शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची प्रवासी वाहतूक सेवा बंद, प्रवाशांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

कोरोना इफेक्ट; केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत बसेस अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने शनिवारपासून ...

कोरोना इफेक्ट; केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत बसेस

अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने शनिवारपासून जिल्हाभरातील अत्यावश्यक प्रवासी वाहतूक वगळता अन्य प्रवाशांची वाहतूक सेवा बंद केली आहे. यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.

गत काही दिवसापासून राज्यभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वाढत आहे. यात कोरोना बाधित रुग्णांची संख्याही शहरासोबतच ग्रामीण भागात वाढल्यामुळे शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची वाहतूक सेवा ब्रेक द चैन मध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून शनिवारी एसटी बसेसची सेवा सर्व सामान्य प्रवाशांची वाहतुक सेवा बंद केली. परिणामी परिवहन महामंडळाने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशी वाहतुक सुरू ठेवून अन्य प्रवाशांची वाहतूक बंद केल्यामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकांवर आलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वरिष्ठ स्तरावरून प्राप्त निर्देशानुसार जिल्ह्यात अमरावतीसह अन्य आठ एसटी अगारातूनही केवळ अत्यावश्यक व निकडीच्या वेळीच एसटी बसेस सोडण्यात येत असल्याचे स्थानिक एस.टी. महामंडळाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हांतर्गत तसेच जिल्हाबाहेर सोडण्यात येणाऱ्या जवळपास दीड हजारांवर बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

बॉक्स

अचानक प्रवेशव्दार बंद

मध्यवर्ती बसस्थानकांवर शनिवार सकाळपासूनच प्रवाशांची वर्दळ सुरू होती. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सोडल्या जात असल्याने अन्य प्रवाशांना बसस्थानकाबाहेर काढण्यात आले. बसेस नसल्यामुळे प्रवाशांची मात्र मुख्यप्रवेशव्दारा समारे चांगलीच गर्दी जमली होती.

बॉक्स

१०० वाहक-चालक मुंबईकडे रवाना

राज्य परिवहन महामंडळाचे स्थानिक प्रत्येकी ५० चालक आणि वाहक तसेच ५ पर्यवेक्षक आदी एसटी कर्मचाऱ्यांचा जथ्या शनिवार १७ एप्रिल रोजी मुंबई येथील बेस्टच्या बसेस चालविण्यासाठी येथील मध्यवर्ती बसस्थानकांहून रवाना झाले आहेत. ते पुढील १५ दिवस मुंबईच्या बेस्टच्या बसेस चालविणार आहेत.

कोट

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता एसटी महामंडळाने केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सुरू ठेवल्या आहेत. अन्य प्रवाशी वाहतूक सेवा जिल्ह्यातील आठही आगारांतून बंद करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक