शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

एसटीची प्रवासी वाहतूक सेवा बंद, प्रवाशांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

कोरोना इफेक्ट; केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत बसेस अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने शनिवारपासून ...

कोरोना इफेक्ट; केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत बसेस

अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने शनिवारपासून जिल्हाभरातील अत्यावश्यक प्रवासी वाहतूक वगळता अन्य प्रवाशांची वाहतूक सेवा बंद केली आहे. यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.

गत काही दिवसापासून राज्यभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वाढत आहे. यात कोरोना बाधित रुग्णांची संख्याही शहरासोबतच ग्रामीण भागात वाढल्यामुळे शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची वाहतूक सेवा ब्रेक द चैन मध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून शनिवारी एसटी बसेसची सेवा सर्व सामान्य प्रवाशांची वाहतुक सेवा बंद केली. परिणामी परिवहन महामंडळाने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशी वाहतुक सुरू ठेवून अन्य प्रवाशांची वाहतूक बंद केल्यामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकांवर आलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वरिष्ठ स्तरावरून प्राप्त निर्देशानुसार जिल्ह्यात अमरावतीसह अन्य आठ एसटी अगारातूनही केवळ अत्यावश्यक व निकडीच्या वेळीच एसटी बसेस सोडण्यात येत असल्याचे स्थानिक एस.टी. महामंडळाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हांतर्गत तसेच जिल्हाबाहेर सोडण्यात येणाऱ्या जवळपास दीड हजारांवर बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

बॉक्स

अचानक प्रवेशव्दार बंद

मध्यवर्ती बसस्थानकांवर शनिवार सकाळपासूनच प्रवाशांची वर्दळ सुरू होती. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सोडल्या जात असल्याने अन्य प्रवाशांना बसस्थानकाबाहेर काढण्यात आले. बसेस नसल्यामुळे प्रवाशांची मात्र मुख्यप्रवेशव्दारा समारे चांगलीच गर्दी जमली होती.

बॉक्स

१०० वाहक-चालक मुंबईकडे रवाना

राज्य परिवहन महामंडळाचे स्थानिक प्रत्येकी ५० चालक आणि वाहक तसेच ५ पर्यवेक्षक आदी एसटी कर्मचाऱ्यांचा जथ्या शनिवार १७ एप्रिल रोजी मुंबई येथील बेस्टच्या बसेस चालविण्यासाठी येथील मध्यवर्ती बसस्थानकांहून रवाना झाले आहेत. ते पुढील १५ दिवस मुंबईच्या बेस्टच्या बसेस चालविणार आहेत.

कोट

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता एसटी महामंडळाने केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सुरू ठेवल्या आहेत. अन्य प्रवाशी वाहतूक सेवा जिल्ह्यातील आठही आगारांतून बंद करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक