शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

ठाकरे सरकार कोराना रोखण्यात अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून मातोश्रीच्या बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

अमरावती : कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून मातोश्रीच्या बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्यात आघाडी नव्हे तर बिघाडी सरकार असल्याचा प्रहार खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी लोकसभेत केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर असल्याचा आशावाद व्यक्त केला. अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला. अनेक प्रकल्पांना स्थगिती देणारे ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली.

कोरोना महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत मातोश्री या निवासस्थानी बसून राहिले. त्यांनी कधीही ‘माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी’ असे वर्तन केले नाही. त्यामुळे राज्याच्या जनतेला कोरोना काळात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. कोराेना संक्रमित रुग्ण आणि मृत्यूसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी कुठल्याही निधीची तरतूद न करता केवळ पंतप्रधान निधीला विरोध करण्याचा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी राबविला. भंडारा येथे १० नवजात बालकांचे मृत्यू आणि यवतमाळ येथे पोलिओ लसीऐवजी बालकांना सॅनिटायझर देण्यात आल्याच्या घटनांचा त्यांनी दाखला दिला. शेतकऱ्यांच्या मुद्यांवर मी आणि आमदार रवी राणा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला निघालो असताना मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अमरावतीत अडवून ठेवल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला.