शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मग नियोजन केले तरी कुणी ?

By admin | Updated: August 10, 2016 00:03 IST

चालू आर्थिक वर्षात २५-१५ लोकोपयोगी कामे या शीर्षांतर्गत ४.५० कोटी रूपयांच्या निधीचे नियोजन करताना ...

टालमटोल धोरण : साडेचार कोटींच्या नियोजनात अधिकारी अंधारातअमरावती : चालू आर्थिक वर्षात २५-१५ लोकोपयोगी कामे या शीर्षांतर्गत ४.५० कोटी रूपयांच्या निधीचे नियोजन करताना आम्हाला याची काहीच माहिती नसल्याचा सूर प्रशासकीय यंत्रणेत उमटू लागला आहे. त्यामुळे अधिकारीच अंधारात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या अखत्यारितील २५-१५ या लेखा शीर्षाखाली लोकोपयोगी लहान कामे करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो सामान्य प्रशासन विभागामार्फत अध्यक्षांकडे सभेत ठेवण्यासाठी पाठविणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या ६ जून रोजी आयोजित सर्वधारण सभेत चालू आर्थिक वर्षात ४.५० कोटी रूपयांच्या दीडपट म्हणजे ६.५० कोटींच्या २०० कामांचे नियोजन करण्यात आले आहे, असा प्रस्तावच पंचायत विभागामार्फत पाठविण्यात आला नसल्याची चर्चा एकीकडे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात सुरू आहे. हा दोन विभागाचाच दादला नसून साडेचार कोटी रूपयांच्या नियोजनप्रकरणी बांधकाम विभागाकडे लोकपयोगी लहान कामांसाठी निधी उपलब्ध झाला नसल्याची चर्चा आहे. मग प्रशासनातील हा सुरू सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असताना साडेचार कोटी रूपयांच्या दीडपट केलेल्या कामांच्या प्रशासकीय मान्यता कशा काय देण्यात आल्यात, हा विषय आश्चर्याचा धक्काच म्हणावा लागेल. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रूपयांचे नियोजन केले तरी कुणी आणि याला ६ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता कशी मिळाली? यावरून सध्या जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा रंगत आहेत. प्रशासकीय यंत्राणेतील चर्चेनुसार २५-१५ या लेखाशीर्षाखाली आम्हाला काहीच माहीत नाही, अशी चर्चा होत असताना याप्रकरणी यंत्रणेतील काम करणारे अधिकारी अंधारात आहेत, असे या सर्व घडामोडीवरून टालमटोल सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे साडेचार कोटी रूपयांचे नियोजन नेमके कोणी केले आणि मंजुरी कशी मिळाली, हा सध्या संशोधनाचा विषय झेडपीत ठरला आहे. (प्रतिनिधी)प्रशासकीय मान्यता दिल्याची चर्चाएकीकडे सध्या जिल्हा परिषदेत सताधारी आणि विरोधकांची साडेचार कोटी रूपयांच्या नियोजनावरून खटके उडत असताना दुसरीकडे अध्यक्षांच्या अधिकारात मंजूर केलेल्या साडेचार कोटी रूपयांच्या लोकपयोगी विकास कामांना प्रशासक ीय मान्यता दिल्याची चर्चा झेडपीत सुरू आहे. अशी प्रस्तावाची प्रक्रियाजिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या २५-१५ या लेखाशिर्षाखाली लोकपयोगी लहान कामे करण्याचा प्रस्ताव हा पंचायत विभागाच्या अखत्यारितील बाब आहे. या विभागाने हा प्रस्ताव तयार केल्यानंतर तो सामान्य प्रशासन विभागाकडे वर्ग करून या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवण्या करिता अध्यक्षांकडे पाठवावा लागतो. त्यांच्या परवानगीने नंतर हा विषय सभेच्या पटलावर चर्चेस आल्यास सदस्यांच्या सहमतीने कामे समाविष्ट करून त्याला सर्वसाधारण सभेची मंजूर घ्यावी लागते. त्यानंतर अध्यक्ष, बांधकाम सभापती, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी याच्या स्वाक्षरीनंतर हा प्रस्ताव मान्य केला जातो, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.