शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी २६ पासून बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:07 IST

कामाचा ताण, अपुऱ्या सोयी यामुळे तणावाचा सामना करणाऱ्या तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा पवित्रा घेतला आहे.

अंजनगाव सुर्जी : कामाचा ताण, अपुऱ्या सोयी यामुळे तणावाचा सामना करणाऱ्या तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा पवित्रा घेतला आहे. वर्षभरापासून शासनाने संगणकीकृत सातबारा व ई-फेरफारचा गाजावाजा करून अंजनगाव-दर्यापूर तालुक्यात या प्रक्रियेची सुरूवात केली. यातून शेतकऱ्यांना सुविधा देण्याचाच हेतू होता. परंतु सातबारा दुरूस्तीमुळे तलाठ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. वारंवार दुरूस्ती करूनही सातबारा व फेरफार 'अपडेट' होत नाही. शासनाने या उपक्रमाकरिता तलाठी मंडळ अधिकारी स्तरावर कोणत्याही पायाभूत सोयी पुरविल्या नाहीत. त्यांचे लॅपटॉप, प्रिंटर व नेट कनेक्टीव्हिटीची रक्कम मिळत नाही. त्यामुळे अनेक संकटातून तलाठ्यांना जावे लागते. यातून त्यांची प्रतिमा देखील शेतकरी व प्रशासनासमोर मलिन होते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य तलाठी-पटवारी मंडळ अधिकारी समन्वय संघाने शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील सर्व पटवारी व मंडळ अधिकारी सहभागी होेणार आहेत. आंदोलनाच्या श्रुंखलेत ११ एप्रिलला तलाठ्यांनी काळ्या फिती लाऊन काम केले. १६ एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केले जातील. २० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, तर २६ एप्रिल पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दर्यापूर व अंजनगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर निवेदनातून देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)शेतकरी भरडला जातोआॅनलाईन सातबाऱ्याचे संगणकीकृत कामकाज शेतकरी व तलाठ्यांसाठी खूप डोकेदुखी ठरत आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या वेळी जर तलाठी संपावर गेले तर यामध्ये शेतकऱ्यांचे मरण होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकरणात शेतकरीच भरडला जाईल, अशा प्रतिक्रिया आहेत. आमच्या अडचणी शासन व प्रशासन यांना वेळोवेळी सांगितल्या. त्या मनावर घेतल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. आम्ही संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार टाकला तर शेतकऱ्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागतील. - मनोज राऊत, सचिव, तलाठी संघटना.