शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

-आता चोरट्यांचे लक्ष्य दागिने आणि मोबाईल !

By admin | Updated: November 16, 2016 00:11 IST

पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे चोरटेही सतर्क झाल्याचे दिसून येत आहेत.

चोरांचा नवा फंडा : पाचशे-हजारांच्या नोटांकडे पाठ अमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे चोरटेही सतर्क झाल्याचे दिसून येत आहेत. याचा अर्थ चोरीच्या घटना कमी झाल्यात असे नाही तर आता चोरटे दागिने आणि मोबाईलला लक्ष्य करीत आहेत. मागील काही दिवसांत घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये दागिन्यांसह मोबाईल चोरीच्या सर्वाधिक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे मागील पाच दिवसांमध्ये आयुक्तालय क्षेत्रातील चोरीच्या घटनांवर दृष्टीक्षेप टाकल्यास ही बाब प्रकर्षाने जाणवते. दोन दिवसांपूर्वी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या १.८८ लाखांच्या धाडसी घरफोडीतही चोरट्यांनी रोख रकमेऐवजी सोन्या-चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारला. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संपूर्ण देश एका वेगळ्या स्थित्यंतरातून जात आहे. पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या धक्कातंत्राने एकीकडे संपूर्ण देश हादरला असताना चोरटेही सतर्क झाले आहेत. आतापर्यंत चोरटेकेवळ रोकडच लंपास करीत होते. मात्र, पाचशे व हजारांच्या नोटा चोरल्यानंतर त्याबँकेत नेऊन बदलायच्या कशा, असा प्रश्न चोरट्यांना कदाचित पडला असावा आणि त्यामुळेच की काय, त्यांनी रोख रकमेऐवजी सोन्या-चांदीच्या दागदागिन्यांना लक्ष्य केले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या ‘डेली क्राईम रिपोर्ट’मधून ही बाब उघड झाली. या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नागरिकांनीही घरात नोटा ठेवणे बंद करणे, हे यामागचे एक कारण असू शकते. शहरातील बहुंताश नागरिक सध्या नोटा बँकेत जमा करण्यात व एक्सचेंज करण्यात मग्न आहेत. अनेक जण घराला कुलूप लाऊन नोटा जमा करण्यासाठी जात आहेत. यासंधीचा लाभ घेऊन चोरट्यांनी शहरात डझनावर चोऱ्या केल्या आहेत.