शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक ठरते नागरिकांना डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सीमा पार करून ओव्हरलोड रेतीचे डंपर मोठ्या प्रमाणात तालुक्यात आणि जिल्ह्यात येतात . ओव्हरलोड रेती डंपर पहाटेपासून ...

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सीमा पार करून ओव्हरलोड रेतीचे डंपर मोठ्या प्रमाणात तालुक्यात आणि जिल्ह्यात येतात . ओव्हरलोड रेती डंपर पहाटेपासून प्रवास सुरु करून सकाळी नियोजित ठिकाणी पोहचतात . याकरिता रेती तस्करांचे विशेष पथक तैनात असून पोलीस महसूल आणि आरटीओला लाजवेल अशी पायलेटिंग करून'' रोड क्लिअर '' च्या सूचना देऊन वाहने पार करतात . मध्यप्रदेश सौंसर परिसरातून ३० ते ३५ तर कधी ४० टनांपर्यंत रेती भरून डंपर आणतात . रात्री ते डंपर मध्यप्रदेश हद्दीत उभी करून पहाटे साडेपाच वाजतापासून रेती तस्करांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुरु होते . वनविभागाच्या करवार नाका पासून सुरु होऊन पुढे आरटीओ चेक पोस्ट पार करून पुसला , वरुड , बेनोडा सुद्धा पार करून ते पुढे जातात . तर काहींनी डंपर वगळता बंद ट्रक मधून रेतीची वाहतूक करून प्रशासनाचीही दिशाभूल केल्या जाते . प्रशासन मात्र मूग गिळून अर्थ पूर्ण सेवा देत असल्याची चर्चा आहे . यामध्ये महसूल सह पोलीस सुद्धा गुंते असल्याचे सांगण्यात येऊन पहिले दर्श आरटीओचे घ्यावे लागत असल्याने परिवहन विभाग सुद्धा झोपलेला असल्याचे सांगण्यात येते . लॉक डाऊन मध्ये सर्व बंद असताना ओव्हरलोड रेती वाहतूक सुरु होती . सौंसर येथून महाराष्ट्रातील वरुड , मोर्शी , अमरावती , चांदूरबाजार , परतवाडा , अकोला पर्यंत येथून ओव्हरलोड रेतीची वाहतूक होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष केल्या जाते. तर महसुली पथक सुद्धा कुचकामी ठरत आहे . अधिकाऱयांच्या वरदहस्ताखाली रेती वाहतूकदाराचे चांगलेच फावत आहे . या रेती तस्करांना अभय कुणाचे हा प्रश्न आहे . रेती तस्कराचे अधिकाऱ्यांसोबत सूत जमवून देणारे दलाल कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे .दिवसाढवळ्या अवैध रेती तस्करी सुरु असताना आंधळ्या प्रशासनाला अवैध रेती वाहतुकदार दिसणार तरी कधी ? सर्वसामान्यांना त्रास देणारे , कायद्याचे धडे गिरवणारे अधिकारी रेती तस्करांना अभय का देतात अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे .

* प्रभारी तहसीलदारावर सुरु आहे तहसील कार्यालय !

येथील कार्यरत तहसीलदार किशोर गावंडे ३० मे ला सेवानिवृत्त झाले तेंव्हा पासून तहसीलदाराचा कारभार नायब तहसीलदार सांभाळत आहे . येथे कायमस्वरूपी तहसीलदार देण्यात यावा . तहसील कार्यालय रामभरोशे झाले असून कोविद ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही तर जबाबदार अधिकारीच नसल्याने तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला . यामुळे रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे .