शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

बडनेऱ्यात रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST

बडनेरा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवाशांची संख्या नगण्य झाल्याने रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. तथापि, संसर्ग कमी होत ...

बडनेरा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवाशांची संख्या नगण्य झाल्याने रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. तथापि, संसर्ग कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची गर्दी किंचित वाढल्याचे चित्र बुधवारी बडनेरा रेल्वे स्थानकावर पाहावयास मिळाली.

विदर्भातून मोठ्या संख्येत मुंबई-पुण्याकडे प्रवास होतो तसेच तिकडूनही अमरावती, नागपूरकडे येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत प्रचंड घट झाली. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासन रेल्वे प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. आरक्षित तिकिटांची सक्ती केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, गीतांजली, हावडा मेल, नवजीवन, हावडा-अहमदाबाद, हटिया आदी सुरू ठेवलेल्या मोजक्या गाड्या रिन्म्या धावत आहेत. एका बोगीत जेमतेम पाच ते दहा प्रवासी असल्याचे चित्र मागील महिन्यापासून आहे. आता राज्यात कोरोना संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्याने रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढल्याचे दिलासादायी चित्र बुधवारी दृष्टीस पडले. पहिल्या लाटेनंतर दिवाळीच्या जवळपास रेल्वे प्रवासी संख्येत वाढ झाली. बंद झालेल्या रेल्वेगाड्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली होती.

रेल्वे प्रशासनाच्या मते, अजूनही रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचा वानवा आहे. एखाद्याच गाडीवर गर्दी असते. अगदी वेळेवर प्रवाशांना रिझर्व्हेशन मिळत आहे. कोरोनाच्या धास्तीने प्रवासी रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणे टाळत आहेत.