शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
5
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
6
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
7
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
8
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
9
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
10
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
11
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
12
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
13
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
14
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
15
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
16
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
17
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
18
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
19
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
20
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी

तापमान स्थिरावले, वावटळी सुटणार

By admin | Updated: April 24, 2017 00:47 IST

उत्तर भारतात पावसामुळेमुळे विदर्भातील तापमानात कमालीची स्थिरता प्राप्त झाली आहे.

दाहकता कमी : उत्तर भारतातील पावसाचा परिणाम, नागरिकांना दिलासाअमरावती : उत्तर भारतात पावसामुळेमुळे विदर्भातील तापमानात कमालीची स्थिरता प्राप्त झाली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४५ डिग्रीवर गेलेले तापमान एप्रिल महिन्यात पुन्हा ४२ अंशावर आले आहे. २७ एप्रिलपर्यंत तापमानात विशेष बदल होणार नसून वावटळी सुटणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.उन्हाळा जीवाची लाही लाही करणाराच ठरते, यंदा तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता वाढली होती. आता दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान कमी झाल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते उत्तर भारतातील जम्मु-कश्मिर, बंगाल, नार्थ-ईस्ट, छत्तीसगढ अशा तिन्ही बाजूला पाऊस पडत असल्यामुळे त्या भागातून थोडेफार प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने येत आहे. त्यातच झारखंड ते तामीळनाडू व राजस्थान ते ओरीसा भागात कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. अरबी समुद्रावर चक्राकार वारे असून समुद्रावरून थंड वारे सुध्दा विदर्भाकडे येत आहे. परिणामी विदर्भातील तापमान कमी झाले असून ही स्थिती २७ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील तापमान ४२ डिग्री सेल्सीअस आहे.दर्यापुरात वावटळउत्तर भारतात पाऊस, झारखंड ते तामीळनाडू तसेच राजस्थान ते ओरीसावर कमी दाबाची द्रोणीय स्थितीमुळे वावटली सुटणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञाचा आहे. त्या अंदाजानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी वावटळी सुटल्या असून दर्यापुरात नुकतीच वावटळीची स्थिती निर्माण झाल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते.