शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तलाठी २६ पासून बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:07 IST

कामाचा ताण, अपुऱ्या सोयी यामुळे तणावाचा सामना करणाऱ्या तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा पवित्रा घेतला आहे.

अंजनगाव सुर्जी : कामाचा ताण, अपुऱ्या सोयी यामुळे तणावाचा सामना करणाऱ्या तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा पवित्रा घेतला आहे. वर्षभरापासून शासनाने संगणकीकृत सातबारा व ई-फेरफारचा गाजावाजा करून अंजनगाव-दर्यापूर तालुक्यात या प्रक्रियेची सुरूवात केली. यातून शेतकऱ्यांना सुविधा देण्याचाच हेतू होता. परंतु सातबारा दुरूस्तीमुळे तलाठ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. वारंवार दुरूस्ती करूनही सातबारा व फेरफार 'अपडेट' होत नाही. शासनाने या उपक्रमाकरिता तलाठी मंडळ अधिकारी स्तरावर कोणत्याही पायाभूत सोयी पुरविल्या नाहीत. त्यांचे लॅपटॉप, प्रिंटर व नेट कनेक्टीव्हिटीची रक्कम मिळत नाही. त्यामुळे अनेक संकटातून तलाठ्यांना जावे लागते. यातून त्यांची प्रतिमा देखील शेतकरी व प्रशासनासमोर मलिन होते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य तलाठी-पटवारी मंडळ अधिकारी समन्वय संघाने शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील सर्व पटवारी व मंडळ अधिकारी सहभागी होेणार आहेत. आंदोलनाच्या श्रुंखलेत ११ एप्रिलला तलाठ्यांनी काळ्या फिती लाऊन काम केले. १६ एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केले जातील. २० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, तर २६ एप्रिल पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दर्यापूर व अंजनगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर निवेदनातून देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)शेतकरी भरडला जातोआॅनलाईन सातबाऱ्याचे संगणकीकृत कामकाज शेतकरी व तलाठ्यांसाठी खूप डोकेदुखी ठरत आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या वेळी जर तलाठी संपावर गेले तर यामध्ये शेतकऱ्यांचे मरण होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकरणात शेतकरीच भरडला जाईल, अशा प्रतिक्रिया आहेत. आमच्या अडचणी शासन व प्रशासन यांना वेळोवेळी सांगितल्या. त्या मनावर घेतल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. आम्ही संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार टाकला तर शेतकऱ्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागतील. - मनोज राऊत, सचिव, तलाठी संघटना.