शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST

सामान्यांची बल्ले-बल्ले, गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना अमरावती : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द केली, ...

सामान्यांची बल्ले-बल्ले, गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना

अमरावती : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द केली, मात्र शिक्षण विभागाने मूल्यमापनाचे धोरण जाहीर केले. या नव्या धोरणाने सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागणार आहे. तथापि, गुणी विद्यार्थ्यांवर या धोरणाने अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

१०० टक्क्यांपैकी ५० टक्के गुण अंतर्गत मू्ल्यमापनानुसार, तर ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांनुसार देण्यात येतील. कोरोना संसगार्मुळे शाळा-महाविद्यालये बंद असून, अभ्यासही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. शालेय जीवनात दहावीचे वर्ष ‘टर्निंग पॉईंट’ असताना, नेमकी हीच परीक्षा रद्द करून मूल्यमापन करण्यात येत आहे. या धोरणामुळे गुणी विद्यार्थी मात्र व्यथित झाले असून, त्यांचे पालकही नाराज झाले आहेत. अभ्यासात ‘ढ’ असलेल्या विद्यार्थ्यांना या नव्या धोरणामुळे पुढील वर्गात ढकलले जाणार आहे, हे मात्र खरे. शालेय शिक्षण विभागातही दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या निर्णयावर संंमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

------------------

बॉक्स

असे असेल नवे सूत्र

नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाचे ५० टक्के गुण मिळून दहावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करताना वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण, तर गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जातील.

-------------------

अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी, पण ऐच्छिक

दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार आहे. ती पूर्णपणे ऐच्छिक असून, दहावीच्या अभ्यासक्रमाच्या अधारावर असेल. याचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. १०० गुणांची ही सीईटी दोन तासांची घेण्यात येणार आहे.

---------------------

विद्यार्थी खूश

कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने हिरमोड झाला. ना वर्ग, ना अभ्यास. ऑनलाईन शिक्षणातून काहीही साध्य झाले नाही. दहावी निकालाचे अंतर्गत मूल्यांकनाचे धोरण विद्यार्थिहिताचे असल्याची भावना दहावीची विद्यार्थिनी नंदिनी मराठे हिने व्यक्त केली. अंतर्गत मूल्यमापनाच्या धोरणामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झालेला नाही. समानतेचे धोरण लागू केल्याबाबत ऋणी असल्याचे विद्यार्थी अल्पेश वानखडे म्हणाला.

--------------------

पालक काय म्हणतात?

परीक्षाविना उत्तीर्ण ही बाब गुणी विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम करेल. चांगले गुण मिळवित नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे सर्वसामान्य कुटुंबातील अशा विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

- रजनी देशपांडे, अमरावती.

कोरोना संकटामुळे शालेय शिक्षण विभागाला दहावीची परीक्षा रद्द करावी लागली. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. या धोरणामुळे विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.

- राजेश सपकाळे, अमरावती.

------------

जिल्ह्यातील दहावीचे एकूण विद्यार्थी : ४०६३३

मुली : १९३१८

मुले : २१३४५

-----------------

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात?

काेरोना संसर्गामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेची तयारी केली होती. मात्र, कोरोनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने केला. मूल्यांकनाच्या धोरणाने दिलासा मिळाला.

- सुरेश मोलके.

----------------

‘‘

- अरविंद मंगळे

-----------

दहावीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, असे मी म्हणणार नाही. मात्र, नक्कीच काही गुणी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीत काहीअंशी बाधा येणार, असे चित्र आहे. तथापि, पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी सीईटी हा पर्याय उपलब्ध आहे.

- प्रशांत कोल्हे.