शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

तापमान स्थिरावले, वावटळी सुटणार

By admin | Updated: April 24, 2017 00:47 IST

उत्तर भारतात पावसामुळेमुळे विदर्भातील तापमानात कमालीची स्थिरता प्राप्त झाली आहे.

दाहकता कमी : उत्तर भारतातील पावसाचा परिणाम, नागरिकांना दिलासाअमरावती : उत्तर भारतात पावसामुळेमुळे विदर्भातील तापमानात कमालीची स्थिरता प्राप्त झाली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४५ डिग्रीवर गेलेले तापमान एप्रिल महिन्यात पुन्हा ४२ अंशावर आले आहे. २७ एप्रिलपर्यंत तापमानात विशेष बदल होणार नसून वावटळी सुटणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.उन्हाळा जीवाची लाही लाही करणाराच ठरते, यंदा तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता वाढली होती. आता दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान कमी झाल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते उत्तर भारतातील जम्मु-कश्मिर, बंगाल, नार्थ-ईस्ट, छत्तीसगढ अशा तिन्ही बाजूला पाऊस पडत असल्यामुळे त्या भागातून थोडेफार प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने येत आहे. त्यातच झारखंड ते तामीळनाडू व राजस्थान ते ओरीसा भागात कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. अरबी समुद्रावर चक्राकार वारे असून समुद्रावरून थंड वारे सुध्दा विदर्भाकडे येत आहे. परिणामी विदर्भातील तापमान कमी झाले असून ही स्थिती २७ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील तापमान ४२ डिग्री सेल्सीअस आहे.दर्यापुरात वावटळउत्तर भारतात पाऊस, झारखंड ते तामीळनाडू तसेच राजस्थान ते ओरीसावर कमी दाबाची द्रोणीय स्थितीमुळे वावटली सुटणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञाचा आहे. त्या अंदाजानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी वावटळी सुटल्या असून दर्यापुरात नुकतीच वावटळीची स्थिती निर्माण झाल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते.