शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

डीपीआर सर्वेक्षणाला प्रारंभ

By admin | Updated: December 8, 2015 00:10 IST

शहराची वाढती लोकसंख्या, मूलभूत सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आदी बाबींचा समावेश करून शहर विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याला प्रारंभ झाला आहे.

२० वर्षांचा वेध घेणार : डिजिटायझेशन मॅपिंग, सर्वेक्षण सुरूअमरावती : शहराची वाढती लोकसंख्या, मूलभूत सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आदी बाबींचा समावेश करून शहर विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याला प्रारंभ झाला आहे. पुढील २० वर्षांचा वेध घेत नागरिकांच्या समस्या, प्रश्नांना यात प्राधान्य दिले जात असून मौजे प्रगणनेनुसार सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. एकूणच शहराचे डिजिटायझेशन मॅपींग केले जाणार आहे.नगर विकास विभागाने मान्यता दिल्यानुसार १९९२ नंतर आता २०१५ मध्ये अमरावती शहराचा विकास आराखडा तयार केला जात आहे. महापालिका हद्दीतील नागरी वस्त्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात अमरावती, बडनेरा शहरासह १७ समाविष्ट खेड्यांचेही सर्वेक्षण केले जाणार असून मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. शहर विकास आराखड्याचे सर्वेक्षण आणि डिजीटायलेझन मॅपिंगची जबाबदारी पुणे येथील मोनार्च सर्वेअर इंजिनियरिंग प्रा. लि. कडे सोपविण्यात आली आहे. या कंपनीने मौजे शेगाव भागातून सर्वेक्षणाचे कामदेखील सुरु केले आहे. नवीन, जुन्या नागरी वस्त्यांची वस्तुस्थिती सर्वेक्षणात नमूद केली जाणार आहे. सद्याची लोकसंख्या आणि येत्या २० वर्षांनंतर शहराचे रुपडे कसे राहील, ही बाब डीपीआरमध्ये समाविष्ट केली जात आहे. एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार विद्यमान जमिनीचा वापर नकाशा तयार करुन तो नगररचना विभागाच्या चमूकडून मंजूर करून घेतला जाणार आहे. शहराचा डीपीआर तयार करण्यासाठी राज्य शासनाने नाशिक येथील नगर रचना विभागाची विशेष चमू अमरावतीत पाठविली आहे.या चमुचे कामकाजही सुरु झाले आहे. मात्र, डीपीआरचे सर्वेक्षण आणि डिजिटायझेशनचे मॅपिंगचा कालावधी प्रशासनाने मोनार्च कंपनीला १० महिने ठरवून दिला आहे. खरे तर शहराचा डीपीआर तयार करण्यासाठी २०१२ मध्ये सर्वेक्षण करून तो शासनाच्या मान्यतेसाठी पाठविणे आवश्यक होते, तथापि महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईने तीन वर्षे तो उशिरा तयार केला जात आहे. डीपीआरमध्ये नागरी वस्त्या, मूलभूत व पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले जात आहे. (प्रतिनिधी)२० मौजे प्रगणनेचे होणार सर्वेक्षणअमरावती, बडनेरा शहरासह महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या १७ खेड्यांचे विकास आराखडा तयार करताना २० मौजे प्रगणनेचे सर्वेक्षण होणार आहे. यात पहिला टप्पा मौजे शेगाव येथून सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आले आहे. घरांचे मोजमाप, ले-आऊट, जमिनीचा वापर, लोकसंख्येनुसार सर्वेक्षण केले जात आहे. डिजीटायलझेन मॅपिंग करुन तो डाटा जीआयएस प्रणालीशी लिंकद्वारे जोडला जाणार आहे. या मूलभूत बाबींचा राहील समावेशशहर विकास आराखड्यात येत्या २० वर्षांचे व्हिजन लक्ष्य ठेवून मूलभूत बाबींना स्थान दिले जात आहे. यात शाळा, महाविद्यालये, रस्ते, उद्यान, हॉस्पिटल, रुग्णालये, संकुल, क्रीडांगणे, मॉल्स, समाजमंदिर, अंगणवाडी केंद्र, बसस्थानक, चौक सौदर्र्यींकरण, वाहतूक व्यवस्था, भाजीबाजार, हॉकर्स झोन, डिपी रस्ते, ले- आऊट, प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, रस्ते फुटपाथ, वाहनतळ आदी बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे.एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार विकास आराखडा तयार केला जात आहे. यात विद्यमान जमिनीचा वापर गृहीत धरुन सर्वेक्षण केले जात आहे. मौजे प्रगणनेनुसार हे सर्वेक्षण होत असून नागरी प्रश्न, मूलभूत सोईसुविधांना प्राधान्य राहील.- सुरेंद्र कांबळेसहसंचालक नगर रचना विभाग, महापालिका