शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

निलंबित श्रीनिवास रेड्डी यांचे ‘रिसेट’साठी जोरदार प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:14 IST

काॅमन/ गणेश वासनिक अमरावती : मेळघाटातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी वनविभागाने निलंबित केलेले अपर प्रधान ...

काॅमन/ गणेश वासनिक

अमरावती : मेळघाटातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी वनविभागाने

निलंबित केलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांनी पुनर्स्थापना (रिसेट) साठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्याकरिता वन मंत्रालयातील प्रधान मुख्य वनसचिव असलेले रेड्डी हे त्यांना मदत करीत आहेत. एवढेच नव्हे तर निलंबित एम.एस. रेड्डी हे २२ सप्टेंबर रोजी राज्याच्या प्रधान मुख्य सचिवांची भेट घेणार आहेत.

दीपाली यांच्या आत्महत्याप्रकरणी भादंविच्या ३०६ अन्वये धारणी पोलीस ठाण्यात एम.एस. रेड्डी यांच्यावर दाखल गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऑगस्ट महिन्यात खारीज केल्यानंतर त्यांच्या हालचाली वेगाने वाढल्या आहेत. वनविभागाने गठित समिती केलेल्या समितीचे अध्यक्ष एम.एस. राव यांच्या माध्यमातून ३१ ऑगस्ट रोजी रेड्डी यांनी एकतर्फी अहवाल आपल्या बाजूने करून घेतला आहे. समितीच्या अन्य सदस्यांनी हा अहवाल अमान्य ठरविला. आता या समितीचे अध्यक्षपद अपर प्रधान मुख्य सचिव विकास गुप्ता यांच्याकडे सोपविण्यात आले. मात्र, निलंबित एम.एस. रेड्डी यांनी उच्च न्यायालय, समितीचा अहवाल अशा दोन पातळीवर निर्दोषत्व सिद्ध करून आता ‘रिसेट’साठी मंत्रालयात जोरदार प्रयत्न चालविले आहेत. वनमंत्रालयात निवेदनदेखील सादर केले आहे.

खरे तर निलंबन झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत पुनर्स्थापना करता येत नाही. तरीदेखील एम.एस. रेड्डी यांनी नियम गुंडाळून वनविभागात पुन्हा खुर्ची मिळविण्यासाठी वन मंत्रालयाच्या येरझारा सुरू केल्या आहेत.

---------------------

पालकमंत्री, खासदार लक्ष देतील का?

वनविभागातील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना २५ मार्च २०२१ रोजी आत्महत्या करावी लागली. मात्र, वनविभागात ‘लॉबी’ असल्याने आरोपी असलेले निलंबित उपवनसंरक्षक़ विनोद शिवकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी हे वनखात्यात आमचे कुणी काहीच करू शकत नाही, अशा तऱ्हेने वावरत आहेत. त्यामुळे दीपाली चव्हाण यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा या लक्ष देतील का, याकडे नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत.