शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

ंनांदगावपेठ टोलनाक्याला व्यावसायिकांचा विरोध

By admin | Updated: June 15, 2015 00:16 IST

नांदगांवपेठनजीकच्या टोल नाक्याला मोर्शी-वरुड भागासह इतरही भागातील वाहतूकदारांचा विरोध होत आहे.

टोलविरोधी ठराव घेणार : सरपंच संघटना उच्च न्यायालयात जाणारंसावरखेड : नांदगांवपेठनजीकच्या टोल नाक्याला मोर्शी-वरुड भागासह इतरही भागातील वाहतूकदारांचा विरोध होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिक दुकानदार, धान्यासह शेतमाल, अन्य साहित्याची वाहतूक खासगी भाडोत्री वाहनाने किंवा मालकीच्या वाहनाने करतात. टोल नाक्यावर त्यांना कर भरावा लागतो. हा कर त्यांना न परवडणारा असल्याने वाहनधारकांसह शेतकरीवर्ग, व्यावसायिकांचा विरोध आहे. हा टोल नाकाच रद्द करावा यासाठी सरपंच संघटना पुढे येत आहे. मोर्शी-वरुड नांदगाव पेठ, परिसरातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेद्वारे चर्चा करुन टोलविरोधी ठराव करण्याचे आवाहन सरपंच संघटनेने केले आहे.या टोलनाक्याशी मोर्शी-वरुड, नांदगाव पेठ परिसरातील वाहतूकदार शेतकरी यांचा काहीही संबंध येत नाही. केवळ आठ कि.मी. अंतरावरील मालाची वाहतूक होत असली तरी त्यांना नाहक भुर्दंड भरावा लागतो. हा भुर्दंड विनाकारण भरावा लागत आहे. मोर्शी-वरुड-अमरावती या मार्गावरील दळणवळणाचा नेहमीच्या बाजारपेठच्या संबंधाने काहीच घेणे-देणे नाही. लांब पल्ल्याच्या अंतराच्या मानाने कमी अंतरावरील कर वसूल केला जात आहे. टोल नाक्याची उभारणी चुकीच्या जागी करण्यात आली, अशी वाहतूकदारांसह, व्यावसायिक, शेतकऱ्यांची ओरड आहे. शेतकरी शेतमालाचे उत्पादन करतो. मुख्य विक्रीसाठी बाजारपेठ अमरावती शहर येते. मालांच्या वाहतुकीकरिता लहान-मोठी वाहने भाड्याने करावी लागतात. तसेच ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांनासुध्दा टोल नाक्यावर कर वसुली भरावी लागत असल्याने सर्वसामान्य लोकांच्या खिशाला एकप्रकारे कात्री लागत आहे. एकंदरीत सर्वांनाच याचा फटका बसत असल्याने टोल विरोधी प्रतिक्रिया लोकामध्ये उमटत आहे. नाईलाजास्तव टोल कर द्यावा लागत असल्यामुळे लोकांनी टोलला प्रचंड विरोध सुरु केला आहे. जनतेला विनाकारण भुर्दंड पडत आहे. याविरोधात सरपंच संघटनेने लढा उभारण्याचे ठरविले आहे. ग्रामसभेला सर्वाधिक अधिकार असल्याने टोल विषयावर चर्चा करुन तसे ठराव शासनाला पाठवावे. या ठरावाच्या प्रतीद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय सरपंच संघटनेने घेतला आहे. त्यादृष्टीने संघटनेच्या सदस्यांना सूचना करुन तशी माहिती देण्यात येत आहे. ठरावांच्या प्रती तालुकाध्यक्षांकडे माहितीकरिता द्यावी, असे आवाहन सरपंच संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील डहाके यांनी केले आहे. (वार्ताहर)