शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

यंदा तापमान उच्चांक गाठणार?

By admin | Updated: June 8, 2014 23:32 IST

नवतपाने विदर्भात कहर केलाय. ४५ डिग्रीच्या आसपास पोहोचलेले तापमान यंदा ‘पन्नाशी’ गाठणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अमरावती : नवतपाने विदर्भात कहर केलाय. ४५ डिग्रीच्या आसपास पोहोचलेले तापमान यंदा ‘पन्नाशी’ गाठणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थोड्याफार फरकाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमानाने कहर केला आहे. अमरावती शहरातही तापमान ४६ अंशांच्या पलीकडे गेले आहे. तापमानाच्या ‘हाफ सेंच्युरी’च्या प्रश्नांची झळ फेसबुकलाही पोहचली असून या प्रश्नाला बर्‍याच लाईक मिळत आहेत.पृथ्वीवरील तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. त्यामुळे अधिकअधिक वृक्ष लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, निसर्गाची देण असणारी झाडे विकासाचा मुद्दा पुढे करून सर्रास तोडली जात आहेत. या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन ढासळत असल्याने तापमानही असंतुलित झाले आहे. या असंतुलित तापमानमुळे मानव जीवनसुध्दा प्रभावित होत असल्याचे दिसते.गेल्या काही वर्षांपासून बदललेल्या ऋतुमानाने मानवी जीवनावर मोठा प्रभाव केला आहे. ऊन, पाऊस व थंडीचा समतोलही ढासळला आहे. यंदाचा उन्हाळा सुरुवातीला फारसा जाणवला नाही. मात्र, एप्रिल व मे महिन्यात उन्हाच्या तडाख्याने सजीवांना घायाळ करून सोडले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४५ डिग्रीवर गेलेले तापमान दुसर्‍या आठवड्यात ४६.५ डिग्रीवर पोहोचले. नागपूरमध्ये तर तापमानाने उच्चांक गाठला असून ४७.३ पर्यंत पारा गेला आहे. यापेक्षा अधिक तापमान वाढल्यास नागरिकांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल यांची कल्पना न केलेलीच बरी. या वाढत्या तापमानाची चर्चा दररोज सुरू असून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तापमानाच्या आलेखावर टीका-टिप्पणी होताना दिसत आहे.