शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

तलाठी २६ पासून बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:07 IST

कामाचा ताण, अपुऱ्या सोयी यामुळे तणावाचा सामना करणाऱ्या तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा पवित्रा घेतला आहे.

अंजनगाव सुर्जी : कामाचा ताण, अपुऱ्या सोयी यामुळे तणावाचा सामना करणाऱ्या तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा पवित्रा घेतला आहे. वर्षभरापासून शासनाने संगणकीकृत सातबारा व ई-फेरफारचा गाजावाजा करून अंजनगाव-दर्यापूर तालुक्यात या प्रक्रियेची सुरूवात केली. यातून शेतकऱ्यांना सुविधा देण्याचाच हेतू होता. परंतु सातबारा दुरूस्तीमुळे तलाठ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. वारंवार दुरूस्ती करूनही सातबारा व फेरफार 'अपडेट' होत नाही. शासनाने या उपक्रमाकरिता तलाठी मंडळ अधिकारी स्तरावर कोणत्याही पायाभूत सोयी पुरविल्या नाहीत. त्यांचे लॅपटॉप, प्रिंटर व नेट कनेक्टीव्हिटीची रक्कम मिळत नाही. त्यामुळे अनेक संकटातून तलाठ्यांना जावे लागते. यातून त्यांची प्रतिमा देखील शेतकरी व प्रशासनासमोर मलिन होते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य तलाठी-पटवारी मंडळ अधिकारी समन्वय संघाने शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील सर्व पटवारी व मंडळ अधिकारी सहभागी होेणार आहेत. आंदोलनाच्या श्रुंखलेत ११ एप्रिलला तलाठ्यांनी काळ्या फिती लाऊन काम केले. १६ एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केले जातील. २० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, तर २६ एप्रिल पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दर्यापूर व अंजनगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर निवेदनातून देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)शेतकरी भरडला जातोआॅनलाईन सातबाऱ्याचे संगणकीकृत कामकाज शेतकरी व तलाठ्यांसाठी खूप डोकेदुखी ठरत आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या वेळी जर तलाठी संपावर गेले तर यामध्ये शेतकऱ्यांचे मरण होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकरणात शेतकरीच भरडला जाईल, अशा प्रतिक्रिया आहेत. आमच्या अडचणी शासन व प्रशासन यांना वेळोवेळी सांगितल्या. त्या मनावर घेतल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. आम्ही संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार टाकला तर शेतकऱ्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागतील. - मनोज राऊत, सचिव, तलाठी संघटना.