शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

यात्रा, मंदिर बंद; ‘पंढरपूर स्पेशल’ रेल्वे यंदाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

अमरावती : मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्यावतीने वारकऱ्यांच्या मागणीनुसार आषाढी एकादशीच्या पर्वावर अमरावती-पंढरपूर स्पेशल ट्रेन गत काही वर्षांपासून सुरू करण्यात ...

अमरावती : मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्यावतीने वारकऱ्यांच्या मागणीनुसार आषाढी एकादशीच्या पर्वावर अमरावती-पंढरपूर स्पेशल ट्रेन गत काही वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रकोपाने सलग दुसऱ्या वर्षी आषाढीत पंढरपूर रेल्वे स्पेशल धावणार नाही. यामुळे रेल्वे प्रशासनालाही लाखोंचा फटका बसला आहे.

पंढरपूर यात्रा ही विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी असते. मिळेल त्या वाहनांनी वारकरी पंढरपूर गाठतात आणि विठ्ठलाचे मनोभावे दर्शन करून परत येतात. नामदेव महाराज, ज्ञानेश्वरापासून तर आजतागायत ७५० वर्षांपासून वारीची पंरपरा चालत आली आहे. यापूर्वीची प्लेगची महामारी आली. मात्र, प्रशासनामध्येच एवढी जनजागृती नसल्याने त्यावेळीही वारी अव्याहत पार पडली. तथापि, दीड वर्षांमध्ये कोरोना संसर्गाने यात्रा रद्द झाल्या आणि मंदिरांची कुलपे उघडली गेली नव्हती. यंदा पंढरपूर येथे पालख्या एसटी बसने पाठविण्यात आल्या आहेत. भक्तांची गर्दी होणार नाही, याची काळजी शासन घेत आहे. त्यामुळे यात्रा भरणार नाही. एसटी बसही पंढरपूर यात्रेच्या अनुषंगाने धावण्यास मनाई करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे रेल्वे प्रशासनाने पंढरपूर विशेष ट्रेन रद्दचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी आषाढीत अमरावती व पंढरपूर येथून प्रत्येकी चार रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. यात वातानुकूलित, स्लीपर, सामान्य डबे असलेली पंढरपूर स्पेशल ट्रेन वारकऱ्यांसाठी चालविली जाते. प्रत्येक फेरीत दोन लाखांपेक्षा अधिक रेल्वेला उत्पन्न प्राप्त होतो. मात्र, पंढरपूर विशेष रेल्वे रद्द असल्याने मध्य रेल्वे भुसावळ विभागाला लाखोंचा फटका बसला आहे.

------------------

रेल्वे प्रवासाने विठुरायाचे दर्शन अल्पखर्चात

पंढरपूर येेथे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी, शेतकऱी आणि सामान्यांना रेल्वे गाडीचा प्रवासच परवडणारा आहे. सर्वसाधारण आसनाचे तिकीट ३०० रुपये आहे. रेल्वे गाडीचा सुखकर प्रवास असतो. कमी खर्चात पंढरीत विठ्ठलाचे दर्शन घेता येते. मात्र, यात्रा,मंदिर बंद असल्याने यंददेखील विरजन आले आहे.

- कैलासनाथ मोरे महाराज, वारकरी.

-----------------

रस्ते जागाेजागी उखडले आहेत. वाहनांचा प्रवास अलिकडे त्रासदायक ठरणारा आहे. त्यामुळे दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर रेल्वे गाडीने जातो. मात्र, गेल्या दोन वर्षापासून पंढरपूर यात्रेला जाता आले नाही. विठ्ठलाचे दर्शन दुर्लभ झाले आहे. यंदा तरी पंढरपूर विशेष रेल्वे सुरु होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही.

- पद्माकर किटे, विठ्ठल भक्त

--------------------

मध्य रेल्वे विभागाला आर्थिक फटका

कोरोनामुळे यंदाही पंढरपूर विशेष रेल्वे धावणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. दरवर्षी या गाडीला वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. चार फेऱ्यांमुळे रेल्वेला अधिक उत्पन्नही मिळते. मात्र, अमरावती- पंढरपूर विशेष रेल्वेअभावी आर्थिक फटका बसल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.