शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

तिवसा तालुक्यात कांदा अवकाळी पावसाने खराब ?

By admin | Updated: May 9, 2016 00:13 IST

तालुक्यातील कास्तकार आधीच सततची नापिकी व दुबार पेरणीचे संकट या दृष्टचक्रात अडकला असताना अवकाळी पावसाने हाती आलेले कांद्याचे पीक वांध्यात आणले.

तिवसा, गुरुकुंज (मोझरी) : तालुक्यातील कास्तकार आधीच सततची नापिकी व दुबार पेरणीचे संकट या दृष्टचक्रात अडकला असताना अवकाळी पावसाने हाती आलेले कांद्याचे पीक वांध्यात आणले. कांदा पिकाला या निसर्गाच्या लहरीपणाचा पुन्हा एकदा फटका बसला आणि कांदा पिकाला मोठी हानी पोहोचवली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा कांदा पळवल्याने शेतकरी पुन्हा विवंचनेत सापडले आहे.गुरूवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जबर तडाखा अमरावती जिल्हाासह तिवसा तालुक्यातही बसला आणि शेतकऱ्यांचा कांदा पिकाचे नुकसान झाले, आधीच खरीप व रबी हंगाममातील पिकांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. मात्र, शेतकऱ्यांना आशा होती की, कांदा उत्पादन तरी चांगले होईल, म्हणून शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन कांदा पिकाची लागवड केली. गुरूवारी आलेल्या पावसाने व वादळी वाऱ्याने कांदा या पिकाला जबर तडाखा बसला. अचानकच आलेल्या या पावसाने शेतकरी आपल्या पिकाचे संरक्षण करू शकले नाही त्यामुळे जबर फटका या कांदा पिकाला बसला. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा कांदा अध्यापही उघड्यावर कापणी करता शेतातच पडला असून, त्या कांद्यांना सड लागण्यास सुरूवात झाली आहे शेतकऱ्यांना वेळेवर मजूर मिळत नाहीे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला असून या पिकांपासूनही मुद्दल निघण्याची हमी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांवर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. पेरणीची चिंता बळीराजाला लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)