शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

‘सन स्ट्रोक’ने केला नांदगावात कहर!

By admin | Updated: May 6, 2016 00:08 IST

जसजसा सूर्य आग ओकतोय तसतशी जीवाची काहिली होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

नागरिक हैराण : शासकीय, खासगी दवाखाने हाऊसफुल्लनांदगाव खंडेश्वर : जसजसा सूर्य आग ओकतोय तसतशी जीवाची काहिली होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तापाचे आजार बळावले असून दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. तापमानाचा वाढता पारा उष्माघाताला आमंत्रण देतोय. त्यामुळे नागरिकांनी वेळीच दक्ष राहणे गरजेचे आहे. उन्हाच्या तीव्र झळा बालकांवर ‘फास्ट अटॅक’ करीत असल्याने लहान मुलांमध्ळे अतिसार, जुलाब, सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार वाढले आहेत. महिलांमध्ये अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी याचे प्रमाण वाढले आहे. पुरूषांमध्ये तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे वयोवृद्ध नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब व कमी रक्तदाबांचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहे. नागरिकांवर तापाच्या आजाराचा मोठा परिणाम होत असून स्थानिक ठिकाणी सरकारी तसेच खासगी दवाखान्यात परिपूर्ण सुविधा मिळत नसल्याने अनेक रुग्णांना अमरावती येथे खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. तापमान ४३ अंश सेल्सीयसवर गेल्याने काही दिवसातच उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सध्याच सकाळी १० वाजतापासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने दुपारच्या सत्रात नागरिकांना घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. नांदगावातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. दैनंदिन २०० रुग्णांची ओ. पी. डी. होत आहे. परंतू रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने एकमेव असलेल्या महिला डॉक्टरवर प्रचंड ताण येत आहे व रुग्णांवर सुद्धा पुरेसा उपचार होत नाही. त्यामुळे याठिकाणी निदान दोन डॉक्टरांची नियुक्ती लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. तसेच खासगी दवाखानेसुद्धा रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. खासगी दवाखान्यात दैनंदिन शंभरच्या आसपास रुग्णांवर उपचार होत आहे. एकंदरीत उष्णतेची लाट कायम राहिल्यास रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)‘सन स्ट्रोक’मुळे स्त्री, पुरूष, लहान बालक, वयोवृद्ध नागरिकांना विविध आजारांनी वेढले असून महिलांमध्ये अशक्तपणा, चक्कर येणे, असे प्रकार वाढले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत महिलांनी निंबू शरबत, साखरपाणी जास्त प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. लहान बालक व पुरुषांनी उन्हापासून दक्ष राहणे गरजेचे आहे. - मंगेश पचगडे, संचालक, महालक्ष्मी हॉस्पिटल, नांदगाव खंडे.