शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सामाजिक न्याय विभागात ‘स्वाधार’ निधीपासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST

अमरावती : येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील कनिष्ठ लिपिकाच्या दिरंगाईमुळे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या निधीपासून ...

अमरावती : येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील कनिष्ठ लिपिकाच्या दिरंगाईमुळे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या निधीपासून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवले जात आहे. सन २०१९- २०२० या शैक्षणिक वर्षातील अद्यापही ‘स्वाधार’चा निधी मिळाला नाही. हेतुपुरस्सर मागास विद्यार्थ्यांचे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात येत असल्याची तक्रार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

वाशिम येथील राहुलदेव मनवर यांनी ना. मुंडे यांच्यासह समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे यांना निवेदन दिले आहे. राज्यात भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार’ योजनेच्या सत्र २०१९-२० च्या विद्यार्थ्यांच्या परताव्याकरीता विभागीय उपायुक्त यांनी ११ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा समाजकल्याण कार्यालयांना पत्राद्वारे दीड कोटी निधीचे वितरण केले. मात्र, ही रक्कम सततच्या विविध स्वरूपाच्या लॉकडाऊनमूळे शासनातर्फे आधीच वर्षभराच्या विलंबाने विद्यार्थ्यांना मिळत आहे. राज्य शासनाने मंजूर केलेली रक्कम विभागीय कार्यालयांकडून अवघ्या ५ दिवसात प्रत्येक जिल्हा कार्यालयांना वितरित करण्यात आली. राज्यभरातील सर्व जिल्हा कार्यालयांनी आपल्याकडे याबाबत आलेल्या अर्जाची मार्च २०२० पूर्वीच छाननी करून पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या तयार केल्या होत्या. त्यामुळे शासनाने २८ ऑगस्ट २०२० रोजी ३५ टक्के स्वरुपाने मंजूर केलेली ३५ कोटी रक्कम आणि ७ जानेवारी रोजी ४० टक्क्यांनी ४० कोटी मंजूर केलेली रक्कम विविध जिल्हा कार्यालयांतर्फे आठवडाभरात सदर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. मात्र, अमरावती जिल्हा कार्यालयातील कर्मचारी किरण चौधरी यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणार्‍या योजनेची अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकरिता दीड कोटी रुपये मंजूर रक्कम वेळेत मिळू नये, याकरिता या योजनेचे अर्जसुद्धा बघितले नाही आणि त्यांच्या अर्जाची छानणी सुद्धा केली नाही. त्यामुळे चौधरी यांची मागास विद्यार्थाशी वागणूक व्यवस्थित नाही. याबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी अंकुश कोरे, अविनाश तिडके, प्रज्वल रामटेके, तेजस नन्नावरे, अंजली खंडारे, अनिकेत थोरात, पंकज थोरात या विद्यार्थांनी केली आहे.

------------------

कोट

‘स्वाधार’ योजनेच्या निधी वाटपात विलंब झाल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली. या योजनेचे कामकाज हाताळणाऱ्या लिपिकांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. चौकशीत जे काही तथ्य समाेर येईल, त्याअनुषंगाने कार्यवाही केली जाईल.

- विजय साळवे, उपायुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अमरावती