शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

विद्यार्थी विकास हाच केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:14 IST

अमरावती : विदर्भातील अमरावती विभागात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक विद्यार्थी विकासातून होऊ शकते. यासाठी विद्यार्थी विकास हाच ...

अमरावती : विदर्भातील अमरावती विभागात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक विद्यार्थी विकासातून होऊ शकते. यासाठी विद्यार्थी विकास हाच आपला केंद्रबिंदू राहणार असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केले.

नवे कुलगुरू डॉ. मालखेडे यांचा शुक्रवारी काँग्रेसनगर मार्गावरील सर्वोदय कॉलनीत आयोजित सत्काराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांचे वडील नामदेवराव, आई वेणूताई मालखेडे, पत्नी चित्रा व तीन बहिणी आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले की, विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून आपण काम करणार आहोत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे नितांत गरजेचे आहे. त्याचा आत्मविश्वास वाढल्यास तो तुमचं बोट सोडणार आहे. यातून त्याला नवा उद्योग, नोकरी व व्यवसाय गवसणार आहे. विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी बेरोजगार राहू नये, तो रोजगारक्षम असला पाहिजे. येथून बाहेर पडताच त्याला नोकरी व उद्योग मिळायला हवा. यासाठी त्याला सक्षम केले पाहिजे. ही जबाबदारी पार पाडण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

तत्पूर्वी सत्कार समितीच्या वतीने नवनियुक्त कुलगुरूंसह त्यांच्या आई-वडिलांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

संचालन डॉ. संजय खडसे यांनी केले. आभार दिनेश राजूतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईश स्तवन प्रा. अनिता खडसे यांनी केले. कार्यक्रमाला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, संजय बाळापुरे, प्राचार्य डॉ. संजय खडसे, प्रा.डॉ. दिनेश रोजतकर, चंद्रशेखर खंडारे, नरेंद्र गणोरकर, डॉ. विजय तायडे, प्रकाश शेलापूरकर, कृष्णा मोहोकार, मधुकर बुंदेले, संजय सावरकर, विजय चापके, सतीश धुमाळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.