शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

ताडोबा, पेंचमधील वाघांचे होणार स्थलांतर

By admin | Updated: August 5, 2016 19:19 IST

राज्यातील ताडोबा तर मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढीस लागल्यामुळे वाघांचे स्थलांतरण वाढीस लागले आहे.

क्षेत्र अपुरे : केंद्र सरकारकडे पाठविला प्रस्तावअमरावती : राज्यातील ताडोबा तर मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढीस लागल्यामुळे वाघांचे स्थलांतरण वाढीस लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या परवानगीने ताडोबा, पेंच येथील वाघ दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असले तरी पाच प्रकल्प विदर्भात आहेत. वाघांच्या संख्येची अधिकृत आकडेवारी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. एकट्या विदर्भात २०० पेक्षा अधिक वाघ असल्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेच मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पांत ३५ ते ४० वाघ असल्याचा अंदाज आहे. मात्र, ताडोबा व पेंच या व्याघ्र प्रकल्पांत वाघांची वाढलेली संख्या बघता वाघांना मुक्त संचार करण्यासाठी जंगलक्षेत्र अपुरे पडत आहे.

त्यामुळे वाघ हे नागरी वस्त्यांच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये वाघांचा संचार वाढला की मानव विरूद्ध वाघ, असा संघर्ष उदभवू लागला आहे. परिणामी काही महिन्यांपूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्रांचे गोंदिया, भंडारा, तुमसर या भागात अस्तित्व दिसून आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुमारे १५० वाघ असल्याचा अंदाज व्याघ्रगणनेनंतर वर्तविला गेला आहे. राज्यात ताडोबा येथे सर्वाधिक वाघ आहेत. तसेच मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री, नागझिरा, टिपेश्वर, बोर आदी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या बऱ्यापैकी आहे. वाघांचे स्थलांतरण वाढल्याने त्यांचे संरक्षण धोक्यात आले आहे.

व्याघ्र प्रकल्प क्षेत्राबाहेर वाघांचा संचार ही बाब शिकाऱ्यांसाठी लाभदायक ठरणारी आहे. त्यामुळे ताडोबा, पेंच येथील वाघांना सुरक्षित प्रकल्पात स्थलांतरण करण्यासाठी वेगवान घडामोडी सुरु असल्याची माहिती आहे. व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्याबाबत ताडोबा- पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी.पी.गरड यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शक ले नाहीत, हे विशेष.असे होईल वाघांचे स्थलांतर ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे स्थलांतरण करताना ते कोणत्या व्याघ्र प्रकल्पांत स्थलांतरण करावे, हा निर्णय केंद्रीय वने- पर्यावरण विभाग घेईल. व्याघ्रांसाठी सुरक्षित क्षेत्राची निवड झाल्यानंतर वाघांना तांत्रिक पद्धतीने जेरबंद केले जाईल. स्थलांतरण करताना वाहतुकीच्या वेळी वाघांची दक्षता, काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी तैनात राहतील. संरक्षित पिंजऱ्यातून वाघांचे स्थलांतरण केले जाईल, अशी माहिती आहे.