शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: May 25, 2017 00:10 IST

शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले.

नांदगावात झालेच नाही रोपट्यांचे संवर्धन : पाण्याअभावी झाडे सुकली, लाखोंचा खर्च वायालोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, ही वृक्ष लागवड केवळ ‘फोटोसेशन’पुरती मर्यादित राहिल्याने तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. पाण्याअभावी बहुतांश झाडे सुकली असून तालुक्यात वृक्ष लागवड योजना फसल्याचे दिसून येत आहे.प्रशासकीय पातळीवर तहसील कार्यालयाला १३३९३ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते तर नगरपंचायतीला ५०० झाडांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. सन २०१५-१६ च्या वृक्ष लागवड योजनेत तहसील कार्यालयामार्फत८३०० झाडे लावण्यात आली तर नगर पंचायतीच्यावतीने सुद्धा ५०० झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे पंचायत समितीमार्फत देखील काही प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. तालुक्यातील बहुतांश गावांत तसेच नांदगाव शहरात राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा वृक्षलागवड केली. परंतु वृक्षारोपणानंतर याझाडांच्या संगोपनाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजनेतील एकही झाड जिवंत नसल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने मोठा आटापिटा केला. परंतु प्रशासकीय पातळीवर योजनेला ठेंगा दाखविला जात असल्याने शासनाच्या आदेशाला प्रशासन कसा हरताळ फासत आहे, ही बाब यावरून निदर्शनास येते. पर्यावरणाशी संबंधित संभाव्य धोका टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वृक्षलागवड योजनेतच जर प्रशासन हलगर्जीपणा करीत असेल तर योजनेचा उद्देश कसा सफल होणार, हा प्रश्नच आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे पद मागिल काही दिवसांपासून रिक्त असल्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजनेची ऐशीतैशी झाली आहे. २०१७-१८ मध्ये मिळेल का योजनेला यश ?सन २०१७-१८ मध्ये सुद्धा वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर शासनाची दिशाभूल होऊ नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निव्वळ वृक्ष लागवड करून होेणार नाही तर त्यांची जोपासना होणे सुद्धा गरजेचे आहे. अन्यथा सन २०१५-१६ च्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा ज्याप्रमाणे बट्ट्याबोळ झाला तशीच गत सन २०१७-१८ मध्ये झाल्यास योजनेचे पूर्णत: बारा वाजतील, हे निश्चित आहे. त्यामुळे सन २०१७-१८ ची वृक्ष लागवड प्रशासकीय अधिकारी यशस्वीपणे पार पाडतील का, याबाबत शंकाच आहे.