शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

एसटीची प्रवासी वाहतूक सेवा बंद, प्रवाशांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

कोरोना इफेक्ट; केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत बसेस अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने शनिवारपासून ...

कोरोना इफेक्ट; केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत बसेस

अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने शनिवारपासून जिल्हाभरातील अत्यावश्यक प्रवासी वाहतूक वगळता अन्य प्रवाशांची वाहतूक सेवा बंद केली आहे. यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.

गत काही दिवसापासून राज्यभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वाढत आहे. यात कोरोना बाधित रुग्णांची संख्याही शहरासोबतच ग्रामीण भागात वाढल्यामुळे शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची वाहतूक सेवा ब्रेक द चैन मध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून शनिवारी एसटी बसेसची सेवा सर्व सामान्य प्रवाशांची वाहतुक सेवा बंद केली. परिणामी परिवहन महामंडळाने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशी वाहतुक सुरू ठेवून अन्य प्रवाशांची वाहतूक बंद केल्यामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकांवर आलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वरिष्ठ स्तरावरून प्राप्त निर्देशानुसार जिल्ह्यात अमरावतीसह अन्य आठ एसटी अगारातूनही केवळ अत्यावश्यक व निकडीच्या वेळीच एसटी बसेस सोडण्यात येत असल्याचे स्थानिक एस.टी. महामंडळाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हांतर्गत तसेच जिल्हाबाहेर सोडण्यात येणाऱ्या जवळपास दीड हजारांवर बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

बॉक्स

अचानक प्रवेशव्दार बंद

मध्यवर्ती बसस्थानकांवर शनिवार सकाळपासूनच प्रवाशांची वर्दळ सुरू होती. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सोडल्या जात असल्याने अन्य प्रवाशांना बसस्थानकाबाहेर काढण्यात आले. बसेस नसल्यामुळे प्रवाशांची मात्र मुख्यप्रवेशव्दारा समारे चांगलीच गर्दी जमली होती.

बॉक्स

१०० वाहक-चालक मुंबईकडे रवाना

राज्य परिवहन महामंडळाचे स्थानिक प्रत्येकी ५० चालक आणि वाहक तसेच ५ पर्यवेक्षक आदी एसटी कर्मचाऱ्यांचा जथ्या शनिवार १७ एप्रिल रोजी मुंबई येथील बेस्टच्या बसेस चालविण्यासाठी येथील मध्यवर्ती बसस्थानकांहून रवाना झाले आहेत. ते पुढील १५ दिवस मुंबईच्या बेस्टच्या बसेस चालविणार आहेत.

कोट

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता एसटी महामंडळाने केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सुरू ठेवल्या आहेत. अन्य प्रवाशी वाहतूक सेवा जिल्ह्यातील आठही आगारांतून बंद करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक