शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

पारा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:34 IST

शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून, मेचा फटका मार्चमध्येच जाणवू लागला आहे. शहराच्या तापमानाने चाळिशी ओलांडली असल्याने अमरावतीकर चांगलेच घामाघूम होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देशहरवासीय घामाघूम : एसी, कूलर पंख्यांचा वापर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून, मेचा फटका मार्चमध्येच जाणवू लागला आहे. शहराच्या तापमानाने चाळिशी ओलांडली असल्याने अमरावतीकर चांगलेच घामाघूम होऊ लागले आहेत.वाढत्या तापमानामुळे दुपारी उष्णतेच्या झळा लागू लागल्याने नागरिकांना बाहेर पडले टाळताहेत. उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी एसी कूलर पंख्यांचा वापर वाढला आहे, तर शीतपेयांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे.सकाळपासूनच उन्हाचे चटकेमागील आठवड्यापासून शहरासह जिल्हाभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तीन दिवसांपासून पारा वाढला असून, तो सोमवारी ४० अंश सेल्सिअसवर गेला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पारा हा चाळिशीवर पोहोचल्याने यावर्षी उच्चांक गाठला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्म्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहेत. रणरणत्या उन्हामुळे दुपारी १ ते ४ या वेळेत रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे.पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाशहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. वाढत्या उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मंदिरे, सार्वजनिक इमारती, हॉल, उद्याने आदी दुपारीसुद्धा उघडी ठेवावीत, जेणेकरून नागरिकांना दुपारच्या वेळी येथे आश्रय घेता येईल.रुग्णालये सुरू ठेवा 

उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्या ४२ अंश सेल्सिअसवर पारा गेला आहे. पारा हा चाळिशीपार पोहोचल्याने यावर्षी उच्चांक गाठला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर महत्त्वाच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होऊ नये, याची खात्री करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.जिल्हास्तरावरील उपाययोजनानिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना उष्णतेच्या लाटेसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावे. उष्णतेच्या लाटेची पूर्वानुमान सूचना निर्गमित करण्याची तसेच यासंदर्भात इतर उपाययोजना राबविण्याची जबाबदारी नोडल अधिकाºयांची राहणार आहे. तालुकास्तरावर तहसीलदारावर नोडल अधिकारी म्हणून ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.९ एप्रिलपर्यंत विदर्भात हलका पाऊस?विदर्भ, तेलंगणा व मराठवाड्यात ५ आणि ६ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी वावटळीसह गडगडाटी पावसाची शक्यता हवमानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. याशिवाय ७ ते ८ एप्रिल दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडील मैदानी भागात धुळीच्या वादळाची शक्यता असून, मध्य भारतात उष्णतेची लाट ४८ तास कायम राहणार आहे. दरम्यान, कमाल तापमान ४० ते ४१ आणि किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सियस राहण्याचे संकेत आहेत. उत्तर छत्तीसगडवर १.५ किमी. उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, या वाºयापासून विदर्भ, मराठवाडा अंतर्गत कर्नाटकापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. लक्षद्वीपभोवताल दीड किमी उंचीवर चक्राकार वारे आहेत. या स्थितीवरून पावसाचा अंदाज बंड यांनी वर्तविला आहे.