शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

२०० हून अधिक गावांत स्मशानभूमी शेड नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:42 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही अंत्यसंस्कारासाठी पुरेशी सुविधा नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे. जिल्ह्यातील गावे, वाड्या-वस्त्या मिळून दोनशेहून अधिक ठिकाणी स्मशानभूमीत अजूनही शेड नसल्याने उघड्यावरच दहन करावे लागत आहे.

ठळक मुद्देउघड्यावरच अंत्यसंस्कार : ग्रामस्थांना निधीची लागली प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही अंत्यसंस्कारासाठी पुरेशी सुविधा नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे. जिल्ह्यातील गावे, वाड्या-वस्त्या मिळून दोनशेहून अधिक ठिकाणी स्मशानभूमीत अजूनही शेड नसल्याने उघड्यावरच दहन करावे लागत आहे.जिल्ह्यातील सर्व तालुके सधन नाहीत, तर काही तालुके मागासलेले आहेत. त्यामधील गावांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. बऱ्याच गावांमध्ये स्मशान शेड नसल्यामुळे त्या ठिकाणी उघड्यावर मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे सोपस्कार आटोपावे लागतात. डोंगराळ दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये लोकसंख्या कमी असते. त्यामुळे या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही आणि राजकारणी लोकही या समस्येकडे अवगत नसतात. अजूनही जवळपास दोनशे ठिकाणी स्मशान शेड बांधण्यात आले नाही. काही ठिकाणी जागेचा प्रश्न आहे. स्मशानभूमीसाठी जागा देण्यासाठी कोणी तयार होत नाही. सरकारी जागा जरी असली तरी त्यांच्या शेजारी असणाºया खासगी जागामालक त्या ठिकाणी स्मशानभूमीला विरोध करीत असल्याचे चित्र आहे. पूर्वी गावाबाहेर म्हणून स्मशानभूमी शेड उभारण्यात आली आहेत. गावाचा विकास झपाट्याने होत असल्याने बांधकामांची संख्या वाढली. त्याच्या परिणामी पूर्वी गावाबाहेर म्हणून उभारण्यात आलेल्या स्मशानभूमी आता गावाच्या मध्यावर येऊ लागली आहेत. अशा स्मशानभूमी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. मात्र, जागा उपलब्ध होत नसल्याने ही स्मशानभूमी हटविणे शक्य होत नाही. यानंतर या वास्तूला बकाल अवस्था प्राप्त होते.स्मशानभूमी बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यातून स्मशानशेड उभारण्यात येते. दुर्गम डोंगराळ भागात एकाच पावसाळ्यात स्मशानभूमीचे शेड खराब होतात. स्मशानभुमीच्या दुुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून निधी दिला जात नाही. ग्रामपंचायत निधीतून ही कामे करावी लागतात. शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती चांगली आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती मजबूत नाही. पाण्याचे, लाइट बिल भरण्यासाठी काही ग्रामपंचायतींना कसरत करावी लागते. या सर्वांच्या परिणामी अजूनही दोनशेहून अधिक गावांना माळरानात उघड्यावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.रस्ते, नाला बांधकामांना प्राधान्यजनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर दरवर्षी जिल्हा नियोजन समितीकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो. यामध्ये सिमेंट रस्ते, भुयारी नाला बांधकाम हीच कामे बहुतांश प्रस्तावित केली जातात. परंतु, स्मशानभूमी शेडबाबत फारशी शिफारस केली जात नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.जिल्ह्यातील स्मशानभूमी नसलेल्या गावांचे सर्वेक्षण करून अशा गावांची माहिती मागविण्यात येईल. जागेचा, निधीचा व लोकसंख्येचा अहवाल घेऊन त्यासंबंधी वरिष्ठ प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी मिळून देण्यासाठी प्रयत्न करू.- दिलीप मानकरउपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)