शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

बैलाच्या घाण्यातून निघणारा ऊसाचा रस इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST

शेंदूरजनाघाट : पूर्वी बैलाच्या मदतीने लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढण्याचा ग्रामीण भागात व्यवसाय होता. हा रस अतिशय शुद्ध व ...

शेंदूरजनाघाट : पूर्वी बैलाच्या मदतीने लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढण्याचा ग्रामीण भागात व्यवसाय होता. हा रस अतिशय शुद्ध व चवदार असायचा यांंत्रिक युगात आता मात्र बैलाची जागा यंत्राने घेतली. आता तर यंत्राच्या साह्याने काढलेला रस गल्लीबोळात पोहोचला. मात्र, बैलाच्या घाणीवरून काढलेला रसाचा स्वाद हा रस देऊ शकला नाही. त्यामुळे गरिबाच्या शीतपेयाची ती जुनी चव इतिहासातजमा होत असल्याचे दिसून येत आहे.

एकेकाळी ग्रामीण भागातील सर्वाधिक खपाचे शीतपेय म्हणून ओळखल्या जाणारा उसाचा रस बहुराष्ट्रीय शीतपेयाच्या आगमनाने मागे पडलेला दिसत असला तरी विद्युत यंत्राच्या साह्याने लोखंडी ऊसातून निघाणाऱ्या रसापेक्षा लाकडाच्या घाणीतून निघणारा ऊसाचा रस अधिक चवदार असल्याची प्रतिक्रिया आजही ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. शहरी भाग व तालुक्याच्या ठिकाणी उन्हाळ्याच्या मोसमात रसवंत्या थाटल्या जातात. या सर्व रसवंत्यांमध्ये विद्युत मोटारीवर चालणाऱ्या लोखंडी यंत्रावरून ऊसाचा रस काढण्यात येतो. अतिशय कमी जागेत हे यंत्र बसविले जात असल्याने व्यावसायिकाला ते सोयीचे होते. या रसात बर्फ टाकल्याने ग्राहकांना थंड रस मिळतो. त्यात लिंबाचा समावेश असल्याने रसाच्या चवीत अधिकच भर पडते. या रसाचे चलन शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक असते. थंड शीतपेयाच्या किमतीच्या तुलनेत रस पिणे अधिक परवडत असल्याचे ग्राहकांचे मत आहे.

पूर्वी बैलाच्या साह्याने घाण्यातून निघणाऱ्या रसापासून ग्राहकांना तो समाधान मिळत होता ते समाधान यंत्राच्या साह्याने निघणाऱ्या रसातून मिळत नसला तरी आर्थिकदृष्ट्या तो परवडणारा असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागात आजही व्यक्त होत आहे. आता बैलाची किमत वाढली व बैल हाकलण्याचा माणसाला मजुरी द्यावी लागत होती. यातून सुटका मिळण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जाते तर ते यंत्र गावात फिरवून गल्ली-बोळात रस विक्रेते दिसून येते.