शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

२० खेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर तीन फूट माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST

नरेंद्र जावरे परतवाडा : अचलपूर शहरातील जगदंबा चौक ते रासेगाव मार्गावर निघणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर मातीचे तीन फुटांचे ढिगारे आल्याने ...

नरेंद्र जावरे परतवाडा : अचलपूर शहरातील जगदंबा चौक ते रासेगाव मार्गावर निघणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर मातीचे तीन फुटांचे ढिगारे आल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. या निसरड्या रस्त्यावर अनेकांना अपघात झाला. २० गावांना जोडणारा रस्ता चार दिवसांपासून बंद आहे. संबंधित शेतकऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असून, अचलपूर नगरपालिकेने यासंबंधी नोटीस बजावली आहे.

परतवाडा-अचलपूर शहरातील गांधी पूल, जगदंब मंदिर व सरमसपुरा पोलीस ठाणे, रासेगाव व परिसरातील २० गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर पोलीस ठाण्यानजीक उंच भागावर शेती असलेल्या शेतकऱ्याने सपाटीकरण करून कडेला लावलेल्या ढिगातील माती पाण्यामुळे रस्त्यावर आली. परिणामी हा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. चार दिवसांपूर्वी अचलपूर नगरपालिकेच्या सहायक रचनाकार मृणालिनी पाटील व संबंधित अभियंता यांनी पाहणी केली असता, हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

बॉक्स

अनेकांना अपघात, पोलीस मदतीला

पावसामुळे रस्ता चिखलमय झाला होता. त्यामुळे अनेकांना येथे अपघात झाला. त्यांना सरमसपुरा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व ठाणेदार जमील शेख यांनी उचलून मदत केली.

बॉक्स

अचलपूर नगर पालिकेच्यावतीने सहायक नगर रचनाकार मृणालिनी पाटील यांनी विनायक पिंपळकर या संबंधित शेतकऱ्याला नोटीस बजावली. रहदारीचा मार्ग बंद करणे हा गंभीर गुन्हा असून, तेथे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहे. त्यामुळे तात्काळ हा मार्ग मोकळा करून पाण्याची वाट दुसरीकडे काढण्याचे आदेश या नोटीसद्वारे अचलपूर नगरपालिकेने दिले. तसे न केल्यास पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे सुचविणार असल्याचे त्यात नमूद आहे.

कोट

संबंधित शेतकऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे. तत्काळ जेसीबीने रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसे न झाल्यास कारवाई करण्यात येईल.

- राजेंद्र फातले, मुख्याधिकारी, नगर परिषद, अचलपूर