शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ बारुद गँगचे सदस्य

By admin | Updated: August 14, 2015 01:05 IST

रेती तस्करांच्या हल्ल्यात नाहक बळी पडलेल्या अमित बटाऊवाले या तरुणाच्या खुनानंतर कमालीची संतापलेली जुळी नगरी एव्हाना शांत वाटत असली तरी लोकमनातील खदखद कायमच आहे.

अचलपुरात खदखद : खुन्यांना अटक केव्हा?, पोलिसांचे होते छुपे बळ अमरावती/अचलपूर : रेती तस्करांच्या हल्ल्यात नाहक बळी पडलेल्या अमित बटाऊवाले या तरुणाच्या खुनानंतर कमालीची संतापलेली जुळी नगरी एव्हाना शांत वाटत असली तरी लोकमनातील खदखद कायमच आहे. हत्येच्या आरोपींची अचलपूर, परतवाडा शहरात ‘बारुद गँग’ असून त्याद्वारे ते दहशत निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. 'गुंडाराज' भासावा याप्रमाणे भरदिवसा शस्त्राने भोसकून तरुण अमितला ठार मारणाऱ्या तमाम खुन्यांना अचलपूर पोलीस कधी अटक करणार, असा संतप्त सवाल अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीत विचारला जात आहे. या आरोपींना अचलपूर पोलिसांचे छुपे बळ होते, अशी लोकभावना आता जुळ्या नगरीतील चौकाचौकांत व्यक्त होऊ लागली आहे. रेती तस्करीतून उद्भवलेल्या वादात नियोजनबध्द पद्धतीने बटाऊवाले पिता-पुत्रावर हल्ला करून अमितचा बळी घेणाऱ्या आरोपींमध्ये कुख्यात व सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांच्यावर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत. रेती तस्करीच्या मुद्यावरून बटाऊवाले कुटुंब आणि आरोपींमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. तस्करांच्या मनमानीला कंटाळलेल्या मोहन बटाऊवाले यांनी यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. रेती तस्करांपासून जिवाला असलेला धोका बटाऊवाले कुटुंबीयांना बऱ्याच दिवसांपासून जाणवत होता. शेवटी रेती तस्करांनी अमितचा बळी घेतलाच.यापूर्वीचे गुन्हे : दंगली भडकविणे, अवैध शस्त्र बाळगणे, हल्ला करणेपरतवाडा -अचलपूर शहरांतील विशिष्ट समाजाचे नेतृत्व स्वत:कडे ठेवण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण झाल्यास तिला खतपाणी देण्यात पुढाकार घेणे, असे कार्य या बारुद गँगचे होते. तसे गुन्हेही या आरोपींवर दाखल आहेत. २००७ मध्ये अचलपूर शहरात जातीय दंगल उसळली होती, त्यावेळी या आरोपींपैकी काहींवर पोलीस दप्तरी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंजनगाव येथे अवैधरीत्या शस्त्र बाळगण्याचे, परतवाडा येथील हॉटेल व्यावसायी प्रकाश मुंदे यांना हॉटेलात मारहाण केल्याचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे अमितच्या मारेकऱ्यांवर दाखल आहेत. रेती, गुटखा, रॉकेल तस्करीअचलपूर शहरातील ‘बारुद गँग’चे २०पेक्षा अधिक सदस्य असून एकाच परिवारातील १० ते १२ सदस्य या टोळीत असल्याची सूत्राची माहिती आहे. अलीकडच्या काळात रेती तस्करी हा या गँगचा मोठा व्यवसाय झाला होता. अवैध गुटखा विक्री, रॉकेलची अवैध विक्रीसुध्दा ही ‘बारुद गँग’ करीत होती. रेती तस्करीसाठी ठिकठिकाणी हप्ते दिले जात असल्याने त्यांची मुजोरी व दादागिरी बेलगाम होती, अशी चर्चा तोंडोतोंडी आहे. मुलींची छेड काढणाऱ्यांना मदत ‘बारुद गँग’ नामक युवकांची टोळी दहशत पसरविण्यासोबत मुलींची छेड काढणाऱ्या युवकांनासुध्दा मदत करीत असे, असा गंभीर आरोप अमितच्या मारेकऱ्यांवर जुळ्या नगरीतील नागरिक करीत आहेत. अमितच्या हत्येनंतर घराघरांत आता