शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

ताडोबा, पेंचमधील वाघांचे होणार स्थलांतर

By admin | Updated: August 5, 2016 19:19 IST

राज्यातील ताडोबा तर मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढीस लागल्यामुळे वाघांचे स्थलांतरण वाढीस लागले आहे.

क्षेत्र अपुरे : केंद्र सरकारकडे पाठविला प्रस्तावअमरावती : राज्यातील ताडोबा तर मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढीस लागल्यामुळे वाघांचे स्थलांतरण वाढीस लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या परवानगीने ताडोबा, पेंच येथील वाघ दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असले तरी पाच प्रकल्प विदर्भात आहेत. वाघांच्या संख्येची अधिकृत आकडेवारी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. एकट्या विदर्भात २०० पेक्षा अधिक वाघ असल्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेच मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पांत ३५ ते ४० वाघ असल्याचा अंदाज आहे. मात्र, ताडोबा व पेंच या व्याघ्र प्रकल्पांत वाघांची वाढलेली संख्या बघता वाघांना मुक्त संचार करण्यासाठी जंगलक्षेत्र अपुरे पडत आहे.

त्यामुळे वाघ हे नागरी वस्त्यांच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये वाघांचा संचार वाढला की मानव विरूद्ध वाघ, असा संघर्ष उदभवू लागला आहे. परिणामी काही महिन्यांपूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्रांचे गोंदिया, भंडारा, तुमसर या भागात अस्तित्व दिसून आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुमारे १५० वाघ असल्याचा अंदाज व्याघ्रगणनेनंतर वर्तविला गेला आहे. राज्यात ताडोबा येथे सर्वाधिक वाघ आहेत. तसेच मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री, नागझिरा, टिपेश्वर, बोर आदी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या बऱ्यापैकी आहे. वाघांचे स्थलांतरण वाढल्याने त्यांचे संरक्षण धोक्यात आले आहे.

व्याघ्र प्रकल्प क्षेत्राबाहेर वाघांचा संचार ही बाब शिकाऱ्यांसाठी लाभदायक ठरणारी आहे. त्यामुळे ताडोबा, पेंच येथील वाघांना सुरक्षित प्रकल्पात स्थलांतरण करण्यासाठी वेगवान घडामोडी सुरु असल्याची माहिती आहे. व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्याबाबत ताडोबा- पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी.पी.गरड यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शक ले नाहीत, हे विशेष.असे होईल वाघांचे स्थलांतर ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे स्थलांतरण करताना ते कोणत्या व्याघ्र प्रकल्पांत स्थलांतरण करावे, हा निर्णय केंद्रीय वने- पर्यावरण विभाग घेईल. व्याघ्रांसाठी सुरक्षित क्षेत्राची निवड झाल्यानंतर वाघांना तांत्रिक पद्धतीने जेरबंद केले जाईल. स्थलांतरण करताना वाहतुकीच्या वेळी वाघांची दक्षता, काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी तैनात राहतील. संरक्षित पिंजऱ्यातून वाघांचे स्थलांतरण केले जाईल, अशी माहिती आहे.