शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोजागिरीच्या नावावर विद्यार्थ्यांची ओली पार्टी

By admin | Updated: October 17, 2016 00:19 IST

कौजागिरीच्या नावावर मद्यप्राशन करून ओली पार्टी झोडण्याचा प्रताप गाडगेनगर येथे भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

नागरिकांना टाकला घेराव : मारहाणीच्या भीतीने विद्यार्थी पळालेसंदीप मानकर अमरावतीकौजागिरीच्या नावावर मद्यप्राशन करून ओली पार्टी झोडण्याचा प्रताप गाडगेनगर येथे भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. डिजेच्या नावावर मद्य प्राशन करून विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. परंतु नागरिकांना हा त्रास सहन न झाल्याने नागरिकांनी ज्या ठिकाणी पार्टी सुरू होती, त्या घराला घेरावा घातला. मात्र नागरिकांच्या हस्ते बाजीरावचा प्रसाद बसण्याच्या भीतीने २० ते २५ विद्यार्थी मागील दाराने पळून गेले. ही घटना गाडगेनगर येथील पलाश गल्लीतील अंकुश डाहके यांच्या घरी घडली. सविस्त असे की, गाडगेनगर येथील अंकुश विठ्ठल डाहाके यांच्या घर असून त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खोल्या भाड्याने दिल्या आहेत. एका खोलीत चार ते सहा मुले राहतात. यामध्ये हा विद्यार्थी तर काही व्यवसाहीकही आहेत. येथे घरमालक राहत नसल्यामुळे व ठिकाणी घरमालकाचे विद्यार्थ्यांनावर कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे मुलाने मोकळीकता मिळते. त्यामुळे त्यांनी कौजागिरी पौर्णिमेची संधी साधून घराच्या वरच्या मजल्यावर पार्टी ठेवली. या पार्टीला सायंकाळी ७ वाजता सुरुवात झाली. सुरुवातील शांत असणारे विद्यार्थ्यांनी येथेच मद्यप्राशन केले व रात्री ११ वाजता दरम्याने डीजेचा आवाज वाढवून नाचायला लागले. ते येवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी अंगावरचे कपडे काढले. असे येथील प्रथमदर्शिनी नागरिकांचे म्हणणे आहे. आजूबाजूला शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलीही राहतात. त्यांनाही अश्लील इशारे करण्यापर्यंत या विद्यार्थ्यांचा प्रताप झाला. हा गोंधळ रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरु होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हा त्रास सहन झाला नाही. त्यांनी घरमालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे परिसरातील शेकडो, महिला, तरुणी, व युवकांनी घराला घेराव घातला. परंतु याची चुणचुणी मद्यपि विद्यार्थ्यांना लागल्यामुळे संतापलेल्या नागरिकांच्या हस्ते बाजीरावचा प्रसाद बसण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी रात्रीच पळून गेले. दोघे सकाळी ४ वाजेपर्यंत घरातच लपून बसले होते. यासंदर्भाची माहिती नागरिकांनी रात्रीच गाडगेनगर पोलिसांना दिली. रविवारी यासंदर्भाची तक्रारही करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री १.३० वाजेपर्यंत नागरिकांना जागी राहावे लागले. या प्रकरणामुळे गाडगेनगरातील वातावरण गरम झाले होते.