शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक ठरते नागरिकांना डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सीमा पार करून ओव्हरलोड रेतीचे डंपर मोठ्या प्रमाणात तालुक्यात आणि जिल्ह्यात येतात . ओव्हरलोड रेती डंपर पहाटेपासून ...

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सीमा पार करून ओव्हरलोड रेतीचे डंपर मोठ्या प्रमाणात तालुक्यात आणि जिल्ह्यात येतात . ओव्हरलोड रेती डंपर पहाटेपासून प्रवास सुरु करून सकाळी नियोजित ठिकाणी पोहचतात . याकरिता रेती तस्करांचे विशेष पथक तैनात असून पोलीस महसूल आणि आरटीओला लाजवेल अशी पायलेटिंग करून'' रोड क्लिअर '' च्या सूचना देऊन वाहने पार करतात . मध्यप्रदेश सौंसर परिसरातून ३० ते ३५ तर कधी ४० टनांपर्यंत रेती भरून डंपर आणतात . रात्री ते डंपर मध्यप्रदेश हद्दीत उभी करून पहाटे साडेपाच वाजतापासून रेती तस्करांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुरु होते . वनविभागाच्या करवार नाका पासून सुरु होऊन पुढे आरटीओ चेक पोस्ट पार करून पुसला , वरुड , बेनोडा सुद्धा पार करून ते पुढे जातात . तर काहींनी डंपर वगळता बंद ट्रक मधून रेतीची वाहतूक करून प्रशासनाचीही दिशाभूल केल्या जाते . प्रशासन मात्र मूग गिळून अर्थ पूर्ण सेवा देत असल्याची चर्चा आहे . यामध्ये महसूल सह पोलीस सुद्धा गुंते असल्याचे सांगण्यात येऊन पहिले दर्श आरटीओचे घ्यावे लागत असल्याने परिवहन विभाग सुद्धा झोपलेला असल्याचे सांगण्यात येते . लॉक डाऊन मध्ये सर्व बंद असताना ओव्हरलोड रेती वाहतूक सुरु होती . सौंसर येथून महाराष्ट्रातील वरुड , मोर्शी , अमरावती , चांदूरबाजार , परतवाडा , अकोला पर्यंत येथून ओव्हरलोड रेतीची वाहतूक होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष केल्या जाते. तर महसुली पथक सुद्धा कुचकामी ठरत आहे . अधिकाऱयांच्या वरदहस्ताखाली रेती वाहतूकदाराचे चांगलेच फावत आहे . या रेती तस्करांना अभय कुणाचे हा प्रश्न आहे . रेती तस्कराचे अधिकाऱ्यांसोबत सूत जमवून देणारे दलाल कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे .दिवसाढवळ्या अवैध रेती तस्करी सुरु असताना आंधळ्या प्रशासनाला अवैध रेती वाहतुकदार दिसणार तरी कधी ? सर्वसामान्यांना त्रास देणारे , कायद्याचे धडे गिरवणारे अधिकारी रेती तस्करांना अभय का देतात अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे .

* प्रभारी तहसीलदारावर सुरु आहे तहसील कार्यालय !

येथील कार्यरत तहसीलदार किशोर गावंडे ३० मे ला सेवानिवृत्त झाले तेंव्हा पासून तहसीलदाराचा कारभार नायब तहसीलदार सांभाळत आहे . येथे कायमस्वरूपी तहसीलदार देण्यात यावा . तहसील कार्यालय रामभरोशे झाले असून कोविद ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही तर जबाबदार अधिकारीच नसल्याने तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला . यामुळे रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे .