शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक ठरते नागरिकांना डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सीमा पार करून ओव्हरलोड रेतीचे डंपर मोठ्या प्रमाणात तालुक्यात आणि जिल्ह्यात येतात . ओव्हरलोड रेती डंपर पहाटेपासून ...

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सीमा पार करून ओव्हरलोड रेतीचे डंपर मोठ्या प्रमाणात तालुक्यात आणि जिल्ह्यात येतात . ओव्हरलोड रेती डंपर पहाटेपासून प्रवास सुरु करून सकाळी नियोजित ठिकाणी पोहचतात . याकरिता रेती तस्करांचे विशेष पथक तैनात असून पोलीस महसूल आणि आरटीओला लाजवेल अशी पायलेटिंग करून'' रोड क्लिअर '' च्या सूचना देऊन वाहने पार करतात . मध्यप्रदेश सौंसर परिसरातून ३० ते ३५ तर कधी ४० टनांपर्यंत रेती भरून डंपर आणतात . रात्री ते डंपर मध्यप्रदेश हद्दीत उभी करून पहाटे साडेपाच वाजतापासून रेती तस्करांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुरु होते . वनविभागाच्या करवार नाका पासून सुरु होऊन पुढे आरटीओ चेक पोस्ट पार करून पुसला , वरुड , बेनोडा सुद्धा पार करून ते पुढे जातात . तर काहींनी डंपर वगळता बंद ट्रक मधून रेतीची वाहतूक करून प्रशासनाचीही दिशाभूल केल्या जाते . प्रशासन मात्र मूग गिळून अर्थ पूर्ण सेवा देत असल्याची चर्चा आहे . यामध्ये महसूल सह पोलीस सुद्धा गुंते असल्याचे सांगण्यात येऊन पहिले दर्श आरटीओचे घ्यावे लागत असल्याने परिवहन विभाग सुद्धा झोपलेला असल्याचे सांगण्यात येते . लॉक डाऊन मध्ये सर्व बंद असताना ओव्हरलोड रेती वाहतूक सुरु होती . सौंसर येथून महाराष्ट्रातील वरुड , मोर्शी , अमरावती , चांदूरबाजार , परतवाडा , अकोला पर्यंत येथून ओव्हरलोड रेतीची वाहतूक होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष केल्या जाते. तर महसुली पथक सुद्धा कुचकामी ठरत आहे . अधिकाऱयांच्या वरदहस्ताखाली रेती वाहतूकदाराचे चांगलेच फावत आहे . या रेती तस्करांना अभय कुणाचे हा प्रश्न आहे . रेती तस्कराचे अधिकाऱ्यांसोबत सूत जमवून देणारे दलाल कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे .दिवसाढवळ्या अवैध रेती तस्करी सुरु असताना आंधळ्या प्रशासनाला अवैध रेती वाहतुकदार दिसणार तरी कधी ? सर्वसामान्यांना त्रास देणारे , कायद्याचे धडे गिरवणारे अधिकारी रेती तस्करांना अभय का देतात अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे .

* प्रभारी तहसीलदारावर सुरु आहे तहसील कार्यालय !

येथील कार्यरत तहसीलदार किशोर गावंडे ३० मे ला सेवानिवृत्त झाले तेंव्हा पासून तहसीलदाराचा कारभार नायब तहसीलदार सांभाळत आहे . येथे कायमस्वरूपी तहसीलदार देण्यात यावा . तहसील कार्यालय रामभरोशे झाले असून कोविद ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही तर जबाबदार अधिकारीच नसल्याने तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला . यामुळे रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे .