शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
3
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
4
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
5
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
6
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
7
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
8
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
9
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
10
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
11
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
12
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
13
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
16
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
17
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
18
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
19
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
20
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका

ब्रह्मचर्येतूनच ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर

By admin | Updated: December 25, 2015 01:15 IST

सुश्री अलकाश्रीजी : रामकथा प्रवचनाला भाविकांची अलोट गर्दी

सुश्री अलकाश्रीजी : रामकथा प्रवचनाला भाविकांची अलोट गर्दी धामणगाव रेल्वे : रामायणातील सुंदर कांड म्हणजे जीवनात आनंद देणारा ठेवा आहे. भक्ती आणि देवांचे मिलन या सुंदरकांडमध्ये मारोतीरायांनी घडवून आणले आहे. यात ब्रह्मचर्येला विशेष महत्त्व दिले गेले आहे. ब्रह्मचर्य म्हणजेच ईश्वरप्राप्ती आहे, असे प्रतिपादन सुश्री अलकाश्रीजींनी केले. रामचंद्र भागचंद ट्रस्टच्या मैदानावर आयोजित श्रीराम कथेदरम्यान उपस्थित हजारोे, महिला, पुरूष व वृध्दांना त्या संबोधित करीत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, मानवाने अभिमान सोडून गुरूभक्ती करावी. गुरू भक्तीमुळे जीवन सफल होते. गुरूच्या संगतीमुळेच जीवन सुधारते. जोे गुरूंचा अपमान करतोे, ईश्वराबद्दल अपशब्द काढतो, त्याला गौहत्येचेच पातक लागते, असेही त्यांनी सांगितले. रावणाला त्याची पत्नी मंदोदरीसह वालीपूत्र अंगद याने वारंवार समजविले होते की, तू सीतामाईला मुक्त कर नाही तर नाश होील. परंतु अभिमानाने व्यापलेले मन असल्याने रावणाने ते मानले नाही. शेवटी रामाकडूनच त्याचा अंत झाला. सुंदरकाण्डाच्या ६० चौपार्इंना ३० विविध हिंदी व मराठी भक्तीगीतांमध्ये सामिल करून व त्यांचे गायन करून सुश्री अलकाश्रीजी यांनी उपस्थित भक्तांना मोहून टाकले. त्या म्हणाल्या की, ज्या व्यक्तिची जीभ रामनाम घेण्यास पुढे रेटत नाही त्या जिव्हेला काही अर्थ उरत नसतोे. सहाव्या व सातव्या दिवशीदेखील प्रवचनाचा लाभ घेण्याकरिता हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)