शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे टेन्शन झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:13 IST

अमरावती : पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. ...

अमरावती : पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. त्यानंतर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांचे परीक्षेचे टेन्शन गेले आहे. परीक्षा रद्द झाल्याने ऑनलाईन अभ्यासक्रमासही विद्यार्थ्यांनी पूर्णविराम दिला आहे.

दहावीसाठी नववी, तर बारावीसाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया भक्कम असणे आवश्यक मानण्यात येतो. कोरोना परिस्थितीमुळे ना नियमित शाळा, ऑनलाईन क्लासलाही दांडी. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीदरम्यान नववी व अकरावीचे वर्ग नेहमी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, डिसेंबरनंतर कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून आल्याने राज्य शासनाने नियमित वर्ग भरण्यावर निर्बंध घातले. कोरोना परिस्थितीमुळे सलग दोन वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वार्षिक लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. त्यापाठोपाठ आता नववी व अकरावीमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शहर व ग्रामीण भागात एकूण दीड हजारांवर शाळा व लाखो विद्यार्थी आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवी व नववी आणि अकरावीमधील विद्यार्थ्यांचे आता परीक्षेचे टेन्शन मिटले आहे. परिणामी विद्यार्थी बिनधास्त झाल्याचे दिसून येत आहे.