शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पाच कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By admin | Updated: May 27, 2017 00:04 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जि.प.च्या कृषी विभागाने भरारी पथकाची स्थापना केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जि.प.च्या कृषी विभागाने भरारी पथकाची स्थापना केली आहे. यापथकाने केलेल्या तपासणीत अनियमितता आढळल्याने शहरातील पाच कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले गेले.जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी वरूण देशमुख यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने शहरातील व्यंकटेश कृषी केंद्र, रामदेव ट्रेडर्स,आनंद ट्रेडर्स, दत्त कृषी मंदिर या चार दुकानांच बियाणे तर अंकुर ट्रेडर्सचा रासायनिक खतांचा परवाना निलंबित केला आहे.कृषी केंद्रांची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळल्यात. याआधारे भरारी पथकाचे प्रमुुख, कृषी अधिकारी वरूण देशमुख, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक पुरूषोत्तम कडू, कृषी अधिकारी रवीकांत उईके आदींनी परवाने निलंबनाची शिफारस केली होती. त्यानुषंगाने बियाणे नियंत्रण आदेश १९८३ चे उल्लंघन केल्याने चार बियाणे परवाने तसेच रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन केल्याने एक खत परवाना निलंबित केला आहे. खरीप हंगामात गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी केंद्रांची तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती झेडपीचे कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी दिली.