शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे टेन्शन झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:13 IST

अमरावती : पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. ...

अमरावती : पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. त्यानंतर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांचे परीक्षेचे टेन्शन गेले आहे. परीक्षा रद्द झाल्याने ऑनलाईन अभ्यासक्रमासही विद्यार्थ्यांनी पूर्णविराम दिला आहे.

दहावीसाठी नववी, तर बारावीसाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया भक्कम असणे आवश्यक मानण्यात येतो. कोरोना परिस्थितीमुळे ना नियमित शाळा, ऑनलाईन क्लासलाही दांडी. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीदरम्यान नववी व अकरावीचे वर्ग नेहमी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, डिसेंबरनंतर कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून आल्याने राज्य शासनाने नियमित वर्ग भरण्यावर निर्बंध घातले. कोरोना परिस्थितीमुळे सलग दोन वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वार्षिक लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. त्यापाठोपाठ आता नववी व अकरावीमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शहर व ग्रामीण भागात एकूण दीड हजारांवर शाळा व लाखो विद्यार्थी आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवी व नववी आणि अकरावीमधील विद्यार्थ्यांचे आता परीक्षेचे टेन्शन मिटले आहे. परिणामी विद्यार्थी बिनधास्त झाल्याचे दिसून येत आहे.