शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

ंनांदगावपेठ टोलनाक्याला व्यावसायिकांचा विरोध

By admin | Updated: June 15, 2015 00:16 IST

नांदगांवपेठनजीकच्या टोल नाक्याला मोर्शी-वरुड भागासह इतरही भागातील वाहतूकदारांचा विरोध होत आहे.

टोलविरोधी ठराव घेणार : सरपंच संघटना उच्च न्यायालयात जाणारंसावरखेड : नांदगांवपेठनजीकच्या टोल नाक्याला मोर्शी-वरुड भागासह इतरही भागातील वाहतूकदारांचा विरोध होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिक दुकानदार, धान्यासह शेतमाल, अन्य साहित्याची वाहतूक खासगी भाडोत्री वाहनाने किंवा मालकीच्या वाहनाने करतात. टोल नाक्यावर त्यांना कर भरावा लागतो. हा कर त्यांना न परवडणारा असल्याने वाहनधारकांसह शेतकरीवर्ग, व्यावसायिकांचा विरोध आहे. हा टोल नाकाच रद्द करावा यासाठी सरपंच संघटना पुढे येत आहे. मोर्शी-वरुड नांदगाव पेठ, परिसरातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेद्वारे चर्चा करुन टोलविरोधी ठराव करण्याचे आवाहन सरपंच संघटनेने केले आहे.या टोलनाक्याशी मोर्शी-वरुड, नांदगाव पेठ परिसरातील वाहतूकदार शेतकरी यांचा काहीही संबंध येत नाही. केवळ आठ कि.मी. अंतरावरील मालाची वाहतूक होत असली तरी त्यांना नाहक भुर्दंड भरावा लागतो. हा भुर्दंड विनाकारण भरावा लागत आहे. मोर्शी-वरुड-अमरावती या मार्गावरील दळणवळणाचा नेहमीच्या बाजारपेठच्या संबंधाने काहीच घेणे-देणे नाही. लांब पल्ल्याच्या अंतराच्या मानाने कमी अंतरावरील कर वसूल केला जात आहे. टोल नाक्याची उभारणी चुकीच्या जागी करण्यात आली, अशी वाहतूकदारांसह, व्यावसायिक, शेतकऱ्यांची ओरड आहे. शेतकरी शेतमालाचे उत्पादन करतो. मुख्य विक्रीसाठी बाजारपेठ अमरावती शहर येते. मालांच्या वाहतुकीकरिता लहान-मोठी वाहने भाड्याने करावी लागतात. तसेच ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांनासुध्दा टोल नाक्यावर कर वसुली भरावी लागत असल्याने सर्वसामान्य लोकांच्या खिशाला एकप्रकारे कात्री लागत आहे. एकंदरीत सर्वांनाच याचा फटका बसत असल्याने टोल विरोधी प्रतिक्रिया लोकामध्ये उमटत आहे. नाईलाजास्तव टोल कर द्यावा लागत असल्यामुळे लोकांनी टोलला प्रचंड विरोध सुरु केला आहे. जनतेला विनाकारण भुर्दंड पडत आहे. याविरोधात सरपंच संघटनेने लढा उभारण्याचे ठरविले आहे. ग्रामसभेला सर्वाधिक अधिकार असल्याने टोल विषयावर चर्चा करुन तसे ठराव शासनाला पाठवावे. या ठरावाच्या प्रतीद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय सरपंच संघटनेने घेतला आहे. त्यादृष्टीने संघटनेच्या सदस्यांना सूचना करुन तशी माहिती देण्यात येत आहे. ठरावांच्या प्रती तालुकाध्यक्षांकडे माहितीकरिता द्यावी, असे आवाहन सरपंच संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील डहाके यांनी केले आहे. (वार्ताहर)