शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमरावती : यंदाही जीव मुठीत घेऊनच विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार शिक्षणाचे धडे

By जितेंद्र दखने | Updated: May 24, 2023 18:49 IST

जिल्हाभरात १८७ शाळांतील ३३२ वर्गखोल्यांचा निर्लेखनाचा प्रस्ताव

अमरावती : नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात तोंडावर आली असताना निधीअभावी नवीन शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्येदेखील शिकस्त वर्गखोल्यांचे निर्लेखन व नवीन बांधकाम झाले नसल्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच शिक्षणाचे धडे घ्यावे लागणार आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या १८७ शाळांमधील ३३२ वर्गखोल्या धोकादायक असून, या वर्गखोल्यांपैकी ७१ वर्गखोल्यांचा अपवाद सोडला, तर २६१ वर्गखोल्यांचे निर्लेखन करून बांधकाम अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे.

खासगी शाळेचे लाेण वाढले असले तरी ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत फारसे पोहोचले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात व विशेषत: मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिक अजूनही आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचाच आधार आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी त्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे पूर्ण भरलेली आणि ज्या शाळांमध्ये मुलांची संख्या जास्त आहे त्या शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त व कमी असा विरोधाभास पाहावयास मिळतो.

यासोबतच ग्रामीण भागातील शाळांची अवस्थादेखील बिकट आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील १८७ शाळांतील ३३२ खोल्या धोकादायक बनल्या आहेत. तसा अहवाल शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. या वर्गखोल्या दुरुस्तीसाठी निधी लागणार आहे. तसा प्रस्ताव देण्यात आला आहे; परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. नवीन शैक्षणिक वर्षातदेखील धोकादायक वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घ्यावे लागणार आहे.तालुकानिहाय धोकादायक वर्गखोल्याअचलपूर २६, अमरावती २०, अंजनगाव सुर्जी ३४, भातकुली १०, चांदूर बाजार २६, चिखलदरा ११, चांदूर रेल्वे १२, दर्यापूर ४६, धारणी ४१, धामणगाव रेल्वे १४, मोर्शी १५, नांदगाव खंडेश्वर २८, तिवसा ०३, वरूड ४६ एकूण ३३२बांधकामकडून ७१ वर्गखोल्यांचे निर्लेखनजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिकस्त वर्गखोल्यांचे निर्लेखनाचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर केलेले आहेत. ३३२ वर्गखोल्यांपैकी ७१ खोल्यांच्या निर्लेखनास बांधकाम विभागाकडून पूर्वपरवानगी मिळाली आहे. याशिवाय ११६ परवानगी अद्याप मिळालेली नाही.गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिकस्त वर्गखोल्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागाने बांधकाम विभागाकडे निर्लेखनाच्या परवानगीसाठी पाठविले आहेत. या प्रक्रियेसोबतच नवीन बांधकामाकरिता शिक्षण विभागाचा पाठपुरावा सुरू आहे. निकडीने कामे प्राधान्याने घेतली आहेत. याशिवाय इतर वर्गखोल्यांची कामे करण्याच्या अनुषंगाने पत्रव्यवहार सुरू असून, निधी उपलब्ध होताच ही कामे केली जातील.प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी प्राथमिक

टॅग्स :Amravatiअमरावती