शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी तालुक्यात एकही अर्ज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST

ग्रामपंचायत निवडणूक, आनलाईन प्रक्रियेमुळे अडचणी चांदूरबाजार : तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीतील नामांकन अर्ज ...

ग्रामपंचायत निवडणूक, आनलाईन प्रक्रियेमुळे अडचणी

चांदूरबाजार : तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीतील नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली. यात पहिल्या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. कारण नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने, पहिल्या दिवशी कोणाचाच उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सर्वच इच्छुक उमेदवार पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी आपले नामांकन अर्ज ऑनलाईन भरतात. त्यानंतर नामांकन अर्ज, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करतात. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे. त्यामुळे सावकाश अर्ज दाखल करू, असा अनेक इच्छुक उमेदवारांचा विचार दिसत आहे.

यापूर्वी रद्द झालेल्या निवडणुकीत सरपंच पदाचे आरक्षण, निवडणूकपूर्व जाहीर झाले होते. त्यामुळे सरपंचपदासाठी इच्छुकांनी, आपल्याला सरपंचपदासाठी पोषक असे पॅनल वाॅर्डनिहाय सेट केले होते. परंतु नव्याने होऊ घातलेल्या निवडणुकीत, सरपंचपदासाठीचे आरक्षण हे निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. अनेक सरपंचपदाच्या इच्छुकांची यात गोची झाली. त्यामुळे आता बहुतांश ग्रामपंचायतींत नव्याने पॅनेल सेट करावे लागणार आहे. यामुळेही नामांकन दाखल करण्यास वेळ होऊ लागू शकतो.

सरपंचपदाचे पुढचे आरक्षण काय निघेल याचा कयास बांधून किंवा कोणत्याही पदासाठी सरपंच आरक्षण निघाले तर,आपण नाही तर आपल्या गटाचाच सरपंच असावा. यासाठी खुल्यासह सर्वच आरक्षित वर्गवारीनुसार, उमेदवार उभे करावे लागणार आहेत. त्यामुळे नव्याने पॅनेल सेट करतांना, आयत्यावेळी सरपंचपदासाठी धोका व्हायला नको. याचा विचार करूनच, ग्रापंचायतीसाठी पॅनेल कडून उमेदवार उभे केले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत गावातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांची पॅनेल सेट करताना चांगलीच दमछाक होत आहे. हे ही विलंबाने नामांकन दाखल होण्याचे एक कारण होऊ शकते.

तसेच उमेदवारी दाखल करताना बहुतांश कागदपत्रे व बँक पासबुक नव्याने तयार करावे लागणार आहे. त्यामुळे ही उमेदवारी नव्याने दाखल करण्यास विलंब होत असावा. त्यामुळे २८ डिसेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करण्याऱ्यांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.