शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

‘सन स्ट्रोक’ने केला नांदगावात कहर!

By admin | Updated: May 6, 2016 00:08 IST

जसजसा सूर्य आग ओकतोय तसतशी जीवाची काहिली होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

नागरिक हैराण : शासकीय, खासगी दवाखाने हाऊसफुल्लनांदगाव खंडेश्वर : जसजसा सूर्य आग ओकतोय तसतशी जीवाची काहिली होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तापाचे आजार बळावले असून दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. तापमानाचा वाढता पारा उष्माघाताला आमंत्रण देतोय. त्यामुळे नागरिकांनी वेळीच दक्ष राहणे गरजेचे आहे. उन्हाच्या तीव्र झळा बालकांवर ‘फास्ट अटॅक’ करीत असल्याने लहान मुलांमध्ळे अतिसार, जुलाब, सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार वाढले आहेत. महिलांमध्ये अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी याचे प्रमाण वाढले आहे. पुरूषांमध्ये तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे वयोवृद्ध नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब व कमी रक्तदाबांचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहे. नागरिकांवर तापाच्या आजाराचा मोठा परिणाम होत असून स्थानिक ठिकाणी सरकारी तसेच खासगी दवाखान्यात परिपूर्ण सुविधा मिळत नसल्याने अनेक रुग्णांना अमरावती येथे खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. तापमान ४३ अंश सेल्सीयसवर गेल्याने काही दिवसातच उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सध्याच सकाळी १० वाजतापासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने दुपारच्या सत्रात नागरिकांना घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. नांदगावातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. दैनंदिन २०० रुग्णांची ओ. पी. डी. होत आहे. परंतू रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने एकमेव असलेल्या महिला डॉक्टरवर प्रचंड ताण येत आहे व रुग्णांवर सुद्धा पुरेसा उपचार होत नाही. त्यामुळे याठिकाणी निदान दोन डॉक्टरांची नियुक्ती लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. तसेच खासगी दवाखानेसुद्धा रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. खासगी दवाखान्यात दैनंदिन शंभरच्या आसपास रुग्णांवर उपचार होत आहे. एकंदरीत उष्णतेची लाट कायम राहिल्यास रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)‘सन स्ट्रोक’मुळे स्त्री, पुरूष, लहान बालक, वयोवृद्ध नागरिकांना विविध आजारांनी वेढले असून महिलांमध्ये अशक्तपणा, चक्कर येणे, असे प्रकार वाढले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत महिलांनी निंबू शरबत, साखरपाणी जास्त प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. लहान बालक व पुरुषांनी उन्हापासून दक्ष राहणे गरजेचे आहे. - मंगेश पचगडे, संचालक, महालक्ष्मी हॉस्पिटल, नांदगाव खंडे.