शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा, पेंचमधील वाघांचे होणार स्थलांतर

By admin | Updated: August 5, 2016 19:19 IST

राज्यातील ताडोबा तर मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढीस लागल्यामुळे वाघांचे स्थलांतरण वाढीस लागले आहे.

क्षेत्र अपुरे : केंद्र सरकारकडे पाठविला प्रस्तावअमरावती : राज्यातील ताडोबा तर मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढीस लागल्यामुळे वाघांचे स्थलांतरण वाढीस लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या परवानगीने ताडोबा, पेंच येथील वाघ दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असले तरी पाच प्रकल्प विदर्भात आहेत. वाघांच्या संख्येची अधिकृत आकडेवारी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. एकट्या विदर्भात २०० पेक्षा अधिक वाघ असल्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेच मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पांत ३५ ते ४० वाघ असल्याचा अंदाज आहे. मात्र, ताडोबा व पेंच या व्याघ्र प्रकल्पांत वाघांची वाढलेली संख्या बघता वाघांना मुक्त संचार करण्यासाठी जंगलक्षेत्र अपुरे पडत आहे.

त्यामुळे वाघ हे नागरी वस्त्यांच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये वाघांचा संचार वाढला की मानव विरूद्ध वाघ, असा संघर्ष उदभवू लागला आहे. परिणामी काही महिन्यांपूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्रांचे गोंदिया, भंडारा, तुमसर या भागात अस्तित्व दिसून आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुमारे १५० वाघ असल्याचा अंदाज व्याघ्रगणनेनंतर वर्तविला गेला आहे. राज्यात ताडोबा येथे सर्वाधिक वाघ आहेत. तसेच मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री, नागझिरा, टिपेश्वर, बोर आदी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या बऱ्यापैकी आहे. वाघांचे स्थलांतरण वाढल्याने त्यांचे संरक्षण धोक्यात आले आहे.

व्याघ्र प्रकल्प क्षेत्राबाहेर वाघांचा संचार ही बाब शिकाऱ्यांसाठी लाभदायक ठरणारी आहे. त्यामुळे ताडोबा, पेंच येथील वाघांना सुरक्षित प्रकल्पात स्थलांतरण करण्यासाठी वेगवान घडामोडी सुरु असल्याची माहिती आहे. व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्याबाबत ताडोबा- पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी.पी.गरड यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शक ले नाहीत, हे विशेष.असे होईल वाघांचे स्थलांतर ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे स्थलांतरण करताना ते कोणत्या व्याघ्र प्रकल्पांत स्थलांतरण करावे, हा निर्णय केंद्रीय वने- पर्यावरण विभाग घेईल. व्याघ्रांसाठी सुरक्षित क्षेत्राची निवड झाल्यानंतर वाघांना तांत्रिक पद्धतीने जेरबंद केले जाईल. स्थलांतरण करताना वाहतुकीच्या वेळी वाघांची दक्षता, काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी तैनात राहतील. संरक्षित पिंजऱ्यातून वाघांचे स्थलांतरण केले जाईल, अशी माहिती आहे.