शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बहुजनांच्या उत्थानासाठी झटणारी माणसे उरली नाहीत

By admin | Updated: April 11, 2015 00:08 IST

समाज हा कर्तबगार पुरुषांच्या कर्मावर उभा असतो. ..

भाऊसाहेबांची पुण्यतिथी : बाबा भांड यांचे प्रतिपादनअमरावती : समाज हा कर्तबगार पुरुषांच्या कर्मावर उभा असतो. दुर्दैवाने आज बहुजनांच्या उत्थानासाठी झटणारी माणसे उरली नाहीत. ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या कल्याणासाठी काम केले अशांचा इतिहास आपण वाचला पाहिजे. बहुजनांच्या आपापसातील भांडणामुळेच त्यांची प्रगती खुंटल्याची खंत ज्येष्ठ लेखक तथा विचारवंत बाबा भांड (औरंगाबाद) यांनी व्यक्त केली.श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ५० व्या पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील देशमुख, महापौर चरणजित कौर नंदा, उषाताई देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी विचारपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, वसंतराव चर्जन, डॉ. सुरेश ठाकरे, कोषाध्यक्ष हरिहर ठाकरे, कार्यकारिणी सदस्य एम.के. नाना देशमुख, जगन्नाथ वानखडे, नरेशचंद्र ठाकरे, सचिव प्राचार्य वि.गो. भांबूरकर, स्विकृत सदस्य प्राचार्य डॉ.वि.गो. ठाकरे, प्रा. अरविंद मंगळे, प्राचार्य अरुण सांगोळे, आर.आर. सावरकर व ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राज दत्त यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्यावतीने बांधण्यात अलेल्या कस्तुरबा कन्या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उषाताई देशमुख यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष वसंतराव चर्जन, संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्राचार्य वि.गो. भांबुरकर यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. पंजाबराव उपाख्य बाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाकला गेला.