याच मुद्दाची चर्चा होत आहे. आरोपींची दहशत आणि त्यासंबंधीचे किस्से सर्वत्र चर्चिले जात आहेत. आरोपींविरुद्ध मोठा रोष जुळ्या नगरीत आहे. फरार आरोपी त्यांच्या गुन्हेगारी कारवायांचा हिसका दाखवतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. बजरंग दल देणार आज निवेदनअचलपूर शहरातील घटनेनंतर शुक्रवारी बजरंगदलातर्फे परतवाडा-अचलपूर शहर बंद करण्याचे निवेदन देण्यात आले होते. मात्र आता शुक्रवारी परतवाडा शहरातील वाघामाता मंदिर संस्थान येथे बजरंग दलाचे २०० च्यावर कार्यकर्ते एकत्र येऊन सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन देणार असल्याची माहिती आहे. जुळ्या नगरीत बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला, अशी माहिती बजरंग दलाचे अचलपूर जिल्हा संयोजक पवन जडीये यांनी दिली. अधिकाऱ्यांना तगडा हप्ताअमरावती/अचलपूर : हे अघटीत घडू शकणार असल्याची कुणकुण बटाऊवाले कुटुंबीयांना लागू शकते, तशी तक्रारही ते प्रशासनाला करतात, रेती तस्करी केलीच जात होती, असा भरवसा सारा गाव देतो, मग पोलीस प्रशासनाला हे का कळू नये? या संपूर्ण कालावधीत अचलपूरच्या ठाणेदारांची, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची हेर यंत्रणा काय करीत होती? अचलपूर संवेदनशील गाव असल्याचे अवघ्या अमरावती जिल्ह्याला माहिती आहे. अचलपूर पोलिसांच्याही लेखी ही माहिती असेलच. दोन धर्मांचे लोक या प्रकरणात सहभागी असल्याचे स्पष्ट असूनही अचलपूर पोलिसांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय का योजिले नाहीत? अमितचा जीव वाचविण्याच्या दिशेने पाऊले का उचलली नाहीत. रेतीच्या तस्करीबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आली होती. याचाच अर्थ असा की, हे प्रकरण बरेच ताणले गेले होते. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी तरीही याप्रकरणी ठोस उपाययोजना केली नाही. या रेती तस्करांकडून अचलपूर-परतवाड्यातील जबाबदार अधिकारी मोठ्या प्रमाणावर हप्ता वसुली करीत होते. त्यामुळे आरोपींना रान मोकळे झाले होते. या तमाम प्रकरणाची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी आणि सर्व दोषी ‘लाभार्थी’ अधिकाऱ्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी सामान्य जनता करु लागली आहे. प्रशासन, शासनाने घटनेचे गांभीर्य न ओळखल्यास नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. (प्रतिनिधी)ठाणेदारावर कारवाई का नाही?दिवसाढवळ्या अमित मारला गेला. प्रकरण अचानक घडलेले नाही. प्रशासन याबाबत अवगत होते. संवेदनशील गावात घडलेला हा प्रकार कायदा व सुव्यवस्था ऱ्हास पावल्याचे ज्वलंत उदाहरण होय. ठाणेदार सी.एम. बहादुरे यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल जागृक नागरिक विचारत आहेत. पोलिसांनी वेळेवर आवळल्या नाही मुसक्याअमित बटाऊवाले व मोहन बटाऊवाले यांच्यावर हल्ला करणाऱ्या शरीक रहेमान, नासीर हुसेन, मो. शाबाद मो. वाजीद, मो. शाकीर, मो. आबीद बादशाह, मो. माजीद, सह आदि आरोपी रेती तस्करी करीत असल्याच्या अनेक तक्रारी मोहन बटाऊवाले यांनी जिल्हा प्रशासन व महसूल मंत्र्यांपर्यंत पोहचविल्या होत्या. तरीसुध्दा पोलीस व महसूल प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई न केल्याने या रेती तस्करांची हिंमत वाढली. त्यातूनच ही भयंकर घटना घडल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे.