शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

बहुजनांच्या उत्थानासाठी झटणारी माणसे उरली नाहीत

By admin | Updated: April 11, 2015 00:08 IST

समाज हा कर्तबगार पुरुषांच्या कर्मावर उभा असतो. ..

भाऊसाहेबांची पुण्यतिथी : बाबा भांड यांचे प्रतिपादनअमरावती : समाज हा कर्तबगार पुरुषांच्या कर्मावर उभा असतो. दुर्दैवाने आज बहुजनांच्या उत्थानासाठी झटणारी माणसे उरली नाहीत. ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या कल्याणासाठी काम केले अशांचा इतिहास आपण वाचला पाहिजे. बहुजनांच्या आपापसातील भांडणामुळेच त्यांची प्रगती खुंटल्याची खंत ज्येष्ठ लेखक तथा विचारवंत बाबा भांड (औरंगाबाद) यांनी व्यक्त केली.श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ५० व्या पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील देशमुख, महापौर चरणजित कौर नंदा, उषाताई देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी विचारपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, वसंतराव चर्जन, डॉ. सुरेश ठाकरे, कोषाध्यक्ष हरिहर ठाकरे, कार्यकारिणी सदस्य एम.के. नाना देशमुख, जगन्नाथ वानखडे, नरेशचंद्र ठाकरे, सचिव प्राचार्य वि.गो. भांबूरकर, स्विकृत सदस्य प्राचार्य डॉ.वि.गो. ठाकरे, प्रा. अरविंद मंगळे, प्राचार्य अरुण सांगोळे, आर.आर. सावरकर व ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राज दत्त यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्यावतीने बांधण्यात अलेल्या कस्तुरबा कन्या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उषाताई देशमुख यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष वसंतराव चर्जन, संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्राचार्य वि.गो. भांबुरकर यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. पंजाबराव उपाख्य बाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाकला गेला.