही तर त्यांची जोपासना होणे सुद्धा गरजेचे आहे. अन्यथा सन २०१५-१६ च्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा ज्याप्रमाणे बट्ट्याबोळ झाला तशीच गत सन २०१७-१८ मध्ये झाल्यास योजनेचे पूर्णत: बारा वाजतील, हे निश्चित आहे. त्यामुळे सन २०१७-१८ ची वृक्ष लागवड प्रशासकीय अधिकारी यशस्वीपणे पार पाडतील का, याबाबत शंकाच आहे.