शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

यंदा तापमान उच्चांक गाठणार?

By admin | Updated: June 8, 2014 23:32 IST

नवतपाने विदर्भात कहर केलाय. ४५ डिग्रीच्या आसपास पोहोचलेले तापमान यंदा ‘पन्नाशी’ गाठणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अमरावती : नवतपाने विदर्भात कहर केलाय. ४५ डिग्रीच्या आसपास पोहोचलेले तापमान यंदा ‘पन्नाशी’ गाठणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थोड्याफार फरकाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमानाने कहर केला आहे. अमरावती शहरातही तापमान ४६ अंशांच्या पलीकडे गेले आहे. तापमानाच्या ‘हाफ सेंच्युरी’च्या प्रश्नांची झळ फेसबुकलाही पोहचली असून या प्रश्नाला बर्‍याच लाईक मिळत आहेत.पृथ्वीवरील तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. त्यामुळे अधिकअधिक वृक्ष लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, निसर्गाची देण असणारी झाडे विकासाचा मुद्दा पुढे करून सर्रास तोडली जात आहेत. या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन ढासळत असल्याने तापमानही असंतुलित झाले आहे. या असंतुलित तापमानमुळे मानव जीवनसुध्दा प्रभावित होत असल्याचे दिसते.गेल्या काही वर्षांपासून बदललेल्या ऋतुमानाने मानवी जीवनावर मोठा प्रभाव केला आहे. ऊन, पाऊस व थंडीचा समतोलही ढासळला आहे. यंदाचा उन्हाळा सुरुवातीला फारसा जाणवला नाही. मात्र, एप्रिल व मे महिन्यात उन्हाच्या तडाख्याने सजीवांना घायाळ करून सोडले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४५ डिग्रीवर गेलेले तापमान दुसर्‍या आठवड्यात ४६.५ डिग्रीवर पोहोचले. नागपूरमध्ये तर तापमानाने उच्चांक गाठला असून ४७.३ पर्यंत पारा गेला आहे. यापेक्षा अधिक तापमान वाढल्यास नागरिकांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल यांची कल्पना न केलेलीच बरी. या वाढत्या तापमानाची चर्चा दररोज सुरू असून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तापमानाच्या आलेखावर टीका-टिप्पणी होताना दिसत आहे.