शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

नुकसानग्रस्तांच्या मदतीचे प्रस्ताव सादर करा

By admin | Updated: August 4, 2014 23:29 IST

र्णा, चारघड व शहानूर नद्यांना आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त शेती, घरांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून तत्काळ मदतीचे वाटप करावे. बाधित गावांना शासनाकडून पूर्णत: मदत दिली जाईल.

आढावा बैठक : पूरग्रस्तांच्या मदतीचा प्रस्ताव अमरावती : पूर्णा, चारघड व शहानूर नद्यांना आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त शेती, घरांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून तत्काळ मदतीचे वाटप करावे. बाधित गावांना शासनाकडून पूर्णत: मदत दिली जाईल. जिल्ह्यातील प्रलंबित विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. यासाठी आवश्यक मदतीचे प्रस्ताव तत्काळ सादर करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आ. रवी राणा, जि.प अध्यक्ष सुरेखा ठाकरे, प्रभारी विभागीय आयुक्त माधव चिमाजी, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मनपा आयुक्त अरूण डोंगरे, पोलीस आयुक्त सुरेश मेकला, विभागीय कृषी सहसंचालक शु.रा. सरदार, उपायुक्त रवींद्र ठाकरे, व्ही.बी काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनील भंडारी आदींची उपस्थिती होती. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या संत्रा फळ पिकांच्या नुकसानीबाबत प्रती झाडाप्रमाणे मदत देण्याचा विशेष प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात या बैठकीत देण्यात आल्या. यावेळी पवार म्हणाले की, पुरामुळे शेती पीक वाहून गेलेल्या, खरडून गेलेल्या आणि पेरणीच न होऊ शकलेल्या शेतजमिनीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत केली जाईल. याबाबतचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसित गावांमध्ये शासन निणर्यानुसार नागरी सुविधा निर्माण करण्यात याव्यात. तसेच २००७ च्या महापुराने बाधित गावांच्या पुनर्वसनाची कारवाई त्वरित पूर्ण करावी. नाविण्यपूर्ण योजनेच्या निधीतून शाळांमध्ये डेस्क-बेंच घेण्याचेही त्यांनी आदेशित केले. इतर नुकसानीची तातडीने चौकशी करण्याचेही त्यांनी सांगितले. पूर्णा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे झालेल्या वित्त व जिवितहानीस जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. यानुसार लवकरच पंचनाम्यांची कारवाई सुरू होईल.