शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कचरा २५० टन प्रक्रिया शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:16 IST

शहरामध्ये दररोज २०० ते २५० टन कचरा गोळा होतो. त्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही. शहरवासीयांच्या आरोग्याशी निगडित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अद्यापही मुहूर्त गवसलेला नाही. २०१७-१८ च्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यस्थिती कथन करण्यात आली आहे.

ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापन केव्हा? : कचऱ्याचे विलगीकरण कागदावरच
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरामध्ये दररोज २०० ते २५० टन कचरा गोळा होतो. त्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही. शहरवासीयांच्या आरोग्याशी निगडित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अद्यापही मुहूर्त गवसलेला नाही.२०१७-१८ च्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यस्थिती कथन करण्यात आली आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने अमरावतीकरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. अनेक आजारांना यामुळे निमंत्रण दिले जात असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ओला व सुका असे वर्गीकरण न करता हा कचरा वाहनांद्वारे सुकळी कंपोस्ट डेपोत साठविला जात असल्याने तेथे कचऱ्याचा डोंगर उभा राहला आहे. तेथे सात ते आठ लाख टन कचरा प्रक्रियाविना पडला असून, त्यात दिवसाकाठी निघणाºया २०० ते २५० टन कचºयाची भर पडत आहे.सुकळी येथील कंपोस्ट डेपोची कचरा साठवणीची मर्यादा केव्हाच संपुष्टात आल्याने त्या भागातील रस्त्यावरही कचरा डम्प केला जात आहे. या ढिगामुळे सुकळी आणि लसनापूर येथील ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. दररोज निघणाऱ्या कचऱ्यासह सुकळीत साठवून ठेवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास तेथेही औरंगाबादप्रमाणे आगडोंब उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची अत्यंत निकड आहे.महापालिका हद्दीत नव्याने समविष्ट झालेल्या गावांमुळे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यात वाढ झाली आहे. सध्या कचऱ्यात ई-कचरा, घनकचरा, अन्नपदार्थ अशा विविध प्रकारच्या कचऱ्याचा समावेश आहे. मृत जनावरेही सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात येते. मागील १५ वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा तारू भरकटला आहे. यंदा घनकचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित न झाल्यास अमरावतीमध्येही कचऱ्याचा प्रश्न पेटण्याची दाट शक्यता आहे. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लागल्याने मोठ्या प्रमाणात साथीचे व जीवघेण्या आजारांचे रोगजंतू पसरू शकतात तसेच सुकळी व लगतच्या काही भागांतील पाण्याचे स्रोतदेखील दूषित होत असल्याचे निरीक्षण महापालिकेने नोंदविलेले आहे. महापालिका प्रशासनाने कचरा प्रश्न सोडवावा, अशी अमरावतीकरांची अपेक्षा आहे. कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंधनकारक आहे.प्रशासकीय मान्यता केव्हा?पर्यावरण विभागाकडे असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे तारू भरकटल्याने यंदा ती जबाबदारी स्वच्छता विभागाकडे देण्यात आली. या विभागाने एजन्सीच्या माध्यमातून ३८ कोटींचा डीपीआर बनविला. मात्र, आमसभेने डिसेंबरमध्येच मान्यता दिलेल्या या प्रकल्पाला नगरविकास विभागाची अद्यापही मान्यता मिळाली नाही. हा प्रकल्प प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात अडकला आहे.मजीप्रा, नीरी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास हिरवी झेंडी दिली आहे. नगरविकासची प्रशासकीय मान्यता अप्राप्त आहे.- अजय जाधववैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) महापालिका