शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

तापमान स्थिरावले, वावटळी सुटणार

By admin | Updated: April 24, 2017 00:47 IST

उत्तर भारतात पावसामुळेमुळे विदर्भातील तापमानात कमालीची स्थिरता प्राप्त झाली आहे.

दाहकता कमी : उत्तर भारतातील पावसाचा परिणाम, नागरिकांना दिलासाअमरावती : उत्तर भारतात पावसामुळेमुळे विदर्भातील तापमानात कमालीची स्थिरता प्राप्त झाली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४५ डिग्रीवर गेलेले तापमान एप्रिल महिन्यात पुन्हा ४२ अंशावर आले आहे. २७ एप्रिलपर्यंत तापमानात विशेष बदल होणार नसून वावटळी सुटणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.उन्हाळा जीवाची लाही लाही करणाराच ठरते, यंदा तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता वाढली होती. आता दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान कमी झाल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते उत्तर भारतातील जम्मु-कश्मिर, बंगाल, नार्थ-ईस्ट, छत्तीसगढ अशा तिन्ही बाजूला पाऊस पडत असल्यामुळे त्या भागातून थोडेफार प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने येत आहे. त्यातच झारखंड ते तामीळनाडू व राजस्थान ते ओरीसा भागात कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. अरबी समुद्रावर चक्राकार वारे असून समुद्रावरून थंड वारे सुध्दा विदर्भाकडे येत आहे. परिणामी विदर्भातील तापमान कमी झाले असून ही स्थिती २७ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील तापमान ४२ डिग्री सेल्सीअस आहे.दर्यापुरात वावटळउत्तर भारतात पाऊस, झारखंड ते तामीळनाडू तसेच राजस्थान ते ओरीसावर कमी दाबाची द्रोणीय स्थितीमुळे वावटली सुटणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञाचा आहे. त्या अंदाजानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी वावटळी सुटल्या असून दर्यापुरात नुकतीच वावटळीची स्थिती निर्माण झाल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते.