शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

३३ उपकेंद्रांत आरोग्य वैद्यकीय अधिकारीच नाही

By admin | Updated: September 3, 2014 23:02 IST

जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच आरोग्य केंद्रांना सक्षम आरोग्य अधिकारी नसल्याची धक्कादायक माहिती आहे़ एकीकडे जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू या आजाराने डोके वर काढले असताना दुसरीकडे

मोहन राऊ त - धामणगाव रेल्वेजिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच आरोग्य केंद्रांना सक्षम आरोग्य अधिकारी नसल्याची धक्कादायक माहिती आहे़ एकीकडे जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू या आजाराने डोके वर काढले असताना दुसरीकडे वैद्यकीय अधिकारी नसल्याने ग्रामीण भागात असंतोष पसरला आहे़ जिल्ह्यात ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत़ या केंद्रातून आरोग्यविषयक सुविधा परिसरातील नागरिकांना पुरविण्यात येते़ परंतु या विभागाचा सर्वाधिकार पुणे येथील आरोग्य संचालक व अकोला येथील उपसंचालकाकडे आहे़ जिल्हा नियोजन समितीतून औषधी खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो़ मात्र, आरोग्य केंद्राला औषधी खरेदी करण्याचा अधिकारही संचालक व उपसंचालकांकडे आहे़ आरोग्य संचालक तथा उपसंचालक यांच्याकडून थेट औषधी खरेदी होत असल्याने निकृष्ट दर्जाच्या औषधींचा पुरवठा होत आहे़एमबीबीएस डॉक्टर येण्यास इच्छुक नाहीतपंचायत राज समितीत सर्वाधिकार जिल्हा परिषदेकडे आहे़ ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी या संस्थेकडे असताना आरोग्य विभागाच्या भरतीची तथा एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीचा अधिकार थेट आरोग्य संचालकाला आहे़ जिल्ह्यातील १२ तर एमबीबीएस व २२ बीईएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत़ आदिवासी भागात वैद्यकीय सेवा परिपूर्ण देण्याचे आदेश थेट सर्वोच्च न्यायालयाने दिले. या भागात एकही वैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा रिक्त ठेवू नये, असे आदेशात नमूद असतानाही मेळघाटातील रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत़ जिल्हा परिषद बनली नामधारीशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आरोग्यसेवा खिळखिळी झाली आहे़ आरोग्य विभाग सांभाळण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची वर्णी लावली जाते़ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना सांगितले जाते़ परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांची तक्रार आल्यास कोणतीही कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला नाहीत़ एमबीबीएस डॉक्टरांच्या जागा भरण्याचे अधिकार मंत्रालयाला आहेत़ यापूर्वी बीईएमएस डॉक्टरांची भरती करण्याचे अधिकारी जिल्हा परिषदेला होते़ परंतु सन २००२ पासून हे अधिकार काढून घेण्यात आले आहे.त्यामुळे आता जिल्हा परिषद केवळ नामधारी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़