शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालकांच्या दुर्लक्षामुळे पाल्यांच्या जीवावर टांगती तलवार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

लहानसहान गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे चांदूर बाजार : अलीकडे शहरी व ग्रामीण भागात लहान बालकांचा पाण्याच्या टाक्यात बुडून दुर्दैवी ...

लहानसहान गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे

चांदूर बाजार : अलीकडे शहरी व ग्रामीण भागात लहान बालकांचा पाण्याच्या टाक्यात बुडून दुर्दैवी मृत्यू होण्याच्या घटना खूप वाढल्या आहेत. बालकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे इतर लहान-सहान अपघातही होत असतात. यात कित्येक निरागस बालकांना जीव गमवावा लागतो, तर अनेक बालके जखमी होतात. तेव्हा असे अपघात टाळण्यासाठी बालकांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे अती गरजेचे झाले आहे.

प्रत्येक पालक मुलांच्या आरोग्याची खूप काळजी घेत असतो. त्याला थोडेफार दुखणे, खुपणे झाल्यास डॉक्टरांकडे नेणे, त्याला काय हवे, नको याची काळजी घेणे या गोष्टी केल्या जातात. आई-वडिलांच्या जीव की प्राण तो बालक असतात. परंतु, बरेचदा लहान-सहान गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि घटना घडल्यानंतर नशीबावर दोष देत असतो. पूर्वी संयुक्त कुटुंब पध्दतीमुळे बालकांना सांभाळण्याची जबाबदारी आजी-आजोबांची असायची. तेही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असत. बालक घराबाहेर खेळत असेल तर त्यांची दृष्टी सदैव त्यांच्यावर असायची. परंतु, अलीकडे विभक्त कुटुंब पध्दतीमुळे मुलांची जबाबदारी केवळ आयावर किंवा शेजाऱ्यांवर टाकून नोकरीला जाणे सुरू आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्य, शिक्षण याबाबतीत पालक जागृत असतात त्याप्रमाणे त्यांच्या दैनंदिन गोष्टीकरिता जागृत असणे आवश्यक आहे.

खेळ हा मुलांच्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे लहान मुले ज्यावेळी खेळतात त्यावेळी त्याचेकडे बारीक लक्ष ठेवणे, तो जेथे खेळतो तेथे कचरा, घाण, खड्डे, इजा पोहचविणाऱ्या वस्तू आहेत का याची काळजी घेणे, बरेचदा मुले खेळताना त्यांच्या आया कुठेतरी शेजारच्या महिलेसोबत गप्पा रंगवतात. त्यामुळे बालकांकडे दुर्लक्ष होते.

घरी वापरात येणाऱ्या विद्युत उपकरणे, इस्त्री, मिक्सर, टीव्ही, फ्रीज यापासून बालकांना दूर ठेवणे, घरात असलेल्या औषधांचा वापर केल्यानंतर त्या उंच जागी ठेवणे, त्यांच्या स्ट्रीप बाहेर कचरा पेटीत टाकणे, याकरिता सदैव दक्ष असावे तसेच बऱ्याच पालकांना लहान मुलांना प्रवासाला नेताना समोर ट्रॅकवर बसविणे, गाडी स्टँडवर उभी करून मुलांना गाडीवर बसवून ठेवणे, वाहन वेगाने चालविणे, बसमधून प्रवास करताना खिडकीजवळ उभे करणे या अतिशय वाईट सवयी असतात. त्यामुळे बालकाच्या जिविताला धोका होऊ शकतो.

ग्रामीण भागात अनेक पालक चुकीच्या गोष्टी करीत असतात. उन्हात शेतात नेणे, पाळीव जनावरांचे वैरण घालताना मुलांना सोबत ठेवणे, महिलासुध्दा चुलीवर किंवा गॅसवर स्वयंपाक करताना जवळ खेळवणे हे प्रकार जीवघेणे ठरू शकतात. बरेचदा काही महिला स्वयंपाकघरातून तयार केलेल्या पदार्थांचा गंज चिमट्याने अलगत उचलून जेवणाच्या ठिकाणी आणतात. अशावेळी आजूबाजूला मुलं असताना त्यांच्या अंगावर गरम पदार्थ पडून अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशावेळी पालकांची लहानशी चूक जीवावर बेतू शकते. तेव्हा असे लहानमोठे अपघात टाळण्यासाठी स्वतःमध्ये काही सुधारणा करून आपल्या बालकांकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे झाले आहे.